Skip to main content

भोग आणि ईश्वर ३५७

भोग आणि ईश्वर  ३५७

जसं मन बुद्धी हे अंतर्मनात जातं तसतसं माणूस ज्ञानी समाधानी व शांत होत जातो. कारण त्यातून ज्ञान प्रकट होत आणि हे ज्ञान माणसाला प्रगल्भ करून, मूळ स्वरूपाची ओळख पटवून देतं. ही प्रगल्भता निरभ्र आकाशासारखी असते. मनाची खोलीसुद्धा प्रगाढ होत जाते. अनेक चुकीच्या गोष्टी उमगत जातात. ज्ञान हे अष्टकमलाप्रमाणे उलगडत जातं. 

हे ज्ञान वैश्विक, ब्रह्मांडापलीकडील अलौकिक, अद्वितीय असल्यामुळे, अष्टकमलाच्या प्रत्येक पाकळीत अलौकिक गोष्टी ब्रह्मज्ञान, असतं. ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडातील आपलं जग आणि त्या जगातील आपलं अस्तित्व याची जाण झाल्यावर, अनेक शंकाकुशंका, प्रश्न यांची परस्पर उत्तरं प्राप्त होतात. काही प्रश्न निकाली निघतात. काही प्रश्नांचा फोलपणा जाणवतो. काही प्रश्न हे प्रश्न न राहता, त्यांचं उत्तरात रूपांतर होऊन जातं. 

वैश्विक ज्ञान उलगडत जाताना अलौकिक अनुभव असतो.  जन्मोजन्मीच्या चुका, अपराध, प्रमाद यांचा उलगडा होत जातो. विश्वातील अनेक रहस्ये, गूढ गोष्टी, गुह्य ज्ञान प्राप्त होतं. खरतर विश्वाची रचना ही मुळातच सगुण आणि निर्गुण यांचं मिलन आहे हे लक्षात येतं. म्हणजे जे अप्रकट स्वरूपात आहे ते निर्गुण निराकार ब्रह्मरूप आहे आणि जे प्रकट स्वरूपात आहे ते सगुण. 
पण याचा अर्थ असा होतो की अप्रकटन हे विश्वात लुप्त वा गुप्त रुपात परमेश्वराच्या मनात असावं तसं विश्वात संचरत आहे. 

ईश्वराचं व ईश्वराबद्दलचं हे ज्ञान अनेक अंगांनी, रंगानी अप्रकट स्वरूपात चैतन्यरूपाने विश्वात विहरत आहे. ज्यावेळी जाणीवा उमलत जातात, त्यावेळी या ज्ञानाचे तरंग व लहरी प्राप्त करण्या साठीची अवस्था मनाला वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. प्रगाढ शांती असलेली ही अवस्था असते निर्गुणात असलेलं हे ज्ञान सगुणात आणताना किंवा येताना अद्भुत अनुभूती मिळते. 

वास्तविक या सगुण व निर्गुण अवस्था एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला तेच ज्ञान जे अप्रकट आहे आणि दुसऱ्या बाजूला तेच प्रकट होऊन मानवी मनाला तुर्यावस्थेत घेऊन जातं. किंबहुना ज्ञानप्राप्तीची ही स्थिती विलक्षण अद्भुत असते. मुळातच निर्गुण सगुणात प्रकट होतानाची अनुभूती अनेक सुखद अनुभव देऊन जाते. सर्व गोष्टी या चिंतनातून प्रकट होतात. हे चिंतन सतत, नित्य आणि निरंतर होत राहणं महत्वाचं आहे. 

यावर अजूनही चिंतन उद्या करूया. तोपर्यंत नाम साधनेतून आत्मचिंतन करत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...