Skip to main content

जीवन सुगंध - ४



जीवन सुगंध - ४


आता या मायेचा विचार करुया. ही माया एका अर्थी भगवंत निर्मित म्हणजे विश्वाचा आधार, पण दुसऱ्या अर्थी वाटेच दूसर टोक, म्हणजे निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट किंवा बाब. पण ती संपूर्ण विश्वाला सुद्धा वाटेच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच भगवंताच्या विरुद्ध बाजूला अर्थातच इश्वरापासून लांब घेऊन जाते. इतकी प्रचंड ताकद तिच्यापाशी  कशी. त्यासाठी तिच्या निर्मितीचा विचार करू . मुळातच हे विश्व भगवंताला  झालेल्या मोहातून निर्माण झाल. त्यामुळे हाच मोह माया रुपात पूर्ण विश्वात संचारला. हीच ती माया. आता तर्काने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जेंव्हा हां मोहच जर निर्मितीच कारण आहे तर हे विश्व सुरळीत चालू राहाव यासाठी ही गरजेचीच आहे हे पटत.  पण त्यात ही मेख पण आहे की जर तुम्हाला या विश्वाच्या पसाऱ्यातच अडकायच असेल तर कोणाची ना नाही.  मग या मायेचा तुम्ही विचार केला नाहीत तरी चालेल.  कारण प्रत्येक जण प्रत्येक क्षणी त्या मायेच्या आधीन आहे आणि जातोच आहे. ही माया म्हणजेच जिला भगवंताची सावली असही म्हटल जात.  तर तर्काने हेही  जाणू शकता की सावली म्हणजे काळी आणि काळी म्हणजेच याचा परिणाम हां अंततः दुःखदच असेल. कस ते पुढे पाहूच. 

प्रेरणा : श्री महाराज

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...