भोग आणि ईश्वर १५१ खरतर नाम घेण्यात अडचणी, आपण अर्थात आपलं मनच निर्माण करत असतं आणि मनाला यासाठी भरीला पाडते माया आणि षड्रिपु. वास्तविक हे बाहेर नसतातच, तर आतच ठाण मांडून बसलेले असतात. ज्या ज्यावेळी त्यांना आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं दिसतं, त्या त्यावेळी ते बंड करून उठतात. पण बंड करतात म्हणजे नक्की काय करतात, तर अश्या अश्या युक्त्या वापरून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की आपण हतबल होऊन म्हणतोच , हे काही माझं काम नाही, असं म्हणून सोडून देतो. वास्तविक अशक्य आणि हतबलता हे शब्द मानवी कर्मांना लागू होत नाहीत, इतकी अचाट आणि अफाट इच्छाशक्ती आणि मनोनिग्रह मानवाला वरदान स्वरूपात प्राप्त झाले आहेत, इतके की, नराचा नारायण होऊ शकतो. इतकी मोठी झेप साधा मानव घेऊ शकतो, तो फक्त मनोनिग्रह आणि इच्छाशक्ती या पाठबळावर. ही दोन कर्मरथाची दोन अंग आहेत. या जोडीच्या आधारावरच अनेक विक्रम मानवाने संपूर्ण विश्वात प्रस्थापित केलेत. बऱ्याच हिंदी चित्रपटात घासून पुसून गुळगुळीत झालेलं एक वाक्य अजूनही असतं. ते म्हणजे तुम अगर चाहो तो क्या कुछ नही कर सकते. हे खऱ्या अर्थाने प्रोत्सा...