भोग आणि ईश्वर २९०
मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास खरतर मुद्दामहून करावा लागणं, यातच आपला मनावर नियंत्रण नाही,हे सिद्ध करतं. तरीही त्यात काही गैर न मानता,आपण हा अभ्यास आणि सराव सुरू करावा यातच हित आहे. कारण मन शांत, उल्हसित आणि प्रफुल्लित ठेवणं हे आपल्यासाठी लाभकारी आहे. कारण बरेचसे दोष, दुर्गुण वा काही काही आजार जसं रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इत्यादी, अशांत मनामुळे होतात आणि त्यामुळे चुकीची संप्रेरके अर्थात हार्मोन्स पाझरून, त्यामुळे शरीराची अंतर्गत हानी हळूहळू होत जाते.
या हानीबद्दलची जाणीव, एखादा गंभीर आजार उद्भवला की मग लक्षात येतं वा आणून दिलं जातं. माणसाचं आयुष्य खरतर दोन प्रकारांनी पुढे पुढे जातं. एक म्हणजे प्रारब्धातील पुढे आलेले भोग आणि उपभोग अर्थात दुःख आणि सुख. दुसरं म्हणजे निहित किंवा अपेक्षित कर्म. या दुसऱ्या भागाबद्दल आपण फार गंभीर नसतो. आपण जास्त महत्व प्रारब्धातील दुःख आणि सुख यांना देतो किंवा त्याबद्दलची आपल्या मनातील जाणीव जास्त जागृत असते.
याचं कारणसुद्धा तसंच आहे. मुळात आपलं भविष्य आपण जास्त महत्वाचं मानतो. किंबहुना आर्थिक दृष्टीने स्थैर्य, पुरेशी गुंतवणूक व उत्तर आयुष्यासाठीची तरतूद करून ठेवणं यात गैर काहीच नाही. पण आज आपला वर्तमान मागील बाकी चुकती करण्यात जात असेल, तर आपण त्यावर आपलं निहित किंवा अपेक्षित कर्म न ठरवता, त्याच्या परिणामस्वरूप जे आपल्या मनाला, विचारांना सुचेल त्यानुसार कर्म करत जातो. ज्यामुळे मनावर, आत्मशक्तीवर आणि अर्थात देहातील मी यांवर अतिरिक ताण पडतो.
मला काय म्हणायचं आहे, हे आपण जरा विस्तारपूर्वक पाहू, म्हणजे वरील मुद्दा लक्षात येईल. साधारण भोगांचा किंवा दुःखाचा काळ आला की आपण इतर कोणी, बाह्य शक्ती, आपल्याला जाणवलेली असूयेने पाहणारी माणसं, सभोवताली असलेल्या नकारात्मक लहरी व तरंग या सर्वांना दोष देतो आणि खरतर आपलं मानसिक समाधान करून घेतो. मुळात हे सर्व बाह्य घटक वा external factors हे सहाय्यकारी समजुया.
म्हणजे आज परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे या घटकांची बेरीज ही नकारात्मक परिणाम करत आहे. पण मुळातच आपल्या कर्मातील फलस्वरूप जे प्राप्त होत आहे किंवा ज्या कर्मफलामुळे ही परिस्थिती आली आहे, त्याचा लाभ या घटकांना मिळत आहे आणि अश्या प्रत्येक परिस्थितीत असे बाह्य घटक नेहमीच मोक्याचा फायदा घेणारे असतात, हा तर जगाचा नियम आहे, कारण अवकाशातील तरंगांच्या दोलायमान स्थितीवर, बहुतेक मनांची स्थिती अवलंबून असते.
पण मग अश्या स्थितीत आपलं निहित किंवा अपेक्षित कर्म न करता, आपण स्वतः दोलायमानाच्या या लाटेवर स्वतःला झोकून, आपल्या मनालासुद्धा दोलायमान करतो आणि कर्मफल भोगत असतानाच, कर्माच्या चुका करत जातो. खरतर, अश्या वेळी किंवा अश्या काळात, अपेक्षित हे असतं की आणि आपण हे जाणलं पाहिजे की, आपले भोग हे मुळातच आपल्याच मागील एखादया किंवा काही कर्मांचा फलस्वरूप परिणाम आहे तो येणारच. पण अश्यावेळी मन कमजोर वा अशक्त किंवा दोलायमान न करता, त्याला सशक्त कसं करता येईल, याचा विचार करून, मनाला शांत ठेवून सशक्त केलं पाहिजे.
त्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे, हे उद्या जाणून घेऊ, जेणेकरून आपण चुका वाढवून, भविष्यासाठी, प्रश्न अजून बिकट करणार नाही. यात जाणिवांना जागं करणं महत्वाचं आहे. म्हणून नामाचं कार्य सुरू ठेवा,ते अत्यंत आवश्यक आहे.
प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०)२५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment