Skip to main content

भोग आणि ईश्वर ३५८

भोग आणि ईश्वर  ३५८ 

सगुण आणि निर्गुण हे प्रकट व अप्रकट याचंच रूप आहे. मुळात निर्गुणत्व हे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आहे पण दिसत नाही. त्याला आकार नाही, उकार नाही, रंग नाही की रूप नाही. पण ते प्रकट नाही याचा अर्थ ते नाहीच असा होत नाही. मुळात चैतन्य हे निर्गुण आहे, कारण त्याला निश्चित आकार उकार नाही आणि भगवंतांनी स्वतः निरूपण केल्याप्रमाणे ते अस्त्र शस्त्र यांनी मारता, तोडता येत नाही, भिजवता वा वाऱ्याने सुकवता येत. 

हाच निर्गुणाचा महिमा. पण सर्व संसार प्रपंच आणि आध्यात्मिक उन्नती व उद्धार हा फक्त सगुणातूनच साध्य होऊ शकत असल्यामुळे, चैतन्याला सगुणात यावच लागतं. परब्रम्ह हे अप्रकट स्वरूपात आहे, तोपर्यंत परम ईश्वराचं वास्तविक अस्तित्व लक्षात येत नाही. 

याला कारण म्हणजे देहधारी जीव, जे समोर दिसेल अर्थातच जे प्रकट आहे किंवा सगुणात आहे, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला सत्य मानतो. मुळातच निर्गुण असलेलं परब्रम्ह हे प्रकट झालं आणि त्याला सगुणत्व प्राप्त झालं. सगुणत्व म्हणजे जे कल्पनातीत आहे, त्याचं प्रत्यक्षात येणं. जे अस्तित्वहीन आहे त्याला अस्तित्व प्राप्त होणं. 

म्हणजे मनात असलेली सुरांची वेल, प्रत्यक्षात सुरावटीवर एखादया तानेतून, वाद्यातून उतरून प्रकट होऊन आसमंतात विहरणं. एखादा कुंचला कागदावर एखाद्या चित्राची संगती उतरवतो, किंवा एखादा विचार जो मनात आहे, पण प्रत्यक्षात अप्रकट आहे, तो प्रकटुन कागदावर वा वैखरीतून जिव्हेद्वारे बाहेर येणं. निर्गुण रूप खरंतर असतंच, पण त्याला आकार नसतो. 

तो आकार मांडणाऱ्याच्या दृष्टीतून प्रकट होतो. म्हणजेच अमूर्त स्वरूपात असलेली ब्रह्मांडाची कल्पना, एका संकल्पात आपल्यासमोर प्रत्यक्ष साकार स्वरूपात, आज युगानुयुगे अस्तित्वात आहे. पण हे सगुणत्व व्यक्तिसापेक्ष असू शकतं. म्हणजेच परब्रम्ह परामात्म्याचं प्रकट होणं, हे प्राप्त परिस्थितीवर व बघणाऱ्याच्या दृष्टिप्रमाणे असतं. 

ईश्वरानेसुद्धा सगुणत्व हे निर्गुणत्व समजून येण्यासाठी आणि येण्यापूरतं प्रकट केलं आहे, हे ध्यानात ठेवावं आणि हाच खूप मोठा गुह्यर्थ आहे. म्हणजेच निर्गुणत्व आणि।सगुणत्व हे परस्पर पूरक आहेत. कारण मला जो बाळकृष्ण दिसतो, त्यालाच एखादा श्रीराम किंवा दुसरं अजून काहि समजेल. पण या बाह्य सगुण रुपाला बघणाऱ्याचा दृष्टकोन कारणीभूत आहे.  

यावर अजून चिंतन आवश्यक आहे. पण तोपर्यंत परब्रम्ह परमात्म्याच्या सगुण रूपातील नामाला साद घालतच राहूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...