Skip to main content

भोग आणि ईश्वर ३५१

भोग आणि ईश्वर  ३५१ 

संचितातील ठेव वा कर्ज जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मानव किंवा कोणताही जीव, या भूतलावर जन्म घेण्यास बाध्य आहे. संचिताच्या भारातील एक  एक गोष्ट वसूल होत नाही किंवा फेडली जात नाही तोपर्यंत, इथे जन्म घेऊन त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आत्म्यावर असते. म्हणजे देह जरी काही कर्म करतो, तरी त्याची मुख्य जबाबदारी ही आत्म्याची असते. 

आत्मा या तत्वाला अविनाशी म्हटलं आहे, त्याची दोन प्रयोजन आहेत. एक म्हणजे जोपर्यंत देहाने केलेल्या कर्माचं मोल चुकवलं जात नाही, तोपर्यंत आत्मा अनेक देह धारण करत, नित्य या जगतात ये जा करत राहणार. म्हणजे जरी एका देहातून आत्मा बाहेर पडून, अंतराळात मार्गक्रमण करत असेल तरीही, त्या कर्माच्या अपूर्ण फलांची बाकी अथवा ओझं, आत्म्याच्या शिरावर नित्य असतं. 

दुसऱ्या अर्थाने, आत्मतत्त्व हे त्या परम तत्वाचा अंश असल्या कारणाने, ज्याप्रमाणे परम अंश हा अविनाशी आहे, त्याच न्यायाने, त्याचा अंशरूप आत्मा हा अविनाशी आहे. विनाश पावणं म्हणजे नष्ट होणं. हा गुणधर्म या जगतातील प्रत्येक गोष्टीचा स्थायीभाव आहे. त्यामुळे निर्माण होऊन नष्ट होणं हादेखील,जगतातील प्रत्येक गोष्टीचा स्थायीभाव आहे. 

या अविनाशी आत्मतत्वाला, देहाची कर्म या जगतात नित्य बोलावून, देह धारण करण्यास बाध्य करतात. ही बद्धता, आत्म्यासाठी अकारण आहे. पण म्हणूनच देहरूपात केलेल्या कर्माची फलं, त्याच जन्मात किंवा पुढील जन्मात पंचमहाभूतरुप देहातूनच भोगावी लागतात. 

खरी समस्या ही, या भोगण्याची नाही. तर खरी समस्या, एका देहातील कर्माचे भोग दुसऱ्या देहाला भोगावी लागण्याची कारण मीमांसा वा संगती न लागल्यामुळे, निर्माण होते. देहाला अर्थातच देहातील बुद्धीला व मनाला जे समोर दिसतं किंवा जाणवतं, त्यानुसार मी जे कर्म केलंच नाही, त्याबद्दल मी शिक्षा रूपात, भोग का भोगतो, हा तर्क, फक्त देहाचाच विचार केला तर, योग्य वाटतो. 

पण हाच मायेचा भ्रम आहे की, जे चर्मचक्षुना दिसतं आणि जे देहबुद्धीला जाणवतं, ते अयोग्य कसं मानायचं, हा एक बुद्धीच्या तर्काचा बिनचूक वाटणारा प्रश्न, डावलून नक्कीच पुढे जाता येणार नाही. बुद्धिमध्ये दोन प्रकार आहेत. एक जडबुद्धी व दुसरी आत्मबुद्धी. जसे नेत्र दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे या देहाचे चक्षु आणि दुसरे म्हणजे आत्मनेत्र. 

जडबुद्धी आणि चर्मचक्षु यांबद्दल फार काही चिंतन करायची गरज नाही. पण आत्मबुद्धी आणि आत्मनेत्र यावर उद्या विस्तृतपणे चर्चा करूया. पण आपल्या आत्म्याचा प्रकाश जागवत ठेवणारं नाम नित्य घेत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...