Skip to main content

भोग आणि ईश्वर २८५

भोग आणि ईश्वर  २८५ 

ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेली माहिती मेंदूमार्फत मेंदूतील पेशी आणि अदृश्य इंद्रिय मन यांच्याकडे पाठवली जाते.  मनातील जागृत शक्तिकेंद्रे, पुन्हा लिहितो मी, मनातील जागृत शक्तिकेंद्रे, त्या शक्तिकेंद्रांची क्षमता व ज्ञान या आधारे या माहितीचं व ज्ञानाचं पृथक्करण करून त्यावर क्रिया अथवा प्रतिक्रिया देण्याबद्दलची आज्ञा, ज्ञानेंद्रियांना पोचवतात. म्हणजे यात घेतलेल्या निर्णयाची गुणात्मकता आणि परिणाम, शक्तिकेंद्रांवर अवलंबून आहे. 

म्हणजेच मानवी मनातील ज्या शक्तिकेंद्रांना आपण ज्ञानाचं खाद्य पुरवतो, त्यानुसार त्या त्या शक्तिकेंद्रांना चालना व जाणिवांची जागृती प्राप्त होते. संतश्रेष्ठ ज्ञानोबामाऊली ज्यावेळी म्हणतात की जाणीवनेणिव भगवंती नाही, याचा अर्थ, जाणीवच नाही असा होत नाही वा तसा घ्यायचा नाही. तर मनातील ज्या शक्ति केंद्रांना बळ प्राप्त व्हायला हवं, त्यांना ते प्राप्त न झाल्या मुळे, चुकीच्या शक्तिकेंद्रातील जाणीवा जागृत आहेत, ज्यामुळे चुकीचं आकलन होऊन, चुकीचे निर्णय आणि चुकीच्या कर्म फलाची साखळी निर्माण केली जाते. 

या मध्ये मनातील चुकीच्या शक्तिकेंद्रांना मिळणारं बळ, आधी बंद करून, योग्य त्या शक्तिकेंद्रांना पाठबळ देणं, हे प्रमुख काम आहे. यात अनेक गोष्टी आड येतात वा अडथळे निर्माण करतात. सर्वात मुख्य अडचण मनाचा कमकुवतपणा, इच्छाशक्तीचा तकलादूपणा आणि गतकर्माची व गतकाळात घेतलेल्या निर्णयांची वा निर्णयांमुळे येणारी फलश्रुती, जी या चुकीच्या शक्ति केंद्रांना पुन्हा उद्दीपित करून, पाय मागे खेचण्याचा किंवा मनाचा आत्मविश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. 

इथेसुद्धा पुन्हा अज्ञानच कारणीभूत असते. अज्ञान कशाबद्दल, तर, आपणच चुकीच्या शक्तिकेंद्रांना प्रोत्साहित करून, घेतले गेलेले योग्य व अयोग्य निर्णय, ज्याची पूर्ण जबाबदारी आपलीच आहे, याचं योग्यायोग्य ज्ञान नसल्यामुळे, अज्ञानापोटी आपण असा समज करून घेतो की, मी काहीही केलं किंवा चांगला वा वाईट कसाही वागलो तरी, प्रारब्धात काहीही बदल संभवत नाही. पण वास्तविक परिस्थिती वेगळी आहे, हे तेंव्हाच जाणवेल, ज्यावेळी, योग्य जाणीवा जागृत होतील. 

त्या जाणीवा तेंव्हाच जागृत होतील, ज्यावेळी आपण योग्य शक्तिकेंद्रे जागृत करून, अयोग्य शक्तिकेंद्र बंद वा निद्रिस्त करण्याचा प्रयत्न करू. मुळात आपण प्रयत्न सुरू केले आणि लगेच यश मिळेल हे देहाबाबत सुद्धा असंभव आहे, तर मनाबाबत नक्कीच जास्त प्रयत्नांची गरज आहे. म्हणून ही जाणीव वा ज्ञान, सर्वप्रथम जागृत होणं, जास्त महत्वाचं आहे, की मला बदल हवाय. मी, मनातील चुकीच्या शक्तिकेंद्रांना खाद्य पुरवून जोपासतो आहे, त्या चुका मला दुरुस्त करायच्या आहेत, ही जाणीव होणं,  अत्यंत महत्वाचं आहे. 

आता ही जाणीव तेंव्हाच जागृत होईल, जेंव्हा चूक काय आहे, यावर मी विचार केला तरच. म्हणजे मला आधी चुकीचे विचार करणं, बंद करणं जमलं पाहिजे. त्यासाठी कोणते विचार चुकीचे आहेत, जे चुकीच्या शक्तीकेंद्रांना खतपाणी पुरवत आहेत, हे जाणणं महत्वाचं आहे. हे कसं जाणायचं, म्हणजे योग्य अयोग्य कसं ओळखायचं, यावर उद्या विचार करूया. नामाचं आपलं कार्य आपण सुरूच ठेवणार आहोत, अखंडपणे. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...