Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६२

भोग आणि ईश्वर  ३६२

सद्गुरुंच्या प्रगल्भ जाणीवा, दुसऱ्या पातळीवरील ज्ञानेंद्रियांचा पूर्ण क्षमतेने विकास व सदुपयोग करण्याची वृत्ती, ज्ञानाच्या आणि जाणिवांच्या रुंदावलेल्या कक्षा, या सर्वांसह विश्वाचं फक्त कल्याण व्हावं आणि साधनेतून सद्हेतूने प्रेरित झालेलं आत्मबल, या सर्वांमुळे सद्गुरूंनी काय करणं अपेक्षित आहे, हे त्यांना पूर्ण ज्ञात असतं. त्यामुळे, कोणत्या साधकाला कशाप्रकारे प्राथमिक स्तरावरून, उच्च स्तरावर न्यायचं आणि त्यासाठी काय करायचं, याचं सद्गुरूंचं आकलन आणि कार्य हे ठरलेलं असतं. 

मुख्य समस्या कुठे येते, तर, आपण भावनिक बळावर, साधनेच्या शक्तीच्या माध्यमातून व गैर इच्छा व अपेक्षा यांमधून, प्राथमिक स्तरावरील ज्ञान व जाणीवा यांच्या पूर्ततेसाठी, सद्गुरूंना आवाहन करतो आणि त्याची त्यांनी पूर्तता करावी, अशी व्यावहारिक, पण अध्यात्मिक उन्नतीत बाधा आणणारी अवास्तव अपेक्षा करतो. कर्म धर्मसंयोगाने व काही प्रमाणात सद्गुरुकृपेने आपल्या काही अपेक्षा पूर्ण होतात आणि इथेच खरी आपली परीक्षा सुरू होते. 

आपली परीक्षा यासाठी की, जसजशी इच्छापूर्ती वा अपेक्षापूर्ती होत जाते, तसतशी आपली अपेक्षांची यादी आणि पातळी वाढत जाते. ज्यावेळी यातील काही पूर्ण होत नाहीत, त्या त्यावेळी, आपली सद्गुरूंवरील श्रद्धा व विश्वास यांची परीक्षा व कस लागतो. कारण, कोणतेही सद्गुरू, तुम्ही आत्मिक उन्नतीच्या मुख्य मार्गावरून दूर जावं अश्याप्रकारे सहाय्य वा दुर्लक्ष दोन्ही करणार नाहीत. 

म्हणजे असं की, आधिभौतिक पातळीवरील, लक्ष्य, उद्देश्य व मन हे तिथून निघून,उच्च आधीआत्मिक पातळी वर ओढलं जावं आणि एका ठराविक काळानंतर ते लक्ष पुढील जन्मांचा वा पुढील प्रवासाचा विचार यावर केंद्रित होऊन, कर्मफलभोग व उपभोग या दोन्हीबाबत उदासीन होऊन, संसारबाबत वैराग्यमय यावं, यासाठी सद्गुरू प्रयत्न करतात व सहाय्यभूत होतात. याच काळादरम्यान साधकांची किंवा जनसामान्यांची परीक्षा असते.  जन सामान्य यासाठी म्हटलं की, अनेकवेळा साधक वा भक्त नसलेल्याना सद्गुरू सहाय्य करून, नन्तर आपल्या मार्गात ओढून घेतात. याचं कारण पूर्वजन्मींचे असलेले ऋण व बंध. 

अनेकवेळा अत्यंत वाईट घटना घडते, अनेक दुःखद व वाईट अनुभव येतात आणि अश्यावेळी, सद्गुरूंनी या गोष्टी का थांबवल्या नाहीत व आपल्याला सहाय्य का केलं नाही, असा परिस्थितीनुसार योग्य पण, कर्मफल तत्वानुसार संकुचित विचार मनात येऊ शकतो वा येतो. पण अश्या वेळेला आत्मसंयम, दृढ श्रद्धा यांच्या सहाय्याने, त्या काळातील कठीण परिस्थितीत, आत्मबल ढळू न देण्याचा प्रयत्न करावा. 

कारण कर्मभोगांच्या या काळात, मनाची, वृत्तीची व बुद्धीची स्थिरता राखून काळाचा पाश व भोगांचा कार्यकाल सरू देणं, हेच सूज्ञपणाचं लक्षण आहे. असा संयम व सूज्ञपणा या काळा तून पुढे नेतो. हा संयम दृढ व्हावा यासाठी सद्गुरू अश्या काळात अनंत प्रकारे, अनंत मार्गानी, सर्वांना सहाय्य करतात. यावर अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामाची धग जी मनात, सद्गुरुकृपेने प्रज्वलित झाली आहे, ती तशीच तेवत ठेवणं, आपलं आत्मकर्तव्य आहे, ते करत राहू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...