Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६४

भोग आणि ईश्वर  ३६४ 

उद्या या लेखमालेला एक वर्ष अर्थात ३६५ दिवस पूर्ण होतील. सलग ३६५ दिवस ३६५ लेख, म्हणजेच रोज एक लेख याप्रमाणे इतकी प्रदीर्घ चालणारी लेखमाला लिहिण्याचा सराव वा अनुभव  नसतानाही हे कार्य हातून घडत आहे, त्याबद्दल मी मातापिता,सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ईश्वर व या मालिकेच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अश्या सर्व वाचकांचा ऋणी आहे. त्या ऋणातच मी राहू इच्छितो,कारण तरच अजून अश्या प्रकारचं लेखन कार्य सद्गुरू माझ्याकडून करवून घेतली. 

कालचाच विषय पुढे नेताना, एक गोष्ट जाणवते की, माणूस अनुभवातून फार कमी शिकतो आणि बरेचवेळा चुकांची पुनरावृत्ती करत पुढे जातो. हा अनुभव अगदी घरातून सुरू होतो तो शाळेत,नन्तर कार्यालयात, म्हणजे व्यवहारात नित्य येतो. एखाद्या चुकीबद्दल किंवा अनावधानाने घडलेल्या कर्माबद्दल विधाता वेगवेगळ्या स्वरूपात कर्मफल देऊन, एकप्रकारे संकेतच देतो. 

पण तरीही आपण ते संकेत एकतर लक्षात घेत नाही किंवा ते आपल्या लक्षातच येत नाहीत. नियती नावाची विधात्याच्या कार्यालयातील व्यवस्था ही आपलं काम चोख करत असते.  पण तरीही ईश्वरकृपा त्या आधी आपल्याला त्याबाबत संकेत देत असते. आपण ते वाचू शकत नाही किंवा लक्षात येऊनही दुर्लक्ष करतो. 

त्याचप्रमाणे भोगांचा काळ सुरू असताना, आपण हे लक्षात घेतच नाही की, काही कर्मचुकांमुळे आपणच या फलांचे धनी झालेलो आहोत. त्यामुळे, या माध्यमातून विधात्याचा संकेत आहे की, आता कर्मांच्या चुका वा चुकीची कर्म टाळा. म्हणजे, हा काळ आला आणि संकटं वा भोग सुरू झाले की, सर्वात प्रथम काया, वाचा व मन याद्वारे घडणारा प्रतिसाद किंवा त्याबद्दल आपली प्रतिक्रिया देताना, आपण अतिसंवेदनशील वा अतिकठोर अश्या दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद यांपासून दूर राहिलं पाहिजे. 

याचं कारण असं की, या काळात आपली आत्मशक्ती वा आत्मबल हे घडणाऱ्या वा घडलेल्या आघातामुळे कमजोर झालं असण्याची शक्यता आहे. जरी तसं झालं नसेल, तरीही मानस शास्त्रानुसार कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया वा प्रतिसाद देणं, ही मूळ मानवी सहजप्रवृत्ती आहे. सहसा अशी प्रतिक्रिया ही equal and opposit असते, अर्थात विरुद्ध दिशेने आणि त्याचप्रमाणात असते. न्यूटनचा तिसरा नियम हेच सांगतो. 

म्हणजेच जर आपण react झालो किंवा प्रतिक्रिया दिलीच तर ती विरुद्ध बाजूला अर्थात झालेल्या आघाताच्या दिशेने आणि तितकीच तीव्र असू शकते. मानसशास्त्र असंही सांगतं की, नकारात्मक घटना, शब्द, साद यांना तसाच, पण आपल्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच साद आला त्या दिशेने, मन त्वरित react होतं, किंवा सादाला प्रतिसाद देतं, नैसर्गिकरित्या. 

या प्रतिक्रियेचं प्रमाण, व्यक्तिपरत्वे कमी अधिक असू शकेल. पण ती मनात दिली काय, किंवा प्रत्यक्ष वाचेने दिली काय, तरंग वा लहरी या मनात व अंतरिक्षात जातातच. त्यामुळे एक नवीन कर्मफल साखळी आपणच तयार करतो. म्हणजे एक प्रसंग वा घटना जी आपल्या कर्मफल साखळीनुसार आपल्याकडे वा आपल्यापर्यंत आली, त्यातून बाहेर पडण्यासाठी मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आपण नवीन गुणोत्तर तयार करतो. 

यावर अजूनही चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नामाने हित साधण्याचा आपला नियम सुरूच ठेवू. 

यावर अजून आत्मचिंतनाची आवश्यकता आहे, म्हणून उद्याच्या भागात यावर विचार करूया. तोपर्यंत नामाने आत्मबल वृद्धी करून घेण्याचा प्रयत्न करूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...