Skip to main content

भोग आणि ईश्वर २८०

भोग आणि ईश्वर  २८०

मनाची एकाग्रता साधून, त्यायोगे मनाला उथळपणातून सखोल पणाकडे नेण्यासाठी विशिष्ट प्रयत्नांची गरज असते. मुळात चंचल मन हे उथळ पाण्या सारखं असतं. वाहात वाहात कुठे जाईल ते सांगता येणार नाही. पाण्याचा असा उथळ प्रवाह हा , वाट मिळेल आणि फुटेल तिथे जातो. थोडक्यात जशी वाट मिळेल तसा वाहात जातो. विशिष्ट नियमात बांधला जात नाही. 

उथळ प्रवाह थांबवणं महत्वाचं असतं, तरच त्याला विशिष्ट दिशेने वळवता येतं. त्यासाठी बांध घालून, पाटाची उंची व रुंदी वाढवली जाते, जेणेकरून प्रवाहाला खोली येऊन, पाण्याची गती कमी होईल. याच तत्वांचा अंगीकार करून, चंचल मनाला, सखोल, विचारी आणि विवेकी बनवता येईल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, खोली म्हणजे प्रथम मनाची लवचिकता वाढवणं आवश्यक आहे. 

एखादया रागीट वा क्रोधीत, अर्थात शीघ्रकोपी व्यक्तीचं वागणं हे अनुमानीत म्हणजे predict करणं खूप सोप्प असतं. अशी व्यक्ती आता रागावणार, याचा अंदाज आजूबाजूच्या लोकांना सहजी बांधता येतो. अव्यक्त राहणं हे या लोकांना जमत नाही. याचा सरळ अर्थ असा असतो की,  अश्या व्यक्ती अविचारी वा अव्यवहारीक असतात. एका ठराविक पातळीनंतर आजूबाजूचे यांना जास्त किंमत देत नाहीत. याचादेखील या लोकांना राग येऊ लागतो. 

अश्या लोकांना दुर्लक्षित केलं तर त्यांचा क्रोध अहेतुक इतर गोष्टींवर व इतर व्यक्तींवर निघू शकतो किंवा निघतो आणि लक्ष दिलं तर, यांना असं वाटतं की, आपली किंमत समोरच्याला जाणवली. यातून मार्ग काढण्याचा सोप्पा उपाय व मार्ग म्हणजे, यांना एकाग्र करण्याचा प्रयत्न करणं. खरंतर हे कठीण आहे, कधीकधी अशक्य सुद्धा वाटतं. पण यावर उपाय आहे, तो म्हणजे यांना यांच्या आवडीच्या गोष्टी, सुरवातीला करायला लावून, यांना त्यातील एकाग्रतेचा आनंद घेऊ देणं. 

या एकाग्रतेची जाणीव जागृत होऊन, त्या एकाग्रतेची सवय होऊ लागणं महत्वाचं आहे. म्हणून सुरवातीला त्यांना त्यांच्या आवडीच्या कार्यात व्यग्र करणं. मूलतः अश्या व्यक्ती हटकून आळशी स्वभावाच्या असतात आणि त्यात भंग झाला की, यांचा पारा चढतो. त्यामुळे यांना प्रिय गोष्टीत रमू द्यावं, अजिबात रसभंग न होऊ देता, त्यांना त्याचा मनमुराद आनंद घेऊ द्यावा. मनाचं एक वैशिष्ट्य आहे की, त्याला हटकलं की ती गोष्ट हटकून करणार आणि दुर्लक्षित केलं की, आकर्षित करून घेणार. 

पण मनाला त्याच्या मनाप्रमाणे वागू दिलं, की ठराविक काळा नंतर, त्याच गोष्टींचा कंटाळा येतो, मन दुसरं काही लक्ष वा केंद्र किंवा ध्यान आकर्षित करून घेण्याचा किंवा त्याकडे ओढलं जाण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे, हा प्रथमोपचार म्हणून सुरू करावा आणि काही दिवस असंच होऊ द्यावं आणि हीच स्थिती स्थिर राखावी. 

यापुढील उपाय उद्या पाहूया. पण नामात रहा, त्याचा पिच्छा सोडू नका. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...