Skip to main content

भोग आणि ईश्वर २८२

भोग आणि ईश्वर  २८२ 

शांत बसण्याचा अभ्यास मुद्दामहून करावा लागतो, यातच मनाचं सामर्थ्य लक्षात येतं. म्हणूनच आपलं कार्य ती शक्ती, ते बल वा ते सामर्थ्य वळवण्याचं आहे. ऊर्जा आहेच, तिला शांत करण्याचा अभ्यास हा, मुळात त्या उर्जेला योग्य कार्यासाठी मार्गस्थ करणं , यासाठी करायचा. ज्याला इंग्रजीत channelisation म्हणतात ते करण्यासाठी मनाला आधी शांत करणं गरजेचं असतं. जसं प्रवाह बदलण्यासाठी आधी त्याला बांध घालून अडवणं गरजेचं असतं. 

म्हणून शांत बसण्याचा अभ्यास नेटाने आणि नेमाने, ठराविक काळ करणं गरजेचं आहे. कारण तरच दोन गोष्टी साध्य होतील, एक म्हणजे मन शांत होईल, जेणे करून मनाला स्थिरता येईल आणि दुसरं म्हणजे मन जे बाह्य जगतात फिरत आहे, त्याला आत डोकावून बघायची जाणीव जागृत होईल. कारण एकदा शांत झाल्यावर मनात असे अनेक विचार जागृत होतात, जे अन्यथा कधीही मनात आलेच नसतील किंवा कल्पनेत सुद्धा डोकावले नसतील. 

कारण मन हे अद्भुत रसायन आहे. त्याला पुरेसं शांत होऊ दिलं, की त्याच्या अमर्याद शक्ती व ऊर्जेने अनेक कार्य व त्या कार्यांचे विचार सिद्ध होऊ शकतात. ज्यावेळी मन शांत होईल, मनातील जाणिवांची केंद्र सुरू होतात. ज्याप्रमाणे अशांत मनात नकारात्मक व काम क्रोधादी निरुपयोगी जाणीवा जागृत असतात आणि त्या आतील सकारात्मक व सदुपयोगी जाणिवांना निद्रिस्त वा दाबून ठेवतात. किंबहुना अश्या सदुपयोगी जाणिवांची केंद्रे झाकलेली राहतात. 

म्हणून एकदा मन शांत होऊ लागलं की, ही सकारात्मक जाणिवांची केंद्रे, विचार  प्रवृत्त होऊन, सात्विक, शुद्ध, शुभ फलदायी विचार मनातून यायला सुरुवात होते. ज्याप्रमाणे नकारात्मक भावात अनेक शक्तिकेंद्रे आहेत व असतात, त्याप्रमाणे सकारात्मक भावात वा स्थितीत सुदधा मनात, अनेक शक्तिकेंद्रे असतात. त्या त्या भावात, ती ती शक्तिकेंद्रे वा स्थानं जागृत असतात आणि त्याप्रमाणे ते ते भाव विचाररुपात मनातून प्रकट होऊन, आपल्या कार्यार्थ अवकाशात भ्रमंती सुरू करतात. 

या शक्तिकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या लहरी आणि त्यासोबत असणारी ऊर्जा ही, त्या शक्तिकेंद्रांच्या जागृततेवर अवलंबून आहे. ही जागृतता मनाच्या एकग्रतेच्या स्थितीवर अवलंबून आहे. नकारात्मक भावात, संपुर्ण मनाची ऊर्जा आणि त्यासोबत सर्व शक्तिकेंद्रांची शक्ती वा बल खेचुन घेण्याची शक्ती असते. म्हणून नकारात्मक वातावरणात आपण ऋणभारित होतो किंवा आपला धनभार बऱ्याच प्रमाणात वजा होतो, हे नेहमी ध्यानात ठेवावं. 

म्हणून शक्यतो नकारात्मक वातावरणात जास्त थांबू नये आणि त्यात आपण नकारात्मक प्रवृत्तीचे वा वृत्तीचे असलो तर नक्कीच त्याचा गुणात्मक परिणाम जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणून आधी प्रयत्नपूर्वक आपल्या मनाला, शांत करणं गरजेचं आहे. म्हणजेच मनातील हा ऋणभार आणि त्यासोबत जागृत असलेली नकारात्मक शक्तिकेंद्रे शक्तीहीन व्हायला मदत होईल. आता मनाला शांत करण्याचा अभ्यास प्रयत्नपूर्वक व पूर्ण जाणिवेने करणं का आवश्यक आहे, ते लक्षात येईल आणि प्रयत्न जास्त मन लावून केले जातील. 

याचसाठी कोणताही सकारात्मक विचार वा अभ्यास, हा मन शांत न करता लगेच घाईत सुरू केल्याने आपण नकारात्मक शक्तिकेंद्रांनाच शक्ती पुरवतो आणि त्यांची कार्यशक्ती वाढवतो. म्हणून कोणताही सकारात्मक विचार, प्रयोग, योग, क्रिया वा कर्म करताना मनाला शांत करून, त्यातील नकारात्मक शक्तिकेंद्रे शक्तीहीन करणं जरुरी आहे. 

याचा पुढील विचार उद्या करूया, तोपर्यंत आपल्या मनातील सकारात्मक शक्तिकेंद्रे जागृत ठेवण्यासाठी नामाचा नित्य अभ्यास सुरूच ठेवा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...