Skip to main content

भोग आणि ईश्वर २१३

भोग आणि ईश्वर  २१३

गेल्या तीन चार भागात आपण भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यावर विस्तृतपणे चर्चा करतो आहोत. आता या घडीला आपण भक्तीतील अनेक मुद्दे बघत आहोत. त्यामध्ये जेंव्हा भक्तिमार्गात येताना चित्त शुद्ध करून त्यामार्गाने भक्तीच्या पहिल्या पायरीवर जाताना, 
क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावं लागेल यावर बोलत आहोत. 

यासाठी अंतरात्मा आणि त्याचे संकेत जाणून आपण यात नियंत्रणाच्या मार्गावर जाताना किंवा त्याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण प्रतिक्रिये साठी अथवा क्रियेसाठी शांत राहून, त्यावेळची कटुता टाळली तर, आपण नवीन तयार होणाऱ्या ऋणातून मुक्त होतोच. पण ज्या व्यक्तिसंदर्भात हे ऋणातुन मुक्त होण्या साठी आपण हा पवित्रा स्वीकारला त्या व्यक्तीला याचा लाभ होणार का, किंवा त्या व्यक्तीची स्थिती काय असेल. 

मुळात हा ऋणसाखळी तोडण्याचा निर्णय आपण घेतला. म्हणजेच आपण आपल्यावर त्याचे किंवा त्याच्यावर आपले ऋण सोडून दिले. म्हणजेच आपण ऋण सोडून दिलं. ऋणाचा नियम आहे की, जेंव्हा एखादी पतसंस्था एखाद्या ग्राहकाचं ऋण कमी अथवा माफ करते, तेंव्हा तशी फेररचना हिशोबात करून, हिशोबाची पुनर्रचना करते. त्यांचा ताळेबंद दुरुस्त करते आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची तरतूद करते. 

अर्थात हे झालं व्यावहारिक पातळीवर. अध्यात्मिक, आत्मिक पातळीवर अश्या फेरारचनेचा प्रश्न हा त्या व्यक्तीच नव्हे तर, त्या साखळीतील सर्वच्या सर्व व्यक्तींच्या संदर्भात होऊ शकतो. म्हणजेच या साखळीच्या नियमानुसार सर्व संबंधित व्यक्ती, त्या एका ऋणा संदर्भात नक्कीच मुक्त होतात. म्हणजे आपल्या एका सुधाराणेमुळे आपण साखळीतील अनेक आत्म्याच्या संदर्भात बदल घडवून आणू शकतो. 

म्हणूनच संत महात्मे नेहमी सांगत असतात की, इतर कसे वागतात याचा विचार न करता, आपण कसं वागायचं हे आपल्यापुरतं ठरवून त्याप्रमाणे आपल्या स्वभावात, वागणुकीत व विचारात बदल घडवून आणावा. म्हणजे पुढचे बदल आपोआप घडून येऊ शकतात. 

एवढं विस्तृतपणे विवेचन केल्यानंतर एक गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे की, मला या ऋणाच्या साखळीतून मुक्त व्हायचं असेल आणि भक्तीच्या मार्गातील चित्तशुद्धीची पायरी पार करायची असेल तर, मुळात मनातून सर्व दोष दूर करणं गरजेचं आहे. 

भक्तीच्या मार्गात चित्तशुद्धीच्या वाटेवर दोष दूर करण्या बरोबर अजून एक गोष्ट ते चित्त किंवा मन व त्यामार्गे आत्मा नामात गुंतवण्यासाठी आणि कर्माचे दोष व मनातील न्यून दूर करण्यासाठी, सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्या इष्टस्थानाच्या चरणी पूर्ण शरण जाणं. शरणा गतीचं मोल इतकं आहे की अनेक पापांचे डोंगर जाळून भस्म करण्याचं सामर्थ्य एका चरणांवर, शरण जाऊन, साध्य होतं. नित्य त्या चरणांना वंदन करून प्रार्थना करून सांगावं की, माझ्यातील दोष दूर व्हावेत यासाठी बुद्धी, शक्ती व मनःस्थिती दे. 

ज्या दोषांना स्वीकारून , हे प्रभू, तू मला आपला करशील, त्यांना पोटात घेऊन तू मला संमार्गी कर. मला तुझं नाम घ्यायला तूच मदत कर, तुझ्या स्मरणाची माझी दृढ इच्छा व त्या इच्छेचा दृढ संकल्प, यासाठी माझी बुद्धी सतत एकमार्गी, सकारात्मक आणि मायारहीत राहू दे. 

माझे प्रारब्धाचे व संचितातील जे भोग मला भोगूनच संपवायचे आहेत, ते भोगण्यासाठीचं बळ व बुद्धी तूच मला दे. तू जन्माला घातलेल्या देहातून फक्त आणि फक्त तुझ्याच स्मरणाला मी बद्ध राहू दे, अन्य कोणत्याही किल्मिष व दोषांना या देहात व त्यातील मनात स्थान नको देऊस. मी तुझाच आहे, ही नित्य जाग, या व्यावहारिक जगातही, सतत जागृत राहू दे. मायेच्या, बुद्धीवरील पडद्यासह, इतर कोणत्याही विकारांना या मनात स्थान देऊ नकोस. सर्व त्याज्य गोष्टी सोडून देण्याची सुबुद्धी दे आणि आत्मकल्याणार्थ जरुरी सर्व 
स्वीकारार्ह गोष्टी, आत्मसात करण्यासाठीचा विवेक अंतरात जागा राहू दे 

अश्या प्रार्थनेने नित्य आपलं नामस्मरण करा आणि परिणाम पहा. एकाग्रता न झाली आणि पुढे न गेलात तर नवल. पण शरणागती, मात्र संपूर्ण हवी आणि आत्म्यातून नित्य नाम घ्या, नित्य उपासनेत रहा. विषय खूप मोठा आहे, उद्या पुढे नेऊया. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...