Skip to main content

भोग आणि ईश्वर २७९

भोग आणि ईश्वर  २७९ 

मागील भागात आपण वातावरणाशी निगडित दोन प्रकार पाहिले. यातील तिसरा प्रकार म्हणजे निरभ्र आकाशा प्रमाणे स्वच्छ मन, स्वच्छ विचार, स्वच्छ प्रकाशमय अंतःकरण आणि गुंतारहित प्रकटीकरण. या वातावरणा तील विचारांची व्यक्ती, स्वच्छ सुर्यप्रकाशित आकाशा प्रमाणे, उत्तम ज्ञान व विचार यांची बैठक असलेली असते इथे विचारातील कोणत्याही गोंधळाला वाव नसतो किंवा तसा काही गोंधळ होण्याचा संभव नसतो. 

म्हणजेच ही पारदर्शी विचार असलेली आणि कोणत्याही परिस्थितीत मताचा, मनाचा, विचारांचा आणि निर्णयाचा गोंधळ होऊ न देणारी माणसं असतात. अश्या व्यक्तींशी बोलल्यावर आपल्या मनातील शंका, प्रश्न दूर होऊन, वैचारिक गोंधळ दूर होण्यास मदतच होते. म्हणून अश्या व्यक्तींशी मैत्री असल्यास आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं. कारण अश्या व्यक्ती मनाने स्वच्छ आणि विचाराने तर्कशुद्ध असतात. 

पण अश्या प्रकारचं व्यक्तमत्व मिळायला किंवा मिळवायला मन कणखर, खंबीर, ठाम, तटस्थ, संतुलित, स्थिर असणं महत्वाचं आहे. यासाठी मूळ तयारी म्हणून मनाची स्थिरता साधणं गरजेचं आहे. अशी स्थिरता तेंव्हाच साध्य होऊ शकते ज्यावेळी विचारांची गर्दी कमी होईल आणि योग्य व अयोग्य विचार, आवश्यक व अनावश्यक विचार अशी विभागणी करण्याची सवय मनाला लावून घेतली जाईल. 

अशी सवय मनाला तेंव्हाच लागेल जेंव्हा मनात आलेला प्रत्येक विचार, विचारपूर्वक पारखायची सवय लागेल. म्हणजे नक्की काय तर, प्रत्येक विचारांच्या मागे न जाता, त्यांना तोलण्याची सवय आणि पद्धत जडवून घेतलेली असेल. त्यासाठी मनाला शांत करणं प्रथम क्रमप्राप्त आहे. शांत मनात चलबिचल नसते, त्यामुळे त्या मनात उथळ व उत्शृंखल विचार न येता, विचार पूर्वक विचार निवडायची सवय व आवड लागेल. 

असा विचारपूर्वक विचार निवडणं म्हणजे जाणीवपूर्वक मनाला सखोल विचारांची सवय लावून घेणं. सखोल विचार माणूस तेंव्हाच करेल, ज्यावेळी कोणत्याही निर्णयासाठी आवश्यक ज्ञान माहिती व  पूर्वतयारी करण्याची मनाला सवय लावली जाईल. म्हणजेच ज्ञान, पुरेशी माहिती, पूर्वतयारी, सखोल विचार, मनाची शांतता, आत्मविश्वास या सर्वांना माणूस आत्मसात करेल. 

हे तेंव्हाच शक्य आहे ज्यावेळी मन पूर्णपणे सक्षम व खंबीर असेल, जाणीवा पूर्ण जागृत असतील, मनात कोणतेही विकार नसतील आणि मन सशक्त असेल. सशक्त शरीराप्रमाणे, सशक्त मनसुद्धा महत्वाचं आहे. मन सशक्त तेंव्हाच होईल, ज्यावेळी लालसा, असूया, क्रोध, अनिष्ट इच्छा व आकांक्षा नसतील आणि मन वासनारहित असेल. 

जसं शरीर सुदृढ करायला पुरेसा व्यायाम व उत्तम आहार जरुरी आहे, त्याप्रमाणे मनाला सुद्धा योग्य व्यायाम आणि उत्तम आहार आवश्यक आहे. पण ही प्रक्रिया गरजेची आणि पूर्वतयारीची आहे. तरीही ती सवयीने, प्रयत्नाने व प्रयासाने साध्य होऊ शकते. यासाठीचे उपाय, पद्धती आणि पूर्वतयारी, पुढील भागात बघूया, ज्यायोगे हे साध्य होऊ शकेल. तोपर्यंत आपण नाम घेतच राहू, कारण त्यातून अनेक योग साध्य होतात. 

भाग २ मंगळवार पासून वितरित करायला सुरुवात होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...