Skip to main content

भोग आणि ईश्वर २७६

भोग आणि ईश्वर  २७६ 

मुळात देह असताना देहातीत विचार करणं तेसुद्धा आत्म चिंतनातून, हा विचार सर्वसामान्य माणसाला अत्यंत कठीण काम आहे. तो का करायचा, हेच आधी कळत नाही . म्हणजे जाणीवा बाह्य जगतात गुंतलेल्या असतात, त्या वळवून आत्म जगतात केंद्रित करायच्या, हाच एक दिव्य योग आहे. कारण पूर्वापार हाच विचार दृढ होत गेला, किंवा आधुनिक विज्ञानाने असं एक मोठं गृहीतक मांडलं की, जे दिसतं किंवा दाखवता येतं अर्थात सिद्ध करता येतं तेच सत्य. म्हणजे ब्रम्ह मिथ्या जगत सत्य, असा उलट प्रकार झाला. 

हा पूर्णपणे मायेचा प्रकार आहे. माया ही सत्य आणि भास या दोन्हीमध्ये कार्यरत असते. ज्यावेळी ती जड जीवावर प्रभाव टाकते, त्यावेळी ती जीवाला जगतात गुंतवून, कार्यसिद्धी घडवून आणते. कार्य काय तर या मर्त्य जगताच्या बाहेर जडजीव, जाता कामा नये. म्हणजे जीवाला अश्या प्रकारे गुंतवायचं की, तो जगतातील कर्मात व कर्माफलाच्या पसाऱ्यात गुरफटून गेला पाहिजे. याचेच अनेक प्रकार आहेत. त्यातीलच एक म्हणजे जे डोळ्यासमोर घडतं आणि सिद्ध करता येतं ते सत्य. 

मग यातून मन हा प्रकार संशोधनाने मान्य झाला वा करण्यात आला. कारण वैज्ञानिक निकषांवर खरतर मन दिसत नाही वा दाखवता येत नाही.  पण त्याचे परिणाम, त्याचं कार्य, त्याची अमर्याद शक्ती हे सर्व ज्ञात झाल्यामुळे वा त्याचे दाखले, सिद्धता मिळत गेल्यामुळे, मन हे एक अद्वितीय व अदृश्य इंद्रिय माणसा कडे आहे, यावर विज्ञानाला विश्वास ठेवावा लागला. तरीही एक गोष्ट जी विज्ञान मान्य करत नाही किंवा करण्यास कुचराई करत आहे की, या मानवी देहाचा खरा निर्माता कोणी दुसराच असेल वा असू शकेल. कारण एकासारखाच एक असे अनेक देह मात्र एका थेंबातील लाखो शुक्रजंतूंमधून एकच योग्य योग घडवून, निर्माण करून, हे समस्त जगत अव्याहत सुरू आहे. 

यावर अजून विज्ञान विश्वास ठेवत नाही की, साच्यातून घडवल्या सारख्या एकसमान मूर्ती एकातून अनेक निर्माण करण्याकरता तितकाच सक्षम शास्त्रज्ञ, या भूमीपली कडील कोणी दुसरा असू शकेल. कारण जर हे तंत्र याच पृथ्वीवर विकसित झालं असेल, तर मग पहिला मानव कसा निर्माण झाला, हा प्रश्न उरतोच. म्हणजेच कुठेतरी दुसरीकडे या शोधाच्या प्रयोगशाळा असतील आणि त्यातून इथे हा देह तयार करण्याचं तंत्र या ग्रहावर सोडण्यात आलं असेल. 

तरीही एक प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहतो की, त्या परग्रहा वरील तो अतिप्रगत मानव कसा तयार झाला असेल. म्हणजेच कुठेतरी यात आपण एका चौकोनात परतपरत येतो की , त्याची निर्मिती कोणी केली. बर जे चैतन्य या देहात क्षणापर्यंत होतं ते अचानक लुप्त होऊन, तोच हसता खेळता देह सचेतन वरून अचेतन अवस्थेला कसा जातो. म्हणजेच काही प्रश्नांवर विज्ञानाने कितीही काथ्या कूट केला तरीसुद्धा, पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर आपण येऊन थांबणार. म्हणजे या सर्वात एक प्रकारे चकवाच आहे. जिथे चकवा असतो तिथे बुद्धिपलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. 

सृष्टीतील सर्व नियमांमध्ये सर्वात श्रेष्ठ नियम जो काळाच्या ओघात अनेकवेळा सिद्ध झाला आहे आणि ज्याची साक्ष प्रत्यक्ष विश्वनियंत्याने येऊन दिली आहे, तो नियम वा सिद्धांत म्हणजे, कर्मसिद्धांत. पुन्हा बुद्धिभेद करायचा झाला तर, याचाही एक चकवा आहे. कारण काही परिणाम प्रत्यक्ष या जन्मातील कर्माशी कोणत्याही प्रकारे, जोडता येऊ शकत नाहीत. म्हणजे मग प्रश्न उरतो कधीचं कर्म,ज्याचे परिणाम आहेत. 

विषय गहन आणि खोल आहे. आपण यावर उद्या चर्चा करूया. तोपर्यंत आपण आपली नामाची वाटचाल सुरू ठेवू. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...