Skip to main content

भोग आणि ईश्वर निमित्ताने आलेला कृपायोग अनुभव

भोग आणि ईश्वर निमित्ताने आलेला कृपायोग अनुभव ! 

धन्यवाद, सर्वांचे आभार, 

मुलीच्या लग्नाच्या भावभावनेतून बाहेर येण्याची ऊर्जा महाराज देतील, पण जे मुलीचे वडील आहेत, ते या भावना समजून घेऊ शकतील. लग्नसोहळा उत्तमरीत्या पार पडला, सर्व उपस्थित आनंदी आणि समाधानी झाले हा विशेष उपहार मिळाला. कदाचित काही जणांना अनावधानाने आमंत्रण राहिलं असेल, तर त्याबद्दल मी।क्षमा प्रार्थी आहे. मुलीला सासर उत्तम मिळालं, ही महाराजांची अद्भुत कृपा. मी गमतीने तिला महाराजांची नात म्हणतो. पण त्याप्रमाणे महाराजांनी कृपाछत्र तिच्यावर धरलं. ही प्रेरणा आणि हे चैतन्य महाराजांची कृपा आहे. 

थोडं भोग आणि ईश्वरबद्दल 

भोग आणि ईश्वरचं १ डिसेंबर, २०२१ रोजी सुरू केलेलं चिंतन आज सलग ३५८ दिवस लिहीत आहे. लवकरच ३० नोव्हेंबरला ही लेखमाला ३६५ दिवस पूर्ण करेल. यामध्ये सर्वात आश्चर्याची वा चमत्काराची गोष्ट म्हणजे लग्नाच्या या तयारीत आणि विशेष करून १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या ५ दिवसातसुद्धा भाग ३५१ ते ३५५ हे भाग,  सर्व गडबडीतसुद्धा, लिहू शकलो, ही शक्ती महाराजांनीच दिली. हे पाचही भाग बहुतेक  करून रात्री १२ नंतर लिहू शकलो. पण विशेष करून मला आठवतंय की, ग्रहमख व मेंदीच्या दिवशीचा भाग रात्री २ वाजता लिहून मगच झोपण्याची प्रेरणा महाराजांनी दिली. त्याचप्रमाणे घरात राहायला आलेल्या सर्व आप्तेष्ट व स्नेही यांचा कोणताही विरस होणार नाही याचीसुद्धा काळजी महाराजांनी घेतली. म्हणूनच या पाच दिवसातील भाग, झोपण्यापूर्वी लिहिता आले आणि कोणालाही कसलीही तसदी द्यावी लागली नाही. 

मला लग्नाची तारीख निश्चित झाल्यापासून, या ५ ,६ दिवसांची चिंता होती. पण महाराजांनी दिलेली ऊर्जा आणि भोग आणि ईश्वर या चिंतनाचं अखंड लेखन व्हावं या माझ्या इच्छाशक्तीला माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सर्व शक्ती, ऊर्जा व चैतन्य विशेषकरून या ५ दिवसात दिलं आणि माझ्या इच्छेला शक्ती देऊन सांभाळून घेतलं, हा नक्कीच एक भाग्ययोग आहे. 

त्यांची अशीच प्रेरणा व कृपा राहो, त्याचप्रमाणे वाचकांचं प्रेम असंच निरंतर पाठीशी आणि आशीर्वाद मस्तकी राहो हीच महाराज चरणी प्रार्थना. 

जय श्रीराम 🙏🙏🕉️🕉️ 

©® भोग आणि ईश्वर लेखक : प्रसन्न आठवले.

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...