Skip to main content

भोग आणि ईश्वर २९४

भोग आणि ईश्वर  २९४ 

मनःपटलावर एखादी अस्फुट किंवा अगदी सुप्त टिचकी जरी मारली गेली, तरी ती मनातील ज्ञानेंद्रियांच्या अग्रावर स्पर्श करून, त्या विचारांची जाणीव जागृत करते. म्हणजे येणारी वा पाहिलेली अथवा ऐकलेली अर्थात काया, श्रवणेंद्रिय,  दृष्टी, घ्राणेंद्रिय व त्वचा यांसह कोणत्याही ज्ञानमार्गाने आत आलेल्या लहरी, मेंदुसह मनाच्या पटलावर स्पर्श ते आघात करून, आतील जाणिवांची केंद्रे जागृत करतात. पुन्हा स्पर्श की आघात हे मनाच्या अवस्थे वर अवलंबून आहे. 

त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या स्थितीनुसार ती ती जाणिवांची केंद्रे जागृत होऊन, मनाला त्या त्या गोष्टीचे आकलन होते. त्यानुसार त्या त्या जाणिवांच्या केंद्रातून त्या त्या शक्तिकेंद्रांना चालना मिळते आणि त्या क्षणी जागृत झालेल्या शक्तिकेंद्रातून,ते ते भाव प्रकट होऊन, मनःपटलावर आणि तद्नंतर देहाच्या ज्ञानेंद्रियां द्वारे प्रतिक्रिया वा प्रतिसाद दिला जातो. 

म्हणजे एकाच घटनेचे व्यक्तिपरत्वे वेगवेगळे भाव प्रकट होतात. म्हणजे वीज चमकून प्रकाश व तद्नंतर आवाज आल्यानंतर, एखादी व्यक्ती भीती व्यक्त करेल किंवा एखादी व्यक्ती आश्चर्य किंवा अद्भुतता व्यक्त करेल. या दोन्हींच्या मध्ये एखादी व्यक्ती नुसतं पाहून, पुन्हा आपल्या कामाकडे किंवा वाचन वा श्रवण याकडे वळेल. 

हे असं कसं असा प्रश्न आपल्याला अगदी त्याक्षणीसुद्धा पडू शकतो. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे, त्या दृश्य व आवाज यांच्या लहरी मनातील जाणिवांना स्पर्श करून, मनातील जागृत ज्ञानेंद्रियांच्या केंद्रांना उद्दीपित करून, ती ती प्रतिक्रिया वा प्रतिसाद देते झाल्या. मग एखाद्याची प्रतिक्रिया योग्य आणि एखाद्याची अयोग्य असं सरसकट ठरवता येणार नाही. पण मनाच्या अवस्थे वर, ती ती प्रतिक्रिया अवलंबून आहे. 

अजून एक उदाहरण घेऊ. एखाद्या ठिकाणी एखादी बॉंबस्फोट सदृश घटना घडली आहे. त्याची त्वरित प्रतिक्रिया भीती, आश्चर्य, आघात यांसह फक्त एक घटना इथपर्यंत काहीही असेल. त्यावर प्रतिसाद हा व्यक्तीच्या जाणिवांची कोणती केंद्रे जागृत आहेत, यावर अवलंबून आहे.  उदाहरणार्थ, सर्वसामान्य माणूस त्वरित आपली सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिथे पळायला सुरवात करेल, तर एखादी व्यक्ती इतरांना वाचवण्याचा प्रयत्न वा कार्य सुरू करेल. 

आता ही दुसऱ्या प्रकारातील व्यक्ती, एकतर पोलीस किंवा लष्करातील जवान, किंवा एखादा समाजसेवक वा सामाजिक जाणीवा जागृत असलेला, असू शकेल. कारण एकतर धाडस हे त्यांच्या स्वभावात असतं, तेच तिथे जातात आणि त्याप्रकारचे प्रसंग हाताळायचं प्रशिक्षण आणि अनुभव त्या व्यक्तीकडे असेल. म्हणजेच ज्ञानाने, सरावाने आणि अनुभवाने, मनातील योग्य ती  ज्ञानेंद्रिये व जाणिवांची केंद्रे जागृत करून, अयोग्य केंद्रे बंद करता येतात. जेणेकरून इतर लहरींबाबतची संवेदना केंद्रे सुप्त होतात. 

याच तत्वांचा वापर एखाद्याचा बुद्धिभ्रम किंवा ब्रेन वॉश करताना केला जातो. सतत वा कायम एखादं दृश्य वा आवाज डोळे आणि कान या ज्ञानेंद्रियांद्वारे मनःपटलावर आघात करून, चुकीच्या जाणीवा जागृत केल्या जातात. त्या जाणिवांचं रूपांतर नंतर मतांमध्ये परिवर्तित होऊन व्यक्ती चुकीच्या मत प्रणालीकडे वळते. 

मला वाटतं की, अतिरेकी घडवताना आणि धर्म परिवर्तन करताना याच गोष्टीचा वा तत्वाचा वापर होतो, जो योग्य वेळेत योग्य ज्ञान देऊन थांबवता येतो वा येऊ शकतो. असो. पण यातून एक गोष्ट लक्षात येते की, या जाणीवा चुकीच्या वा बरोबर किंवा योग्य वा अयोग्य असतात, हे कसं काय समजतं किंवा ठरवलं जातं अथवा ठरवावं,, यावर उद्या चर्चा करूया. तोपर्यंत नामाच्या आपल्या जाणीवा आणि त्या ज्ञानांची केंद्रे जागृत करण्याचा व जागृत असलेली केंद्रे जागृतच ठेवण्याचा आपला प्रयत्न सुरूच ठेवा. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...