Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४७

भोग आणि ईश्वर  ३४७

कर्माचं अर्थात कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येकाला, त्याच्या त्याच्या संपूर्ण आयुष्यात, प्रत्येक क्षण उपलब्ध आहे आणि असतं. पण हे स्वावलंबित्व अनेक चक्राकार क्षणांतून जातं. म्हणजे असं की, तुम्ही एखादं कर्म, जे कोणत्याही कर्माशी निगडित नाही,  ते तुमच्या हातून घडत आहे. आता हे कर्म कोणताही माणूस, मशीनप्रमाणे घडणारं काम या सदरात येत नाही आणि होणारही नाही. 

कारण प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत दोन महत्वाच्या गोष्टी सोबत घेऊन फिरत असतो. एक म्हणजे प्रारब्ध आणि संचित, त्याचप्रमाणे मन. या दोन गोष्टींच्या संयोगा तून मनाचे विविध बंध भाव भावना,मायेचा खेळ, षड्रिपुंचे रंग,भवरोग,भोग आणि उपभोग यांसह आयुष्यात आलेले अनुभव त्यांचं मनावर असलेलं ओझं,प्रभाव आणि बंधनं, या सर्वांतून मनाची झालेली जडणघडण, त्यातून तयार झालेला स्वभाव, वागणूक, वर्तणूक, वृत्तींचा फेरा 

या सर्वात जीवनातील सर्व घटना, प्रसंग यांचा प्रभाव, याचा संचय म्हणजे मन. याशिवाय प्रारब्धाचे मनावर घडलेले संस्कार. असं हे मन माणसाच्या सतत सोबत असतं. त्याशिवाय माणूस ही संकल्पना अशक्य. त्यामुळे प्रारब्धात घडणाऱ्या घटना, प्रसंग ही फलरुपात सर्वांच्या मार्गात क्षणक्षण येतच असतात. त्याला सामोरे जात, त्यांच्यामधून स्वतःला पुढे नेत, त्यातून आपलं वर्तमाना तील कर्म करताना, या सर्वांच्या प्रभावातून कसं घडेल, काय घडेल, त्यावर स्वभावाचा काय प्रभाव असेल, हे वास्तविक ती व्यक्तीसुद्धा ठरवू शकत नाही. 

ह्या सर्व गोष्टींची मनात  तयार झालेली व्यवस्था, त्या व्यवस्थेच्या प्रभावात वा त्याच्या प्रभावळीत प्रत्येक क्षण हा कुठेतरी भरलेला आणि भारलेला असतोच असतो. म्हणजेच प्रत्येक कर्म हे जरी स्वतंत्र दिसत असलं तरीही, हे स्वातंत्र्य या सर्व प्रभावळीत हरवलं जातं. हे सहाजिक होत जाणारं आहे वा होत जातं.मग या अश्या स्वभावाच्या मनातील तरंगांच्या, लहरींच्या, प्रभावाच्या वातावरणात चालणारं मन आणि त्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय केली जाणारी कर्म ही नक्कीच स्वतंत्र आणि स्वावलंबित्व यांचं द्योतक आहे, असं म्हणता येणार नाही. 

म्हणूनच काल म्हटल्याप्रमाणे कर्म करण्याचं स्वावलंबित्व हे म्हटलं तर स्वावलंबित्व आहे किंवा परावलंबित्व सुद्धा म्हणता येईल. म्हणजे असं म्हणता येईल का की, विश्व नियंत्याने ही शृंखला वा हे चक्र मुद्दाम निर्माण केलं असेल का. म्हणजेच या खेळाचा हा एक अविभाज्य भाग असेल का. खरतर याचं उत्तर खूप चक्राकार व गोंधळात टाकणारं आहे. बघूया उद्या चिंतन करूया. पण तोपर्यंत आपण त्याच नियंत्याला नित्य स्मरण्याचं आपलं काम करत राहू. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...