Skip to main content

भोग आणि ईश्वर २८७

भोग आणि ईश्वर  २८७

खरतर मन शांत होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मनातील विचारांना मिळालेली चालना. थोडं कठीण वाटेल पण, हे खरं आहे. एखादा प्रवाह अडवला कि, त्यात अजून जोराने वाहण्याची वृत्ती निर्माण होते. याला एक शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे पुढचा प्रवाह अडला तरी मागून प्रवाह येत असतो, त्या मागच्या प्रवाहाला, पूढील अडलेला प्रवाह, मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो. 

ज्यामुळे मागून येणारा प्रवाह अजून जोरात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यात एक घर्षण निर्माण होतं. ज्यामुळे एक तणाव निर्माण होतो. म्हणूनच मनाला शांत न करता, ज्यावेळी त्याला वळवण्याचा प्रयत्न केला जातो, तेंव्हा वृत्ती जास्त जोमाने उफाळून येतात आणि केल्या जाणाऱ्या क्रियेला विरुध्द आणि जास्त वेगात दबाव येतो. मग प्रक्रिया थांबते किंवा थांबवावी लागते आणि आपण सांगतो की, मी प्रयत्न केले पण एकाग्रता येतच नाही. याला हेच कारण आहे. शास्त्रीय दृष्टीने न केलेले प्रयोग, म्हणूनच फसू शकतात. 

एक गोष्ट ध्यानात ठेवा की, या ब्रह्मांडातील, विधात्याच्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय आधार आहेच. म्हणून कोणतीही नवीन गोष्ट करताना, शास्त्रीय दृष्टीनेच केल्यास, त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच प्रथम काहीही न करता, अगदी नामसुद्धा न घेता, फक्त बसून राहण्याचा सराव काही दिवस करावा. जेणेकरून मन, नुसतं शांत बसण्यासाठी हळूहळू तयार होईल. या हळूहळू तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये मनात अनेक स्थित्यंतरं होतात, जी आपण तटस्थपणे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या विचारात आपण गुंतणार नाही. इथे आपण म्हणजे जाणीवा आणि अंतरात्मा. 

शांत बसण्याच्या या अभ्यासात, या तटस्थ वृत्तीला अनन्य साधारण  महत्व आहे. या प्रक्रियेमुळे आपण आपल्याच मनाचा अभ्यास करू शकतो. यात मनाचं उड्डाण कुठ पर्यंत होतं आणि कोणकोणत्या विषयात, मनाला रस आहे, कोणता विषय जास्त गहन आहे, जिथे मन जाऊ इच्छित नाही,कोणत्या विषयात,मन स्वस्थ राहतं कोणत्या विषयात उल्हसित होतं, कोणत्या विषयात रमत नाही, विषयात किती रमतं या सर्वांचा अंदाज,या काळात मिळेल. 

हा काळ जास्तीतजास्त बारा ते पंधरा दिवसांचा असू शकेल. फक्त हा अभ्यास, दिवसातून जितके वेळा जमेल व जितक्यांदा वेळ मिळेल तितके वेळा करावा. म्हणजे मनाला सुद्धा याची सवय होईल. या पुढील क्रिया म्हणजे, आपल्या श्वासांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये श्वासाशी निगडित सर्व अवयवांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे. पहिल्या प्रक्रियेत मन, शांत बसण्याच्या स्थितीला आलेलं असल्यामुळे, या दुसऱ्या प्रयोगात,  त्या मनाला श्वासांचा मागोवा घेण्यात अडचण येत नाही. 

श्वासांचा मागोवा घेण्याचा अभ्यास काही दिवस नित्य केल्या नन्तर, मनाला एखाद्या स्थानी वा केंद्रावर वा बिंदू वर रोखून पाहण्याचा सराव करायला लावणं. यामध्ये आपण योजलेलं केंद्र वा बिंदू, हा डोळ्यासमोर व फार दूर किंवा फार जवळ नसावा. अश्या अंतरावर व उंचीवर असावा, जेणेकरून, मानेला, एकूणच शरीराला आणि डोळ्यांना त्रास होणार नाही. असा बिंदू वा असं स्थान, याकडे पाहताना शरीराला कोणताही बाक वा अतिरिक्त ताण पडणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यावी. वरील सर्व प्रयोग, सहजासनात बसूनच करावे. 

या पुढील प्रयोगाकडे वळण्याआधी आपण आतापर्यंत पाहिलेल्या प्रयोगात घ्यायची काळजी आणि प्रक्रिया यांचा पुनः अभ्यास करू, पण पुढील भागात. नामाच्या आपल्या सरावातील हे महत्वाचे टप्पे आहेत, तरीही नित्य नाम सोडू नये, त्यात खंड पडू नये. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०)२५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...