Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

भोग आणि ईश्वर १५१

भोग आणि ईश्वर  १५१    खरतर नाम घेण्यात अडचणी, आपण अर्थात आपलं मनच निर्माण करत असतं आणि मनाला यासाठी भरीला पाडते माया आणि षड्रिपु. वास्तविक हे बाहेर नसतातच, तर आतच ठाण मांडून बसलेले असतात. ज्या ज्यावेळी त्यांना आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं दिसतं, त्या त्यावेळी ते बंड करून उठतात. पण बंड करतात म्हणजे नक्की काय करतात, तर अश्या अश्या युक्त्या वापरून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की आपण हतबल होऊन म्हणतोच , हे काही माझं काम नाही, असं म्हणून सोडून देतो. वास्तविक अशक्य आणि हतबलता हे शब्द मानवी कर्मांना लागू होत नाहीत, इतकी अचाट आणि अफाट इच्छाशक्ती आणि मनोनिग्रह मानवाला वरदान स्वरूपात प्राप्त झाले आहेत, इतके की, नराचा नारायण होऊ शकतो. इतकी मोठी झेप साधा मानव घेऊ शकतो, तो फक्त मनोनिग्रह आणि इच्छाशक्ती या पाठबळावर. ही दोन कर्मरथाची दोन अंग आहेत.  या जोडीच्या आधारावरच अनेक विक्रम मानवाने संपूर्ण विश्वात प्रस्थापित केलेत. बऱ्याच हिंदी चित्रपटात घासून पुसून गुळगुळीत झालेलं  एक वाक्य अजूनही असतं. ते म्हणजे तुम अगर चाहो तो क्या कुछ नही कर सकते. हे खऱ्या अर्थाने प्रोत्सा...

भोग आणि ईश्वर १४८

भोग आणि ईश्वर  १४८    खरतर नाममार्गी झाल्यानंतर सर्व भोगांचा दुःखांचा आणि चिंतांचा अंत व्हावा किंवा होईल अशी धारणा असते. म्हणजे मी नाम घ्यायला सुरुवात केली म्हणजे आता कोणतीही संकटं मला त्रास देता कामा नयेत आणि जर संकटं आलीच तर मग नाम घेण्यात काय अर्थ असा एक समज वा अपसमज असतो.  मुळात इथे एक लक्षात घ्या नाम हा सौदा नाही किंवा व्यवहार नाही की, इस हात लो और उस हात दो. मुळात परमार्थ हा व्यवहाराच्या विरुद्ध आहे किंवा असतो आणि व्यवहाराचे नियम इथे उलट लागू होतात. म्हणजे इथे एकमार्गी देणं फक्त ज्ञात असलं पाहिजे, एखाद्या साधकाला वा भक्ताला. पण आपण काही अपेक्षा ठेवता कामा नयेत. हा झाला पहिला नियम वा निकष, खरा नाममार्गी असण्याचा. दुसरं इथे केलेल्या कर्माचं मोजमाप होता कामा नये. किंवा करता कामा नये.  कारण व्यवहारातील आणि कालचक्रातील कर्म सिद्धांत सांगतो की कर्म कर फ़ल मिळेल, पण कधी ते माहीत नाही, इतकंच. पण भक्ती, नाम साधना या संज्ञा सर्व परिमाणं आणि सिद्धांत यांच्यापलीकडे असल्यामुळे आणि तिथे आपल्या इष्टदेवतेच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असल्यामुळे त्या मार्गात मोजमाप चालत नाही....

भोग आणि ईश्वर १५०

भोग आणि ईश्वर  १५०   एखादा गहन विषय घेऊन सलगपणे त्यावर १५० दिवस लिहिणं,हे केवळ माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाप्रसादाचा आंज वाचक प्रतिसादाचा परिणाम आहे. अन्यथा १ डिसेंबरला सुरू झालेला हा लेखन प्रवास पहिल्या भागाच्या पुस्तक प्रकाशनापर्यंत आणि वाचकांच्या उदंड प्रतिसदपर्यंत पोचलाच नसता. हनुमान जन्मोत्सवाला एका दिवसात  मी, सौ, मुलगी, माझी मेव्हणी आणि भाचा आम्ही मिळून जवळजवळ २०० पुस्तकाचं पॅकिंग आणि कुरियर वितरण केलं.हे सुद्धा स्वप्नवत वाटावं असं घडलं.  काल कुरियर वाल्याने सर्व पार्सल्स नेऊन वितरणाची व्यवस्था केली आणि एका कार्याची कृतकृत्यता घडल्याचा आनंद मिळाला. आता श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या पुस्तकावर काम सुरू केलं आहे. सर्व गोष्टी जुळून आल्यास, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यासंबंधी आगाऊ नोंदणीची सूचना इथेच पोस्ट करीन. असो. आता विषयाकडे वळूया. मुळात आपण विषयाचा आनंद घेतो त्यावेळी,  वासनेच्या जोरावर वा शक्तीमुळे मन तिथे खेचलं जातं आणि नकळतपणे एकाग्रतेने काम होतं. या वासनांमध्ये काम क्रोध मद मत्सर इत्यादी सर्व वासना सामावलेल...

भोग आणि ईश्वर १४९

भोग आणि ईश्वर  १४९   नामात गोडी येत नाही अशी एक सर्वसामान्य तक्रार येते. खूप नेटाने करतो, पण मन लागत नाही. असंही काहीजण म्हणतात. यात खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण नामासाठी नाम घेत नाही तर मनातील इच्छेप्रमाणे वा कधीकधी अनिच्छेने नाम घेतो,असा याचा अर्थ आहे. कदाचित नाम हे येता जाता जमलं तर किंवा गरजेचं आहे,  पण मनाला समजावता न आल्यामुळे, आपण मनाचा पूर्ण सहभाग नसताना किंवा मनाचा सहभाग गृहीत धरून घेतो. इथे आतला मी डोकावतो असं माझं मत आहे. मी यासाठी की, मुळात मन गुंतवलं तरच आत्मा यातून आनंद घेईल वा घेऊ शकेल. त्यामुळे मन पूर्ण गुंतलं नसताना वा सहभागी नसताना केलेली कोणतीही कृती निश्चित परिणाम साधणार नाही, हे तर सर्वमान्य आहेच. मग व्यावहारिक वा भौतिक जगतात हा नियम आहेच तर आध्यत्मिक बाबीत मनाच्या सहभागाशिवाय कसं सर्व साध्य होईल. अनंतापर्यंत असलेल्या या आत्म्याच्या प्रवासात देहातील सर्वात महत्वाचं इंद्रिय, जे मन आहे, ते जर पूर्णांशाने सहभागी नाही झालं, तर काहीच साध्य होणार नाही. अर्थात मनाच्या सहकार्याशिवाय व सहभागाशिवाय केलेलं नाम हे कधीही लक्षाप्रत पोचणारच नाही. कारण स्वतः पुरुषो...

भोग आणि ईश्वर १४७

भोग आणि ईश्वर  १४७   खरतर ह्या पाच ते दहा वर्षातील तंत्राचा प्रभाव आणि त्यायोगे अध्यात्मिक, पौराणिक ज्ञान, त्याचं विश्लेषण ही सहजसाध्य गोष्ट भासली तरी, माझ्यामते यामागे अनेक युगांचं त्या युगातील त्या त्या समाजाची सामूहिक आणि अनेकांची व्यक्तिगत पुण्याई, हा ज्ञान व नामप्रवाह पिढ्यान्पिढ्या वाहता ठेवण्यासाठी, प्रसंगी आलेल्या संकटातून पुढे जात जात, अनेक स्थित्यंतरं पार करत त्याला आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या लाखो अज्ञात पारमथिकांचं आणि तितकंच महत्व त्यांच्या रक्षणार्थ प्राण गमावलेल्या लाखो वीरांचं योगदान हे शव्दातीत आहे.  हा अखंड वाहणारा व वाहता राहणारा आत्मयज्ञ आहे. यात अगणित कर्माच्या आहुत्या पडल्या आहेत आणि पडत राहतील. प्रत्येकानेच आपल्या परीने यात सहभाग घेतला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींपासून पुढचा प्रवास आपल्याला ज्ञात आहेच. त्या आधीच्या काळातील यातील शिलेदार हे अज्ञात असले तरीही त्यांना न स्मरता व त्यांना वंदन न करता आपण पुढे जाऊ शकत नाही.  आज जे आपल्याला माहितीस्वरूपात नेटवर गुगलवर विकिपीडियावर सहजी उपलब्ध होतं ते, कुठेतरी या अनेक धर्मवीरांनी प्रामाणिकपणे जतन करत कर...

भोग आणि ईश्वर १४५

भोग आणि ईश्वर  १४५   गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे व मांडलेल्या उदाहरणा प्रमाणे अश्या अनेक प्रकारच्या सामूहिक कर्माच्या शृंखलेतून सामूहिक फलगती तयार होते. ज्याच्या पक्व होण्याने सामूहिक भोग भोगण्याची वेळ सर्वांवर येते. यामध्ये पुन्हा प्रत्यक्ष परिणाम झालेले आणि त्यामुळे क्षतिग्रस्त हे एक, प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे भरडले गेलेले दोन आणि या चक्रातसुद्धा काहीही क्षती वा परिणाम न झालेले तीन. असे तीन प्रकारचे लोक या काळात असू शकतात किंबहुना असतील असा माझा कयास आहे. तिसऱ्या प्रकारात ती लोक ज्यांना शारीरिक, मानसिक,  आर्थिक वा वैद्यकीय अश्या कोणत्याही प्रकारची काहीही क्षती वा परिणाम भोगावा लागला नाही. कदाचित असे लोकं फार थोडेच असतील, पण असतील नक्की आणि या मध्ये गर्भश्रीमंतच असतील असा गैरसमज बाळगू नका. कदाचित मध्यम वा साधारण परिस्थितीत असलेले लोकसुद्धा, यात असू शकतात. अश्या प्रकारच्या काळात, त्यांच्या कर्मानुसार त्यांची यातून वाचण्याची सोय, त्यांच्या प्रारब्धाने होते आणि ते सुखरूप राहतात. त्यांच्या गाठीशी असलेले पुण्य आणि त्यायोगे विधात्याची कृपा हादेखील समसमा संयोग असू शकेल....

भोग आणि ईश्वर १४६

भोग आणि ईश्वर  १४६   नामस्मरणाचं महत्व खरतर अनेक संत महंत इत्यादींनी आपल्या जीवनाने आणि आपल्या कार्याने सिद्ध केलं आहे. एवढं असलं तरी अजूनही अनेकांना याचं महत्व विषद करत राहावं लागतंय आणि लागणार आहे. याचं कारण प्रत्येक पिढीनंतर वा पिढीदरपिढी प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी हस्तांतरित होतेच असं नाही. याचं कारण या हस्तांतरणासाठी शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सहभाग, सर्व संस्कारांचं मनातून मनात हस्तांतरण होणं आणि आत्म्याचा यात सहभाग असणं महत्वाचं आहे.  यात अजून एक महत्वाचा भाग म्हणजे काळ. काळाचा कोणता भाग आहे ज्यामध्ये हे हस्तांतरण होत आहे, त्या काळाची गती, इतिहासातील त्या काळाचं स्थान या सर्वांवर या संस्कारांचं पुढे पुढे जाणं अवलंबून आहे. विचार करा आजपासून कित्येक शतकं आधी, जेंव्हा कागद वा लेखनाचं माध्यम आणि सदर लेखन साठवणुकीचे काहीही पर्याय उपलब्ध नसतानासुद्धा ही स्तोत्र, श्लोक, वेदाध्ययन, इत्यादी माध्यमांनी हे ज्ञान, हा नामाचा महिमा, या भगवंताच्या नामाच्या महिमेच्या कथा हे सर्व हजारो वर्षे हस्तांतरित होत राहिलं, हे या सनातन धर्माचं यश आणि रहस्य आहे. मुळात असे अनेक ज्ञात व अज्ञात ...

भोग आणि ईश्वर १४४

भोग आणि ईश्वर  १४४   कित्येकांना व्यवसायचं स्वरूप बदलावं लागलं. कित्येक व्यवसाय हे सद्यस्थितीत होऊ शकत नाहीत म्हणून बंद झाले वा करावे लागले. कित्येकांचे दैनंदिन कमाईचं साधन नष्ट झालं किंवा सध्यासाठी स्थगित झालं. अशी कित्येक प्रकारची स्थित्यंतरं फार कमी काळात म्हणजे वर्षांपेक्षाही कमी वेळेत घडून आली. इतक्या मोठया प्रमाणावर वैश्विक पातळीवर परिणाम करणाऱ्या घटना वा वादळं येणं हे, असुरी वा दैत्य प्रवृत्तीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर वाढणं, याचं विशेष लक्षण आहे हे आधीच्या भागात पाहिलं. सद्यस्थितीत त्यावर श्रीगणेश उपासनेचा पर्याय वा मार्ग आपण तातडीने सुरू केला. पण तरीही एक विचार मनात येतो की, कर्म हाच जर सर्व जन्माचा पाया आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचेच भोग भोगावे लागतात, तर अशी कोणती सामूहिक कर्म आहेत, ज्यायोगे हा सामूहिक भोग सर्वांच्या नशिबी वा प्रारब्धात आला. यावर आज चिंतन करूया. गेले कित्येक दिवस वा महिने यावर सतत चिंतन करताना काही गोष्टी समजल्या वा जाणवल्या, त्याच मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडं विस्ताराने मांडतो म्हणजे समजून येईल. या जगतात प्रत्येकाचं कर्म लहरींच्य...

ll दोन अश्रू ll

मला सुचलेली, एक काल्पनिक लघुकथा, कृष्ण सुदामा यांची.-  ll दोन अश्रू ll ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कृपया याचा पुराणात संदर्भ शोधू नये. श्रीकृष्ण सुदामा बालपणीचे मित्र. सांदीपनीऋषींच्या आश्रमातून अध्ययन पूर्ण करून बाहेर पडले आणि आपापल्या गृही परत आले. कृष्ण अर्थातच मथुरेत आणि सुदामा आपल्या गावी परत गेला. कृष्ण कालांतराने खूप मोठा राजा झाला, ज्याची कीर्ती अर्थातच चारही दिशेला पसरली. पुढे रुक्मिणी सह इतर राण्यांशी त्याचा विवाह झाला. काळ पुढे निघून गेला होता. सुदामा एका गरीब ब्राम्हण कुटुंबातील होता. त्याचाही तश्याच सामान्य परिस्थितीतील गरीब कुटुंबातील मुलीशी विवाह झाला. सामान्य गरीब माणसाचा जसा संसार असतो, तसाच त्याचाही संसार होता. पूजाअर्चा करून, कीर्तन प्रवचनं करून आपल्या कुटुंबाचं पोट भरताना, त्याचा जीव मेटाकुटीला येत असे. कित्येक वेळा अर्ध पोटी, तर कधी उपाशी पोटी नवरा बायकोला झोपावं लागे. कारण पाच सात कच्ची बच्ची होती.  त्यांचं पोट भरून उरलेल्यामध्ये नवरा बायकोची गुजराण होत असे.  सुदामा प्रतिरात्री झोपतेवेळी हात जोडून प्रार्थना करून झोपत असे. ते करताना या मेटाकुटीस आणणाऱ...

भोग आणि ईश्वर १४३

भोग आणि ईश्वर  १४३ काल म्हटल्याप्रमाणे आपण श्रीगणेशाच्या नामस्मरणाला सुरवात केली असेलच. लवकरच त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी सामूहिक स्वरूप घेऊन आपल्या इच्छित कार्यार्थ, इष्टदेवतेप्रत पोचतील. आपण आपल्याकडून आज सुरू केलेली श्रीगणेश साधना त्या निहित वेळेत करूया.  नामस्मरण करताना किंवा सुरू करताना अथवा दिवसातील कोणत्याही वेळी पुन्हा करायला घेताना, शुचिर्भूतता अपेक्षित आहे. शुचिर्भूत होणं म्हणजे शरीराने स्वच्छ असणं गृहीत धरलेलं आहेच. म्हणजेच प्रत्येकवेळी स्नानादी कर्म अपेक्षित नाहीत, परंतु किमान हातपाय तोंड म्हणजेच पूर्ण चेहरा,  स्वच्छ धुवून बसणं अपेक्षित आहे. किंबहुना ते अत्यंत जरुरी आहे. पूर्वी खूपवेळा असा विचार यायचा की, हातपाय तोंड स्वच्छ धुवून नाम स्मरणच नाही तर कोणतंही नित्य कर्म करावं, असा प्रघात, प्रथा, नियम वा नीतीचा भाग, पूर्वजांनी का केला असेल. पण आज करोनाच्या काळात संपूर्ण वैद्यकीय व वैज्ञानिक जगताने मान्य केलेला उपाय म्हणजे हातपाय व तोंड स्वच्छ धुवा, वारंवार धुवा, साबण इत्यादी साधनांनी धुवा. म्हणजे करोनासारखा अतिघातक विषाणूसुद्धा आपण फक्त हातपाय व तोंड स्वच्छ धुवू...

भोग आणि ईश्वर १४२

 भोग आणि ईश्वर  १४२ असुररूपातील या आपत्तीचा सामना प्रत्येकजण आपापल्या शक्ती व भक्तीवर करत आहेच. यात त्यांच्या त्यांच्या इच्छित देवता, सद्गुरू त्यांना यश देतीलच. परंतु संकट वैश्विक, अनेक पटींनी आणि सूक्ष्म रूपात आहे. त्याचा पसारा आणि प्रभाव संपूर्ण जगतावर आहे. त्याच्या दमनार्थ  सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेतच. परंतु त्याची शक्ती व सूक्ष्म स्वरूप पाहता तितकाच व्यापक आणि विस्तारित सामना करणं आवश्यक आहे. प्रयत्न जर एकत्रित आणि जास्त प्रमाणावर होतील,  तरच सद्यस्थितीत याचा निःपात होऊ शकेल असं माझं मत आहे.  सद्यस्थिती हि असुरशक्ती प्रभावाने ग्रस्त आहे आणि कलियुगाच्यानीतीप्रमाणे परमेश्वर प्रत्यक्ष अवताररूपाने येऊन, त्या प्रभावाने असुर शक्ती नष्ट वा प्रभावहीन होईल अशी शक्यता सध्यातरी दुरापास्त वाटते. अश्या विचित्र परिस्थितीत ईश्वराचं स्मरण आणि नित्य नामाने हाकारून, त्याला या संकटकाळात पाचारण करून, मदतीची साद घालून,  सहाय्यार्थ येण्याची विनवणी करणं आणि या कार्यात सेवाकार्यार्थ जे सक्रिय सहभागी आहेत त्यांना जरुरी सहाय्य मिळावं आणि या संकटावर म...

भोग आणि ईश्वर १४१

भोग आणि ईश्वर  १४१   लहरींबद्दल आपण इतका सखोल अभ्यास व विवेचन केल्यानंतर, आता सध्याच्या बिकट आणि विचित्र परिस्थिती वर थोडं बोलूया. विश्वात इतकी मोठी आणि विघातक लाट पसरलेली असताना, विधाता काय करतोय असा एक प्रश्न वा शंका साहजिक बऱ्याच जणांच्या मनात येत असेल. अशी शंका येणं गैर आहे की नाही यावर चर्चा न करता हा विषय पुढे नेऊया. मुळात अश्या वैश्विक उलथापालथ करणाऱ्या घटना, वावटळं वा वादळं ठराविक अंतराने येत असतात. अश्या वादळात हिमपर्वत उखडले जातात तर समान्यांचं काय असा एक रास्त प्रश्न यातून उभा राहतो. विचार करा की, विश्वातील जवळजवळ सर्व देश आणि त्या देशां मधील सर्वच्या सर्व नागरिक, वेगवेगळ्या प्रकारे यातून भरडले जात आहेत. महामारी वा अन्य संकटं हे एक कारण असतं, पण मूळ तर्कसंगती ही सूर विरुद्ध असुर, सुष्ट विरुद्ध दुष्ट, सात्विक विरुद्ध महापापी अश्या शक्तींचा वैश्विक वा कदाचित ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा संघर्ष होत असण्याचा हा काळ असू शकेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. अश्या प्रकारच्या ब्रह्मांडीक संघर्ष घटना पुराणकाळात आपण देवासुर संग्राम म्हणून वाचल्या असतील. त्या वा तश्या घटना या कपोलकल...

भोग आणि ईश्वर १४०

भोग आणि ईश्वर  १४०   कालच्या विषयासंदर्भात लहरी आणि त्यांचं शास्त्र या बाबत आपण जाणून घेतल. प्रत्येक इच्छेच्या शक्तीनुसार त्या त्या इच्छेचं कार्य चालतं.  त्या लहरींची शक्ती, आपल्याला,  इच्छित उद्देशापर्यंत घेऊन जाते. हे आपण पाहिलं आणि जाणून घेतलं. प्रत्येकजण जन्मतः काही पुण्यांचा आणि काही पापांचा भाग घेऊन जन्माला येतो. त्या संचिताचं वलय किंवा ऑरा त्या व्यक्तीसभोवती जन्मापासून असतो. किंबहुना गर्भात असल्यापासून हा ऑरा वा हे वलय जीवाच्या सोबत असतंच असतं. कदाचित त्या प्रभावामुळेच डोहाळे हा अनुभव गर्भवतींना येतो आणि आपण तो पाहतो. हे वलय म्हणजे एकप्रकारे बल वा कवच यास्वरूपात असतं. ज्या गोष्टींचा प्रभाव अधिक, त्या नुसार त्या त्या प्रकारचं वलय त्या व्यक्ति भोवती असतं. हे वलय, आपले विचार, आचार, उच्चार, कर्म, साधना, तपताप, आयुष्यातील कष्ट काळज्या, चिंता इत्यादीमुळे परिवर्तित होत असतं. जसजसे विचार बदलत जातील अथवा असलेले दृढ होत जातील, तसतसं हे वलय गडद वा तरल अर्थात पातळ होत जातं. या वलयाच्या आधारे आपल्या इच्छेचं बल हे कमी जास्त होत असतं आणि ऊर्जा शक्ती व कर्म करण्याची चेतना याव...

भोग आणि ईश्वर १३९

भोग आणि ईश्वर  १३९   स्तोत्र, मंत्र इत्यादी विषयी आपण दोन भागात विस्तृतपणे चर्चा केली. काही गोष्टी शास्त्रीय दृष्टिकोनातून समजल्या. म्हणजे आपल्या इच्छेमागे असलेली शक्ती वा बल जर आपल्या प्रारब्धानुसार कमी पडत असेल वा काही प्रमाणात क्षीण असेल तर, त्यासाठी आपण स्तोत्र, मंत्र इत्यादींचं सहाय्य जरूर घेतो आणि आपल्या इच्छेतून निर्माण होणाऱ्या लहरींना पाठबळ देऊ शकतो.  आता या प्रत्येक स्तोत्र मंत्र वा विशिष्ट हेतुप्रीत्यर्थ केलेला जाप इत्यादी हे त्या त्या देवतेला जागृत करतं, ज्यायोगे त्या विशिष्ट देवतेपर्यंत आपल्या स्तोत्र मंत्र पठणाच्या लहरी पोचतात. मुळात ह्या देवता म्हणजे विशिष्ट लहरी निर्माण करणारी शक्तीस्थानं वा शक्तिकेंद्रं आहेत वा असतात. ज्यावेळी आपण काही विशिष्ट ध्येय वा उद्देश ठेवून, त्यांना साद घालतो, त्यावेळी आपल्या साधनेच्या लहरी, त्या शक्तिकेंद्रांना जागृत करून, त्यातून आपल्या कार्यपूर्तीसाठी आवश्यक अतिरिक्त बळ, ऊर्जा, चैतन्य आपल्यापर्यंत पोहोचवतात. ज्यामुळे आपल्या कार्यासाठी आवश्यक लहरी उत्पन्न होऊन, आपल्या इच्छाशक्तीचं बल व ऊर्जा, यात वाढ होऊन, आपण त्या कार्यासाठी प्...

भोग आणि ईश्वर १३८

भोग आणि ईश्वर  १३८   मंत्र आणि स्तोत्र यांचा वापर पुराण काळापासून मानवाच्या उद्धारासाठी, सकारात्मक लहरी उत्पन्न करून त्यायोगे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. मुळात हे मंत्र, स्तोत्र इत्यादी, आत्मोद्धार करून ईश्वरीय चेतनाशक्तीशी तादात्म्य पावून वा एकरूप होऊन आपल्या जन्माचं कायमस्वरूपी सार्थक करून, आत्मोन्नत्ती साधण्या साठीच ब्रह्मदेव वा इतर ऋषीमुनी यांच्या माध्यमातून विधात्याने निर्माण केले आहे. हे मूळ तत्व लक्षात घेतलं तर, अनेक गोष्टी आपोआप तर्कसंगत वाटत जातात आणि त्यांचा लाभ करून घेण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते. हा आहे, त्याचा व्यापक आणि आत्महेतु साध्य करण्यासाठीचा मार्ग आणि उद्देश.  परंतु, वेदशास्त्र पुराणं यातून मांडलेला मंत्र , स्तोत्र श्लोक आदिद्वारे पवित्र मंगलमय लहरी उत्पन्न करून आपल्या इप्सिताला वा इच्छेला आपल्या संचितातील मर्यादित शक्तीमुळे अपुरं पडणारं पाठबळ मिळवणं, हा मर्यादित अर्थसुद्धा आहेच. मुळात खूपवेळा आपल्याला प्रश्न पडतो की, हे मंत्र, श्लोक, स्तोत्र इत्यादीनी काय साध्य होणार. कदाचित यामागची शास्त्रीय संगती, पार्श्वभूमी व कारणमीमांसा मा...

भोग आणि ईश्वर १३७

भोग आणि ईश्वर  १३७   लहरींच्या कार्याचा पुन्हा एकदा थोडा विचार करूया, एका वेगळ्या अनुषंगाने. सर्व प्रकारच्या लहरी निर्माण होऊन आपल्या लक्षापर्यंत, त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार अर्थात फ्रिक्वेन्सीनुसार मार्गस्थ होतात. ज्या कमी क्षमतेच्या असतात त्या निर्माण होऊन फार दूर मार्गस्थ न होता, दुसऱ्या अति बलवान लहरींपुढे शरणागत होऊन, त्यामध्ये विरून जातात हे मागे आपण पाहिलं आहे. म्हणून आपण तीव्र इच्छाशक्तीने जे मनात योजू त्याच्या बलवान लहरी अंतराळात वा अवकाशात जाऊन, त्यासम वा तत्सम लहरींशी संयोग पाऊन  त्या संयोगातून निर्माण होणारी ऊर्जा, चेतना व बल प्राप्त करून आपल्या मूळ निर्माण स्थानाकडे उद्देशापूर्तीसाठी परत येतात.  यातूनच त्या उद्देश प्राप्तीसाठीची मानसिकता आणि आत्म शक्ती सदर व्यक्तीच्या अंतरंगात जागृत होऊन, महत्तम कार्य घडतात. यामध्ये त्या व्यक्तीला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. किंबहुना सदर व्यक्तीच्या इच्छेच्या बलानुसार,त्या लहरींकडून येणारी प्रतिक्रिया असल्यामुळे, त्याचं श्रेय खचितच त्या व्यक्तीचं असतं. यात आपल्या पूर्वकर्माच्या अर्थात संचिताचा हातभार नक्कीच असतो. का...

भोग आणि ईश्वर १३६

भोग आणि ईश्वर  १३६   कालचाच विषय पुढे नेऊया.  आता त्या वरिष्ठांचा दृष्टिकोन कसा असतो याचा विचार करूया. खरा वरिष्ठ हा आपल्या कोणत्याही कनिष्ठाला प्रगत होताना आणि वरवर चढत जाताना पाहून, आनंद आणि समाधान या दोन्ही भावनांचा लाभ घेतो. कारण असा कनिष्ठ प्रगत होत जाणं, हे एकप्रकारे  त्याच्या श्रमाचं, चिंतनाचं चीज झालं, हा आनंद खूप मोठा असतो त्या वरिष्ठांसाठी. आता जो कनिष्ठ फार प्रगती न करता, पण आहे त्या स्थानी स्थिर आणि समाधानी राहून कार्यरत राहिला, तरी वरिष्ठांच्या दृष्टीने ती आनंददायी गोष्ट असते.  म्हणजेच कनिष्ठांमध्ये कोण प्रगती करेल व कोण फार पुढे  जाऊ शकणार नाही, याचं उत्तम गणित वरिष्ठांना येत असतं. म्हणूनच ते जास्त त्या कनिष्ठांना संभाळून घेतात, ज्यांना जास्त गती आणि मती नाही. म्हणून त्यांना संकट काळात वा त्रासदायक काळात असे वरिष्ठ, त्या कनिष्ठाला कमी हानी वा कमी क्षती पोचेल याची दक्षता घेतात.आता याच पार्श्वभूमी वर कनिष्ठांची काय मानसिकता असते तेही बघूया. जो कनिष्ठ आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि कर्मगतीने पुढे पुढे वा वरवर चढत जाऊन यशाची शिखरं गाठतो, तो जर उच्च मा...

भोग आणि ईश्वर १३४

भोग आणि ईश्वर  १३४   अजून खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की अजूनही सृष्टीतील काही गोष्टी आपण जाणण्यापालिकडे आहेत. तरीही विधात्याने त्या निर्माण केल्या आहेत आणि त्या अस्तित्वात आहेतच. जसं अनेक सूर्यमाला, त्या अनेक सूर्यमालेत असलेल्या अनेक जीवसृष्टी, त्या अनेक जीवसृष्टीत असलेले असंख्य सूक्ष्म वा महाकाय जीव हे सर्व अजून आपण पाहिलंसुद्धा नाही. किंबहुना अश्या सूर्यमाला आहेत वा असतील हासुद्धा आपला अंदाज आहे.  समस्त ब्रह्मांडाची रचना करताना सृष्टीकर्त्याने काय काय योजून ठेवलं आहे ते तोच जाणे. पण जर असेलच तर त्याची आपल्याला आता जाणीव होणं आणि त्यादृष्टीने मानवाने वैज्ञानिक प्रयत्न करणं आणि प्रगतीच्या जोरावर ते सर्व ज्ञात करून घेणं हे देखील त्याच्याच खेळाचं सूत्र नसेल ना. कारण मायापती तोच आहे आणि माया त्याच्या अधीन आहे, हे तर शास्त्राने सांगितलं आहे. किंवा पुन्हा एकदा काहीशे वर्ष अर्थात शतकं फिरून, मायेआधीन राहून विज्ञानाचा चष्मा घालून पुन्हा त्याच उत्तराला पोचणार का आपण. त्यानुसारच देवकण हा नुकताच लागलेला शोध किंवा काढलं गेलेलं अनुमान हे त्याचाच एक भाग आहे का. कारण विधात्या...

भोग आणि ईश्वर १३३

भोग आणि ईश्वर  १३३   ब्रह्म सत्यं-जगत मिथ्या  म्हणजेच ब्रम्ह हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, अस एक शास्त्रवचन आहे. माझं अनुमान आहे की,   कदाचित मिथ्या या शब्दावरून myth अर्थात पुराण काळापासून ऐकिवात असलेल्या कथाकल्पना. त्यावरूनच Mythology हा शब्द आला. म्हणजेच कुठेतरी त्यांच्या Myth या शब्दाचा आधार, आपला संस्कृत शब्द मिथ्या असू शकेल. मुळात मिथ्या या शब्दात ती गोष्ट खरी नाही पण खोटी वा निरर्थक असा भाव प्रकट होतो. म्हणजेच जे कपोलकल्पित आहे, जे अवास्तव आहे, जे अस्तित्वातच नाही,  ते मिथ्या. आता या सर्वाचा व्यापक अर्थाने जगाशी आणि आपल्या जीवनाशी कसा आणि काय संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. एका अणुपासून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती, सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने श्रीमहाविष्णूच्या मनातील संकल्पाने, केली. एका संकल्पात इतकी प्रचंड ऊर्जा,शक्ती सामावलेल्या ईश्वराची प्रत्यक्ष शक्ती, ऊर्जा आणि चेतना किती असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. मुळात अस्तित्वात नाही, पण आपल्याला पृथ्वी या ग्रहावरील वातावरण गुरुत्वाकर्षण या एक प्रकारच्या मायेमुळे, जे घडतंय...

भोग आणि ईश्वर १३२

भोग आणि ईश्वर  १३२   व्यसनाधीनतेच्या वाटेवर जाणं वा जावं लागणं आणि त्यापायी त्रास सहन करणं किंवा इतरांना त्रास देणं, हे सुद्धा प्रारब्धाचे भोग आहेत. व्यसनात गुरफटून गेलेली व्यक्ती, शारीरिक आणि त्याहीपेक्षा मानसिकरित्या, त्या व्यसना धीनतेच्या पूर्ण आहारी किंवा कब्जात गेलेली असती. म्हणजेच त्या व्यक्तीची मानसिकता, त्या व्यसन करण्यापायी लाचार होण्यापर्यंत खालच्या पातळीवर पोचलेली असते.   अशी लाचारी परिस्थितीग्रस्त माणसालासुद्धा पत्करावी लागते, आर्थिक मदत वा हातउसाने मागताना. पण त्या वेळी त्या परिस्थितीने त्रस्त माणसाला मनात का होईना, याची जाण असते की, आपण जे करत आहोत ते परिस्थितीमुळे करत आहोत आणि ही लाचारी तात्पुरती आहे. त्यामुळे परिस्थिती बदलताच अशी व्यक्ती, पुन्हा सहसा मदतीसाठी याचना करत नाही. व्यसनाधीन व्यक्ती, या सर्व भावनांच्या पलीकडे पोचलेली असते. नैतिक अनैतिक योग्य अयोग्य या सर्व संज्ञापलीकडे ती व्यक्ती पोचलेली असते. अश्या व्यक्तीला त्या पातळीवरून खाली आणणं गरजेचं आहे वा प्रथम उपचार म्हणावा लागेल.  अर्थात प्रश्न असा आहे की, सदर व्यक्ती ही व्यसनामुळे काही समजण्...

भोग आणि ईश्वर १३५

भोग आणि ईश्वर  १३५   नित्य स्मरण त्याच गोष्टीचं करावं लागतं, जी आपल्या विस्मरणात जाते. किंवा जी मुद्दाम स्मरणात ठेवावी लागते. विषयाच्याबाबत ही गोष्ट लागूच पडत नाही. कारण ते आपल्या मनातील विचारांचा, देहाचा स्थायी भाव झाले आहेत. विषय ज्यामध्ये फक्त काम नाही तर, क्रोध, मोह, मद मत्सर इत्यादी सर्व आले. यांना आपण नित्य स्मरत असतो किंवा त्यांचं विस्मरण हीच कष्टाची गोष्ट आहे. त्यांना स्मरतच आपण जीवन जगतो. म्हणून ज्याला स्मरतो त्याचं विस्मरण आणि ज्याला विसरलो त्याचं स्मरण अशी उलट शक्ती लावून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू केला तरच काही शक्य आहे. अन्यथा विषयाच्या आनंदात आणि सुखात आपण किती जन्म भोगण्यासाठी घालवले आणि अजून किती घालवू ते स्मरतही नाही आणि आपण मोजू शकत नाही. यातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा आणि अनुभवाने सिद्ध झालेला उपाय म्हणजे विश्वात्म्याचं स्मरण ते सुद्धा सतत, अन्यथा दुसरा उपाय नाही.  सद्गुरू शरणी लागून त्यांच्या आज्ञेनुसार साधना करून, त्यांच्या कृपाप्रसादाने जन्मजन्मीच्या या भोगातून, दुःखातून पूर्ण मुक्ती मिळवणं शक्य आहे. पण तिथेही पूर्ण शरणागती आणि गुरूआज्ञापालन या दोन...

भोग आणि ईश्वर १३१

भोग आणि ईश्वर  १३१   मनाचा संबंध वा साधर्म्य आकाशाशी आहे वा केलं जातं, हे आपण मागच्या बऱ्याच लेखांमध्ये पाहिलं.  परंतु ते आकाशा प्रमाणेच पृथ्वीशी नाळ जोडून आहे. पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी वर्षातील काही काळ वा काही वेळा ते झुकलेलं वा उतरलेलं आपण पाहतो. ऋतुचक्र आणि हवामान यानुसार आकाशात अनेक हालचाली होतात. त्यातील बऱ्याच आपण पाहू शकतो, पण काही ज्या आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाहीत, त्या आपल्याला दिसत नाहीत. पण या सर्वात निरभ्रता , शांतता आणि निर्गुणत्व जे निळ्या रंगात, आकाशात दिसतं,  ते पाहून मनाला मिळणारी प्रसन्नता अवर्णनीय आहे. आपण स्वतः ह्याचा अनुभव घ्या. एखाद्या शांतवेळी आकाश निरभ्र असेल अर्थात clear sky ज्याला म्हणता येईल आणि त्यावेळी असलेल्या फिकट निळसर रंगाकडे काही क्षण बघितल्या नंतर, एका वेगळ्या शांततेचा अनुभव मनाला जाणवतो.  या शांततेचा अनुभव आपण मनाला देण्यासाठी, अर्थात मनाला त्या भावावस्थेत घेऊन जाण्यासाठी, आकाशात होणाऱ्या बदलांसारख्या बदलांची वाट पाहण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. याचं कारण आकाश हे विचाररहित आहे आणि मानवी मन हे विचार आणि विचारांच्...