Skip to main content

भोग आणि ईश्वर २८१

भोग आणि ईश्वर  २८१ 

मनाला स्वस्थ बसून अवलोकन करण्याची क्रिया काही दिवस ठराविक वेळात केल्यानंतर, मन स्थिर व्हायला सुरुवात होते.  कारण इतके दिवस बंडखोरी करणारं आणि मुद्दाम अविचाराने किंवा विचारांची भेळ करणारं मन, अश्या पद्धतीच्या प्रयोगाने आधी उल्हसित आणि नन्तर हळूहळू शांत किंवा पदपथावर यायला सुरुवात होते. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लक्षात येईल. 

ज्यावेळी एखादं वाहन अनियंत्रित होण्याची भीती वा धोका निर्माण होतो, त्यावेळी सर्वात प्रथम अश्या वाहनाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काही वेळानंतर जेंव्हा वेग कमीतकमी मर्यादेपर्यंत खाली येतो, त्यावेळी मग गाडीवर पुन्हा नियंत्रण पूर्ववत प्रस्थापित करता येतं. आता हा प्रयोग, वाहनावर ठीक आहे, शेवटी ते मशीन आहे आणि जशी आज्ञा मिळेल त्यानुसार कार्य करणं हेच त्याचं तत्व आहे. 

मनाचं तसं नाही, हे खरं आहे. पण म्हणूनच हळूहळू प्रयत्न करून त्याच मनाला शांत बसण्याची सवय लावायला सुरवात करायला हरकत नाही. आता आपण शीघ्रकोपी लोकांचा विचार करूया. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांना काहीही न बोलता, थोडे दिवस, फक्त ऐकून घेण्याचा सराव आपण करावा. जेणेकरून त्यांना असं हळूहळू आतून वाटायला लागतं की, मला कोणी दुरुत्तरं करत नाहीत. 

कारण अश्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की, त्यांना दुरुत्तरं केल्याने, त्यांच्या लक्ष वेधून घेण्याच्या प्रवृत्तीला, आपण बळ देतो. असं दुरुत्तर एकदा दिल्यानंतर, आपण त्यांना पुढे बोलण्यास किंवा त्यांचा अहंकार सुखावण्यास मदतच करतो. त्यामुळे ज्या ज्यावेळी अश्या व्यक्ती दुर्लक्षित केल्या जातात, यांचा राग वा संताप अजून वाढण्याची शक्यता असते. खरतर ही स्थिती बरेचवेळा थोडी कसोटीची किंवा तारेवरची असते. 

म्हणून या स्थितीत सोबतच्या किंवा जवळच्या लोकांनी संयम बाळगून वागणं अत्यंत आवश्यक आहे. ही स्थिती काही दिवस राखता आली की, मग या व्यक्ती आत्म परिक्षणात जातात. ही स्थिती, त्या व्यक्तीबरोबर आपल्यासाठीसुद्धा महत्वाची आहे. कारण इथे क्रोधीत, रागीट मन शांत होण्याची स्थिती निर्माण होते. जसं पूर्ण गरम असलेल्या पाण्यात, एकदम गार पाणी घातलं, तर त्यातून अजून जास्त जोरात उष्णता बाहेर फेकली जाते. 

याचं कारण शास्त्रीय आहे, ज्यावेळी ठराविक उष्णतेच्या पदार्थात किंवा पदार्थावर थंड जल किंवा तत्सम प्रवाही पदार्थ टाकला जातो, त्यावेळी त्या उष्ण पदार्थकडून, विरोधरूपात वा आपली उष्णता टिकवण्यासाठी जास्त उष्णता वा उष्मा बाहेर फेकली जाते. म्हणून या व्यक्तींना विरोध करणं म्हणजे त्या उष्ण जलावर एकदम थंड पाणी ओतण्यासारखं आहे. त्या मनाला, त्या जलासम, थंड होऊ द्यावं, किंवा निवळू द्यावं. म्हणून, दुर्लक्षित करणं म्हणजे त्या पाण्याला निवळू देण्यासारखं आहे. 

मन ज्यावेळी आत्मपरीक्षण करेल, त्यावेळी जाणीवा जागृत व्हायला सुरुवात होते. जाणिवांची जागृती ही अत्यंत महत्वाची आहे, कोणत्याही क्षेत्रात वा कार्यात. अर्थातच हाच प्रयोग आपण आपल्यावरही करू शकतो, जर आपण स्वतः शीघ्रकोपी असू, किंवा रागीट  असू. याच्या पुढील विचार पुढच्या भागात करूया. तोपर्यंत नामात रहा, कार्यात रहा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...