Skip to main content

भोग आणि ईश्वर १

भोग आणि ईश्वर 

भोग भोगावे लागणं, त्याचा ताप सहन करावा लागणं हे पूर्णतः प्रारब्धावर अवलंबून आहे. परंतु नाम हे त्या भोगावरील वेदनाशामक औषधी आहे. वेदनाशामक औषध वेदना कमी करत नाही तर तिचा तुम्हाला म्हणजेच मेंदूद्वारे शरीराला जाणवणारा दाह कमी जाणवेल याची काळजी घेतं. हेच कार्य नाम करतं. भगवंत जो अनेक रुपात वास करून आहे, तोच गुरुरूपात पुनः प्रकट होऊन कलियुगी जनसामान्यांना खडतर असणारं आयुष्य सुलभ करण्यासाठी उपस्थित झाला आहे.

अनेक देही विस्तारलेला हा गुरुमहिमा मुळात एकाच मूळ तत्वापासून प्रकट झाला आहे. खरा गुरू हा भक्त, साधक वा शिष्यांजवळ फक्त आणि फक्त नाम, ईश्वरसेवा, हळूहळू प्राप्त होणारं निरिच्छत्व मागतो आणि कांक्षीतो. या व्यतिरिक्त जे मागणारे असतील ते बाह्य भाव भिन्न परी अंतरी भाव वेगळे असे समजावे.

जर भोग भोगावे लागतातच, तर मग सद्गुरू, नाम, ईश्वर हवंच कशाला ? प्रश्न योग्य आहे. पण खोलात जाऊन विचार केला तर कळतं की, 

रोग झाल्यावर, सर्व रोग घरबसल्या बरे होत नाहीत. तर काहींसाठी डॉक्टरकडे जावं लागतं, आजाराप्रमाणे काही दिवस औषध घ्यावं लागतं, त्यानंतर सुधारणा होऊ शकते. तेदेखील प्रारब्धात लिहिलं असेल त्यानुसार. म्हणजे योग्य इलाज होणार असेल तेंव्हाच त्या डॉक्टरकडे जायची प्रेरणा होते.  तोपर्यंत भोग भोगूनच कमी करावे लागतात. परंतु भोग भोगत असताना ईश्वर हा नामरूपात सोबत असेल तर भोग सुसह्य होतात. त्यावरील औषध हे प्रारब्धात असेल तर मिळतं कसंही. परंतु ईश्वर सोबत असल्याने ताप सहन करण्याची शक्ती, जगण्याची प्रेरणा आणि झुजण्याची जिद्द मिळत जाते. 

म्हणून कठीण परिस्थितीत ईश्वराची प्रार्थना वा नामरूपात तो सोबत असणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/१२/२०२०
००:०६

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...