Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०४ - कर्माचं वेष्टन

भोग आणि ईश्वर  ३०४ - कर्माचं  वेष्टन 

कर्म आणि कर्मफल हा विषय, आपण, खोलात जाऊन बघत आहोत. आपण आयुष्यात केलेलं प्रत्येक कर्म हे, त्याच्या पाठी मागे लावलेले भावभावना, वासना, माया, षड्रिपु, धनभार ऋणभार या सर्वांचं बल, ऊर्जा, शक्ती, ओज घेऊन त्रिखंडातील त्या त्या भावाच्या कार्यशक्तीला स्पर्श करून, कर्त्याच्या दिशेने परत येतं. हे जाणणं हीच, आयुष्यातील खूप मोठी उपलब्धी आहे. 

कारण एकदा हे जाणलं की, प्रत्येक कर्म करताना, त्याला कोणतं बल, ऊर्जा, वासना यांच्या वेष्टनातून पाठवायचं, हे ध्यानात राहील. म्हणजे आपण कर्माला बल, वेग, दिशा देतोच, पण त्याबरोबर त्याला वेष्टन किंवा पॅकिंग करून पाठवतो. हे पॅकिंग त्यामागे लावलेली सकारात्मक वा नकारात्मक भाव भावना, माया, मोह-लोभ, इत्यादींचं असतं. विधाता हा एक उत्तम प्राप्तकर्ता म्हणजेच receiver आहेच, पण तो एक उत्तम देता अर्थात sender सुदधा आहे. 

तो परतावा देताना वेष्टनाची कोणतीही अदलाबदल न करता, कर्मफल, आपल्यापर्यंत त्याच वेष्टनातून पोचेल, याची उत्तम व्यवस्था करतो. यात दोन गोष्टी नवीन जाणल्या आपण. एक म्हणजे आपल्या कर्माला लावलेलं वेष्टन आणि पुन्हा परतावा आपल्याकडे येणं. आता असा विचार करा की, एखाद्याने आपल्याबद्दल द्वेषपूर्ण उद्गार वा कृती केली आणि त्यांचं कर्म त्याने तयार करून, त्याच्या कर्मफलाच्या यादीत त्या वेष्टनातून अवकाशात विधात्याकडे सुपूर्द केलं. 

उत्तम व्यवस्था असलेला विधाता, योग्यवेळी त्याचा योग्य परतावा त्याला देईल, हे नक्कीच. फक्त ती योग्यवेळ कोणती हे त्याचं कर्म, त्याचं बल आणि त्या व्यक्तीच्या संचितातील जमा पुंजी यावर अवलंबून राहील. पण आपल्याला त्याचा विचारही करायची आवश्यकता नाही. कारण असा विचारसुद्धा आपलं कर्म ठरतं आणि तो परिणाम बघायला आपण त्यावेळी तिथे उपस्थित केले जाऊ शकतो. पण असं झालं तर काय किंवा आपली निंदा करण्याच्या त्याच्या कृतीवर, आपण लगेच क्रोधीत वा हताश होऊन, प्रतिक्रिया दिली तर काय परिणाम होतील, ते पाहू. 

आपण जर त्याला मिळणाऱ्या अनिष्ट कर्मफलाचा परिणाम पाहायला तिथे असलो आणि हे याच जन्मात घडलं तर, तिथे उपस्थित असताना, आपण स्थितप्रज्ञ नसल्यामुळे, काहीही गैर भाव व्यक्त केले, अगदी मनात सुद्धा, तरी त्याचं एक नवीन कर्म, त्या भावाच्या वेष्टनात लपटून आपण विधात्याच्या हाती सुपूर्द करतो. असं करून पुन्हा एक साखळी तयार होईल. बर पुढे हा परिणाम किंवा फल आपल्याकडे परत आल्यानंतर, ते बघायला तो उपस्थित असलाच तर, या जन्मात पुन्हा एक साखळी तयार होईल. 

दुसरा विचार असा, जर त्याच्या पहिल्या कृतीवर तिथेच आपण react झालो तर, मग आपण आपोआप कर्मबद्ध झालोच. म्हणजे कर्माची साखळी, त्याला कर्मफल मिळण्याआधीच, आपण तयार केली, असं होईल. कारण आपण त्याला राग लोभ, हताशपणा अश्या ज्या भावाने react होऊ, तो तो भाव आपलं वेष्टन लपेटून, विश्वाशक्तीकडे जाईल. 

म्हणजे पुन्हा कर्मबद्धता आली. बर आपल्या संचितात धनभार कमी असेल आणि आपण व्यक्त केलेल्या रागाची तीव्रता व वेग, संचितातील ऋणभाराने, अतितीव्र होऊन, आपलीच हानी व्हायची. त्यावेळी आपण पुन्हा म्हणू की, बघा त्याला काहीच झालं नाही, वर नुकसान माझंच झालं, कलियुगात वाईटाचं वाईट होत नाही, उलट चांगल्याच्या पाठीच देव लागतो, इत्यादी इत्यादी. 

म्हणजेच आपण कसे react होऊ, हे आपण नियंत्रित करणं, आवश्यक ठरतं. म्हणजे आपल्या कर्माचं किंवा प्रतिक्रियेचं वेष्टन आपणच ठरवू शकतो आणि आपणच ठरवतो. बर आपण फेकलेल्या त्या चेंडूला गती, फिरकी फक्त आपणच देतो का, तर तसं नाही. आपण जर क्रिकेट बघत असाल, तर हे नक्कीच माहीत असेल की त्यावेळी असलेली हवा किंवा वारा, बाष्प इत्यादी सर्व त्याला वेग व फिरकी देतात. कर्माचं देखील तसंच आहे. पण यावर उद्या विचार करूया. आपण नामातून साधत असलेला भक्तियोग असाच सुरू राहूदे. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्या मुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...