भोग आणि ईश्वर ३४१
देहात आल्यानंतर देहातील जाणिवांमुळे आणि संचिताच्या चक्रामुळे आत्म्याचा मूळ उद्देश, मनसुद्धा विसरून जातं. याचं महत्वाचं कारण,मन जरी अवकाश तत्वांपासून तयार झालेलं असलं तरीही, गुरुत्वाकर्षण शक्ती, या भूतलावरील शक्तीच्या प्रभावाने, देह जन्माला आल्यावर, पृथ्वी अर्थात देह या तत्वाशी बद्ध होतं. मन संचितात प्राप्त विचार विसरून, देहातून प्राप्त होणारी सुखं व उपभोग, यांच्यामध्ये, मायेच्या प्रभावात गुंतून पडते.
किंबहुना, आत्म्यासह देहात आलेला मनोमय कोष, स्वतःचा मूळ मालक असलेला आत्मा, यालाच, देहात आल्यावर, विसरून जातं. एखादं मूल जेंव्हा, सांभाळायला ठेवलेल्या घरालाच, आपलं घर समजून आपल्या आईवडिलांच्या घराला विसरून जातं, तसच. यानंतर आत्मा हा पूर्णपणे परावलंबी होतो. तसही आत्मा हा परावलंबीच असतो, कारण जडदेह प्राप्त झाल्या शिवाय आत्मा काहीच करू शकत नाही.
त्यामुळे आत्मा फक्त आणि फक्त बघत राहून, मनाला मी कोण, कुठून आलो, का आलो याची जाणीव होत नाही तोपर्यंत, आपल्या संचितातील भार देहामार्फत उतरवून घेण्याचा विचार येत नाही. खरतर तेच मनाचं मुख्य कर्म आहे. हे समीकरण थोडसं कठीण आहे. आत्मा देहावर अवलंबून आहे दोन गोष्टींसाठी.
एक म्हणजे संचितातील जास्तीतजास्त भार या देहा मार्फत जर, उतरवता आला तर, पुढील जन्मात वा देहात, त्या देहावर त्याचा कमी भार पडून, त्या देहाकडून मूळ उद्देशांच्या जास्तीतजास्त जवळ जाता येईल. यासाठी आत्म्याला मनाची साथ जरुरी आहे. दुसरं म्हणजे देहाचा उपयोग फक्त आत्मप्रवासातील पूर्तीसाठी एक माध्यम आहे, हे वैश्विक सत्य.
बर मन स्वतःसुद्धा परावलंबी आणि देहाच्या सहाय्या शिवाय कोणतंही कार्य करून घेऊ शकत नाही. पण सर्वात घातकी आहे. कारण माया मोह लोभ वासना या विविध प्रलोभनांच्या जाळ्यात, स्वतः अडकून, देहाकडून अनेक गैर व अनैतिक कृत्य व अनेक चुकीच्या गोष्टी करून घेतं. मनाच्या या क्षणिक मोह, लोभ,राग, क्रोध, वासना यापायी,देह वापरला जातो,त्याची शिक्षा वा परिमार्जन या किंवा पुढच्या अनेक जन्मात पुन्हा त्या त्या जन्मातील देहच भोगतो.
म्हणजे मग यात सर्वात महत्वाच्या आत्म्याच्या उद्देश पूर्तीसाठी, त्याहून महत्वाच्या मनाला ही जाणीव होणं महत्वाचं ठरतं, की सर्व खेळाचा सूत्रधार मनच आहे. कारण याने तोल न जाता, पाय घसरू न देता, मोहाच्या लोभाच्या वासनेच्या आक्रमणाला बळी न पडता आत्म्याच्या परमोच्च उद्देशासाठी, देहाला कार्यरत करून, देहाच्या माध्यमातून आत्मशुद्धी आत्मोन्नती आत्मोद्धार साधत, अंती देह सत्कार्याला व सन्मार्गाला वळवणं.
चक्रातील या केंद्रबिंदूपर्यंत यायला, कित्येक जन्म जावे लागतात आणि या केंद्रापर्यंत यायच्या संधी आल्यातरी, त्या प्राप्त संधी सफल करून, देह त्यासाठी कर्मरत करणं आणि ठेवणं, हे पुन्हा मनावर अवलंबून आहे. म्हणजे मनाचा या सर्वांतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून मनाला या गोष्टीची सतत जाणीव करून देणं, हे तर त्याहूनही महत्वाचं आहे. ही जाणीव मनात जागृत होण्यासाठी ईश्वरकृपा आणि सद्गुरुकृपा अत्यंत आवश्यक आहे.
यावर पुढील भागात चिंतन करूया. तोपर्यंत आपल्याला प्राप्त जाणिवेनुसार आपण नाम घेऊन, सद्गुरुकृपेच्या समीप जाण्याचा प्रयत्न करूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment