Skip to main content

भोग आणि ईश्वर २९१

भोग आणि ईश्वर  २९१ 

भोगाच्या किंवा दुःखाच्या काळात, आपण आणि आपलं मन हे कमजोर वा अशक्त असतं.  हे नैसर्गिक आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण त्या भोगांचा किंवा दुःखांचा विचार जास्त करतो आणि मनाला अशक्त करतो. साधं उदाहरण घ्या की, शरीर अशक्त असतानाच्या काळात, आपण शरीराला अजून त्रास होईल असं न करता, आराम मिळेल या दृष्टीने विचार आणि कृती करतो. ज्यामुळे शरीर लवकर तंदुरुस्त व्हायला मदत मिळते. 

पण मनाचा आपण असा कधीच विचार करत नाही. कारण त्यावर आपण फार लक्ष देत नाही. कदाचित सर्वसामान्य परिस्थितीत हे योग्य असेलही. जसं देह स्वस्थ आणि तंदुरुस्त असताना आपण फार काळजी घेण्याची गरज नसते, तर त्यावेळी हे शरीरस्वास्थ्य टिकून राहील किंवा त्यात वाढ होईल, हे पाहतो किंवा पाहिलं पाहिजे. पण मनाच्या बाबत इतका खोलवर विचार करत नाही. कारण मुळातच ते दिसत नाही. पण ते दिसत नाही म्हणूनच त्याची जास्त काळजी आणि चिंता केली पाहिजे. 

कारण निर्गुण निराकार जे आहे, त्याची प्रत्यक्ष स्थिती ही आजू बाजूची परिस्थिती व इतर लक्षणं यावरून ताडली किंवा जाणली पाहिजे. म्हणूनच यासाठी दोन गोष्टी करायच्या. एक म्हणजे सुखाच्या किंवा उपभोगाच्या काळात, मन सहसा सुदृढ असतं. त्याची सकारात्मक शक्तीस्थानं, अश्या काळात अजून बळकट आणि पुरेशी जागृत ठेवणं, अत्यंत जरुरीचं आहे. तरच त्यांचा योग्य वापर व सकारात्मक लहरीचं प्रसारण सर्व काळ होत राहील. 

दुसरं म्हणजे, अश्या काळात मनाची ऊर्जा व शक्ती ही जास्त असते. म्हणून अश्या काळात, एकाग्रतेचा व मनाच्या स्वस्थतेचा अभ्यास करत राहिल्यास किंवा केल्यास, नकारात्मक वा भोगांच्या काळात, या ताकदीचा आणि सवयींचा स्वतःलाच उपयोग होईल. कारण असा अभ्यास वा एकाग्रता ही शक्तिवर्धक औषधासारखी आहे. म्हणजे डॉ अशक्ततेच्या काळात आधी विकार दूर करून,परिस्थिती सुधारल्यानंतर मगच टॉनिक्स वा शक्तिवर्धक पेये देतात. 

म्हणून उपभोगाच्या काळात मनाची सुदृढता वाढवून, त्याला एकाग्र होण्याच्या अभ्यासात गुंतवून घ्यावं. कारण या काळात मन, सर्व काही स्वीकारण्यास तयार असतं. एकाग्रता ही अश्या काळात मन, सहजी आत्मसात करून त्यावर उत्तम वाटचाल करू शकतं. एक उदाहरण देतो म्हणजे मुद्दा पूर्ण लक्षात येईल. ज्यावेळी चालायला गाद्या असतात, त्याच काळात काट्यांवर चालण्याचा व्यायाम किंवा सवय करून घ्यावी. कारण जर पायाला त्रास झालाच तर, मध्ये मध्ये आराम करायची सोय असते. 

यालाच इंग्रजीत right time preparation किंवा stitch in time म्हणतात. म्हणजे मग तहान लागल्या वर  विहीर खणायची आवश्यकता राहणार नाही. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी मनःस्वास्थ्य सुदृढ असेल, अश्या काळात मनाला, एकाग्रतेचा सराव व सवय करवून घेतल्यास, त्याचा सदुपयोग भोग आणि दुःखाच्या काळात होतो. अनुभवाने हे सिद्ध केलं आहे की, सुदृढ मनःस्थिती असलेले लोकच, भोगांचा आणि दुःखांचा काळ, ताकदीने, उमेदीने आणि पुरेश्या सशक्ततेने निभावू शकतात. 

शारीरिक कमजोरी जशी आजार, अपघात, दुखापत इत्यादींमुळे होते आणि तो आजाराचा काळ फक्त औषध आणि विश्रांती यातूनच पार पाडतो, त्याचप्रमाणे भोग आणि दुःख हे मनाला ग्रासणारे आजार आहेत आणि अशक्त व कमजोर मन असलेले, अश्या काळात अजूनच कोलमडून पडण्याची शक्यता असते. म्हणून आपली मनःस्थिती वा मनःस्वास्थ्य हे उत्तम राहील यासाठी मनाचे व्यायाम करत राहून मनाला सुस्थितीत ठेवणं गरजेचं असतं. 

यावर पुढील चिंतन उद्या करूया. पण हे मनःस्वास्थ्य सुदृढ राखण्याच्या कार्यातील महत्वाचा घटक असलेल्या नामाचं कार्य आपण सुरूच ठेवूया. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०)२५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...