Skip to main content

भोग आणि ईश्वर २९५

भोग आणि ईश्वर  २९५ 

जागृत जाणिवांची जाण असणं, अर्थात समजणं, हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे.कारण आपण काय जाणावं आणि काय जाणू नये, यापेक्षा काय जाणत आहोत आणि जाणत आहोत, ते योग्य की अयोग्य, हे जाणवणं अर्थात समजणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच देहाकडे व त्याद्वारे मनाकडे, आलेल्या सर्व संदेशावरून वा लहरींवरून, आपल्या मनाने काय प्रेरणा आपल्याला दिली किंवा त्या लहरींनी, काय जाणीवा जागृत केल्यात, हे त्या क्षणाला मनात आलेल्या विचारातून लक्षात येतं. 

उदाहरणार्थ एखादी सुंदर दिसणारी स्त्री, जर काही बोधप्रद व संस्कारमय गोष्टी सांगत असेल किंवा ज्ञान देत असेल तर, बघणाऱ्यांमध्ये, स्त्री व पुरुष दोघांमध्येही, त्यांच्या जागृत जणीवा नुसार विचार येतील. म्हणजे काही जण सर्वप्रथम व सकृत दर्शनी दिसणारं सौंदर्य पाहून मुग्ध होतील, तर काही त्याची मात्र नोंद घेऊन, पुढे ऐकायला सुरवात करतील आणि काही त्याकडे लक्षही न देता फक्त ऐकण्याकडे म्हणजे श्रवणा कडे ध्यान देतील. 

यातील तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद आपण पाहिला.  ही प्रतिक्रिया प्रत्येकाच्या जागृत जणीवानुसार प्रत्येकाने प्रक्षेपित केली. म्हणजे ज्यांनी फक्त सौन्दर्य पाहिलं आणि त्यात हरवून गेले, त्यांच्या देहाबद्दलच्या किंवा षड्रिपुंच्या संवेदना व जाणीवा जागृत आहेत किंवा शक्तिमान आहेत. त्या जाणीवा, इतर जाणिवांना आपल्यापुढे जाऊ देत नाहीत. कारण त्या नकारात्मक आहेत आणि आपण जाणतो की, नकारात्मक गोष्टींची व लहरींची शक्ती तीव्र असते. त्यामुळे अश्या जाणीवा इतर जाणिवांना व्यक्त होऊ देणार नाही. 

दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे जागृतीच्या वाटेवर असलेले आणि ज्यांच्यामध्ये आधी देहाबाबतच्या जाणीवा प्रथम जागृत झाल्या, पण सकारात्मक जाणिवांना जाग येऊन सकारात्मक लहरींचा प्रभाव, लगेच निर्माण झाला. त्या प्रभावाने मूळ उत्पन्न जाणिवांना झाकोळून दूर केले आणि त्वरित बदललेला प्रतिसाद पडद्यावर अर्थात देहाच्या पटलावर प्रदर्शित वा प्रक्षेपित झाला. 

तिसऱ्या प्रकारातील लोक म्हणजे विवेक व उत्तम आणि उपयुक्त जाणीवा जागृत असलेले लोक. अश्या लोकांना देहाबाबतचे विचार येतच नाहीत, म्हणजे बाह्य सौन्दर्या कडे त्यांच्या वृत्ती आकर्षित होत नाहीत. त्या प्रकारच्या जाणीवा व त्या जाणिवांची शक्तिकेंद्रे सुप्त अवस्थेत असतात.  त्यांच्या जागृत विवेकाला ज्ञात असतं की, काय योग्य आहे आणि त्यानुसार काय आत येऊ द्यावं किंवा काय त्याज्य करावं. 

म्हणजे आपण काय घ्यावं वा आत्मसात करावं आणि काय त्यागावं, हे समजण्याची जाण त्यांच्या ठायी असते किंवा आलेली असते. अश्या प्रकारची स्थिती ही अद्भुत उपलब्धी आहे. अशी स्थिती केवळ ज्ञानानेच येते. ज्ञानाने काय प्राप्त करावं वा करायचं आहे , काय घ्यायचं व काय त्यागायचं, याची जाण आलेली असते. त्या ज्ञानाने एक प्रकारची प्रगल्भता प्राप्त होते. एक उन्मनी अवस्था आहे ही. 

याबद्दल अधिक विस्ताराने उद्या बोलू, पण तोपर्यंत आपण नामाचा पाठ नित्य सुरू ठेवू आणि नामाबद्दलची जागृत जाणीव जागीच ठेवण्याचा प्रयत्न करू. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...