Skip to main content

भोग आणि ईश्वर २७५

भोग आणि ईश्वर  २७५ 

देहातील प्रवेश, देहात आल्यानंतर उदरातील नऊ महिने आणि प्रत्यक्ष जगतातील दृश्यरुप प्रवेश हेच खरतर मुख्य टप्पे आहेत, जिथे आत्म्याच्या जाणीव हळूहळू सुप्त होत जाऊन, तिथे देह या संकल्पनेच्या जाणीवा निर्माण होऊन त्यांना अंकुर फुटतो. स्थूल मानाने, जोपर्यंत प्रत्यक्ष मेंदू आणि मज्जासंस्था तयार होत नाहीत तोपर्यंत जगतातील संदेश वा लहरी किंवा भाव ग्रहण करण्याची शक्ती जागृत झालेली नसते. त्यामुळे बाह्य जगतातील विशेषतः माया आणि षड्रिपूंच्या जाणीवा जागृत नसतात. 

म्हणूनच, ज्या लहरी गर्भात पोचतील वा येतील त्या ग्रहण करण्याची क्षमता, मेंदू आणि मज्जासंस्था निर्माण झाल्या नंतर निर्माण होऊन, वृद्धिंगत होत जाते. याचकारणाने, आपल्याकडे गर्भसंस्कार हे पूर्ण विकसित शास्त्र अस्तित्वात आहे आणि त्याचा प्रसार पुराणकाळापासून आजतागायत, पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. किंबहुना आता आधुनिक वैद्यक शास्त्रानेसुद्धा, गर्भ संस्कार ही संकल्पना, पुरेशा संशोधनाने मान्य केली आहेच. 

आता तर डॉ सुद्धा गर्भसंस्कारांचं महत्व, निदानानंतर, गर्भवती आणि तिच्या घरच्यांना समजावून सांगतात. म्हणजेच जे पुराण काळापासून रूढ आहे, त्याकडे आधुनिक विज्ञान, संशोधनाने का होईना पण वळले आहेच. म्हणजे बाह्य जगताचे संस्कार, गर्भावर व गर्भात असतानाच घडत जातात. त्यामुळे देहरूपात आत्मा उदराबाहेर येताना या जगताचे संस्कार घेऊनच, जीव या जगात येतो. 

आपण त्यावर पुन्हा, तो देहरुप आत्मा, बाहेर आल्यावर, आपापल्या पद्धतीने संस्कार घडवतोच. एकूण या सर्व संस्कारांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण या देहाचे वा जगताचे आहोत आणि या जगतातील स्थायी घटक असून आता इथेच आपले वास्तव्य आहे. म्हणून जाणीवा फक्त या जगताला, देहाला आणि दृश्य स्वरूपात असलेल्या व दिसणाऱ्या गोष्टी, व्यक्ती व अखिल जगत याला आपलं मानून, त्यावर प्रेम करतं. 

या जाणीवा इतक्या दृढ व घट्ट असतात की, एखादी अनपेक्षित गोष्ट, परिणाम वा घटना घडल्यानंतर, आपण या गोष्टींचा विचार करतो, की अरे हे तर मी कधीच केलं नव्हतं. मग हे माझ्या वाट्याला कसं काय आलं. खरे भोग आणि पडता काळ आला की माणूस आत्मचिंतन सुरू करतो. यातून काही ज्ञान हाताला लागतं आणि जाणीवा अंतर्मुख होतात. पण हे सर्व तोपर्यंतच चालतं, जोपर्यंत आपण अश्या परिस्थितीत वा फेऱ्यात असतो. 

ही अंतर्मुखता, तात्पुरती असते. म्हणजेच परिस्थितीवश असते. याचाच अर्थ ज्यावेळी परिस्थिती पालटते, त्यावेळी माणूस आत्मचिंतानातून पुन्हा बाह्य जगतात प्रवेश करतो आणि पुन्हा एकदा भौतिक जगत, षड्रिपु व माया या खेळात रमून जातो. ज्यांना परिस्थिती काही चकवे देतं,त्यांना ही अंतर्मुखता निदान काही काळ आत घेऊन जाते. पण ज्याचं आयुष्य, पूर्वपुण्ययी व संचित या योगाने पूर्ण सुखासीन जातं, त्यांना ही आत्मचिंतनाची जाणीव, सहसा, कधीच येत नाही. 

म्हणजे ही आत्मचिंतनाची जाग येणं, हा एक खूप मोठा योग माणसाच्या पूर्वकर्मावर व सचितावर आणि या जन्मातील कर्मांवर अवलंबून आहे. म्हणजेच कर्माचा प्रवास भौतिक जाणिवांमधून सुरू होतो. तो आपल्याला न्यायचा आहे, आत्मज्ञानाच्या जाणिवांकडे. अर्थात हा प्रवास मुद्दाम घडवावा लागतो. म्हणजे कर्म तर करायचं आहे, पण त्यातील जाणिवांचा रंग पालटायचा आहे. 

याचसाठी मन बुद्धी यांना शुद्ध करून व जाणीवाना जागृतीकडे नेण्याचं महत्वाचं कार्य घडवून आणणं, यालाच आध्यात्म शास्त्र म्हणतात. यावर पुढील भागात चर्चा करूया. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...