भोग आणि ईश्वर ३४२
या विश्वात आलेल्या आणि देही किंवा विदेही असलेल्या प्रत्येक आत्म्याचा उद्धार व्हावा, ही सद्गुरू आणि ईश्वर यांची आंतरिक तळमळ असते. संसाराच्या सागरात अडकलेल्या आणि मूळ उद्देशापासून,प्रचंड दूर गेलेल्या जीवांबद्दल,करुणा आणि दया असणं, हा ईश्वराचा व त्याचाच अंश असलेल्या सद्गुरूंना अपार संवेदना आणि करुणा वाटते.
खरतर एकाच आईच्या लेकरांच्या प्रारब्धात, त्यांच्या त्यांच्या कर्मांनी, त्यानीच लिहून ठेवलेल्या व काळाच्या ओघात व प्रत्येक जन्मात, आयुष्याच्या वाटेवर, त्याची फळं भोगणाऱ्या आणि उपभोगात मश्गुल राहून, पुढील प्रारब्धाची जाणीव नसलेल्या, प्रत्येक जीवाला, अश्या प्रकारे तडफडताना पाहून, परम ईश्वराला होणाऱ्या यातना एक आईच समजू शकते.
तरीही यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी, आईचा जीव तीळ तीळ तुटतो. पण ज्या जीवासाठी हा कळवळा आईला असतो, त्या मुलाला त्याची काही चिंता नसेल तर, आईला असह्य यातना होतात. ईश्वर तर विश्वाची आई, जगतजननी आहे. त्यामुळे यातून प्रत्येक जडजीव बाहेर यावा यासाठी, ईश्वर अनेक रुपात, अनेक पर्यायात अनेक मार्ग, अनेक दिशा, निर्माण करून, त्याआधारे, या जीवांना,काही दिशा,मार्गदर्शन व मार्ग योजतो. अष्टांग योग, नवविधा भक्तीमार्ग, निष्काम साधना, ज्ञानप्राप्ती यातील एक सुलभ पर्याय निवडून,त्याचा अवलंब करून, या जन्ममरण चक्रातून, बाहेर पडण्याचा निदान प्रयत्न जरी करतील तरी त्याला ईश्वर अनंत कृपेची द्वारं उघडून, नक्कीच मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाईल. साधक, भक्त, ईश्वरमार्गी यांनी, टाकलेल्या एका पावलावर कृपेची बरसात करण्याच्या या गोष्टीला सद्गुरू व ईश्वरी कृपेचा सागर म्हणतात.
दयाघन ईश्वर व सद्गुरू, या मार्गाकडे वळलेल्या भक्तांना, नित्य आपल्या कृपाछायेत ठेवून, त्यांना या मार्गावरून ढळण्यापासून वाचवतात व मार्गभ्रष्ट होण्यापूर्वी व होण्या पासून परावृत्त करतात. ही कृपा वा त्याची छाया एकदा, भक्तांवर पडली की भक्ताला वा साधकाला, फक्त आपलं कर्म, भक्ती यांना दृढ धरून राहणे आणि आपली नित्य साधना करत राहणे, इतकेच कर्तव्य उरते.
इथे अर्जुनाचं उदाहरण घेता येईल. अंतिम महाभारत युद्धात, अर्जुनाला तू युद्ध कर्तव्य कर, बाकी फलाची आशा धरू नकोस, हे सांगताना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, जयद्रथ,कर्ण व दुर्योधन यांचा वध करण्यासाठी, कोणताही विचार न करता, सर्व कावेबाजी, धुर्तपणा व कपटनीती,यांचा,वापर करून, या महत्वपूर्ण शत्रूंना संपवून, युद्धातील विजयाचं श्रेय मात्र, पांडवांना देऊन मोकळा झाला. हा ईश्वरी कृपेचा परिणाम आहे.
ईश्वरी कृपेवर अजूनही चिंतन करता येईल, ते पुढील भागात करूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment