Skip to main content

भोग आणि ईश्वर २८३

भोग आणि ईश्वर  २८३ 

आपण काल मन आणि मनातील शक्तिकेंद्र यांची माहिती घेतली. आता या शक्तिकेंद्रांचं कार्य कसं चालतं ते थोडक्यात अभ्यासूया. ऑक्युप्रेशरचा अभ्यास करणाऱ्यांना माहीत असेल की, शरीरावर बऱ्याच ठिकाणी त्वचेला लागून, विशेषतः तळहात, तळपाय आणि बोटं यांवर, शरीरातील वेगवेगळ्या भागात जाणारी आणि त्या त्या भागाचं नियोजन व नियंत्रण करणारी केंद्र आहेत. त्याचा अभ्यास केलेल्यांना माहीत असतं की कोणत्या भागावर नियंत्रण करणारी केंद्रे, कुठे कुठे आहेत. 

ज्यावेळी काही शारीरिक त्रास, विशेषतः वेदना होतात किंवा शरीरातील एखाद्या भागाचं कार्य बिघडतं, त्यावेळी त्याचं जे शक्तिकेंद्र शरीरावर त्वचेजवळ असेल, त्या केंद्राला विशिष्ट बलाने दाब दिल्यास, त्या केंद्रावर आधारित शरीराच्या त्या भागाचं कार्य काही काळात पुनः पूर्ववत होतं. हे एक शास्त्र आहे आणि माणसाला निसर्गाने वा विधात्याने दिलेल्या बुद्धीच्या जोरावर, मानवाने साध्य केलेलं हे एक यश आहे, जशा इतर अनेक, यशाच्या पायऱ्या, विज्ञानाच्या आधारावर मानवाने साध्य केल्या आहेत.

याच तत्वावर आधारित अनेक केंद्रे, मनात आहेत वा असतात. अवकाशात ज्याप्रमाणे एखादया भागात जास्त दाब किंवा कमी दाब निर्माण झाला की, इतर ठिकाणां हून, विशेषतः समुद्राकडून, जमिनीकडे गती निर्माण होऊन, वातावरणात बदल घडतात आणि उन्ह, पाऊस व थंडी असे ऋतुचक्र तयार होते. अर्थात हे सर्व,  पृथ्वीच्या फिरण्यामुळे होते, हे सर्वश्रुत आहे. मन हे याच अवकाश तत्वावर आधारित असल्यामुळे, हीच स्थित्यंतरं वा बदल मनात देखील होतात आणि प्रतिक्रिया रूपाने शरीरा कडून बाह्य जगताला दर्शवली जातात. कारण पृथ्वीमुळे देहसुद्धा फिरत आहे. त्यामुळे देहात आणि त्या अंतर्गत असलेल्या मनातसुद्धा बदल संभवतात. 

म्हणजेच ज्याप्रमाणे उन्ह पाऊस थंडी या अवकाशातील बदलाच्या प्रतिक्रिया असतात, त्याप्रमाणे देहाद्वारे घडणाऱ्या क्रिया किंवा प्रतिक्रिया वा प्रतिसाद हे मनातील बदलामुळे घडतात वा घडवले जातात. यासाठी मनात, देहाप्रमाणे, केंद्र वा स्थानं असतात. त्यावर ऑक्युप्रेशर प्रमाणेच पुरेसा दाब दिला गेला की, मनातील वातावरणात बदल घडून, त्याची प्रतिक्रिया देहावरील हावभाव विशेषतः चेहऱ्यावर, ते प्रतिसादरुपात प्रकट होतं. म्हणूनच चेहऱ्याला मनाचा आरसा म्हटलं जातं. 

यातून एक गोष्ट लक्षात आली का, वरील कथनात, मी पुरेसा दाब दिला गेला तर, हा शब्दप्रयोग केला. म्हणजेच ऑक्युप्रेशर प्रमाणेच येथेसुद्धा पुरेसा दाब दिला गेला तरच, त्या त्या शक्ति केंद्रातून तसा प्रतिसाद दिला जातो. आता यात दाब दिला गेला तर, याचा अर्थ समजावून घेऊया, म्हणजे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. मुळात मनातील त्या त्या शक्तिकेंद्रांवर, पडणारा दाब हा मनाच्या खोलीवर आहे. 

ज्याप्रमाणे पाण्यावर दगड मारताच उठणारे तरंग, त्याच्या खोलीप्रमाणे खालपर्यंत जातात. काही तरंग शेवटपर्यंत म्हणजेच तळापर्यंत जात सुद्धा नाहीत, किंवा काही पुरेश्या दाबाने न जाता विरून जातात. अगदी याचप्रमाणे आपण अतिसंवेदनशील
वा शीघ्रगतीने प्रतिक्रिया देणारे असू, त्यानुसार, एखाद्या बाह्य गोष्टीचा, घटनेचा, प्रसंगाचा किंवा एखाद्याच्या बोलाचा वा वाक्य, शब्द यांचा, पूर्ण दाब, मनातील सर्व शक्तिकेंद्रांवर पडतो. पण यावरून उठणारी प्रतिक्रिया वा प्रतिसाद, हा कोणतं शक्ति केंद्र अति उद्दीपनशील आहे, त्यावर अवलंबून आहे. 

म्हणजेच जे शक्तिकेंद्र तात्काळ उद्दीपित होतं, त्यावरून मनाच्या पृष्ठभागावर त्वरित प्रतिसाद पाठवला जातो आणि त्याचं परिवर्तन प्रतिक्रियेत होऊन, देह व देहातील इंद्रिय आणि अवयव, कार्यरत होतात. हे होताना तात्काळ मेंदूकडून त्या त्या प्रतिक्रियेचे संदेश, स्त्राव किंवा हार्मोन्सच्या रुपात पाझरून, देहाच्या त्या त्या भागाला, त्याप्रमाणे उद्दीपन मिळून, श्रुती जिव्हा वाचा, याप्रमाणे हळूहळू सर्वच अवयव यात सहभागी होऊ लागतात. 

म्हणूनच आपण बरेचवेळा बघतो की, एखाद्या रागावलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण देहाच्या, अतिजलद आणि अतिप्रमाणात, हालचाली, जिव्हा, वाचा व स्वरयंत्र यानुसार घडतात. खूपवेळा जिव्हा व स्वर यांचा प्रतिसाद जास्त असतो किंवा कधीकधी हात अथवा देहाचा प्रतिसाद जास्त असतो. ते त्या त्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून आहे. 

याचा अजून खोलात जाऊन अभ्यास करूया, पण आज इथेच थांबुया. पण नामाचा लेप लावत जा त्यानेच पूर्ण आराम मिळेल. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...