Skip to main content

दिलीपकुमार - २



दिलीपकुमार - २ 


यांचा जन्म ११   डिसेंबर  १९२२ या दिवशी आत्ताच्या पाकिस्तान मधील  खैबर पाख्तून्वा प्रांतातील पेशावर मध्ये लाला गुलाम सरवर यांच्या घरातील . आणि मूळ नाव मुहम्मद युसुफ खान.  वडील जमीनदार आणि फळांचे व्यापारी होते.  त्यांच्या पेशावर आणि देवळाली येथे स्वत:च्या  बागा होत्या. दिलीपकुमार १२ जणांच्या कुटुंबातील ११वा सदस्य .  दिलीपकुमार याचं शिक्षण प्रसिद्ध बर्न्स स्कूल देवळाली येथील १९३० च्या दशकातील, ज्यादरम्यान  त्यांचं कुटुंब पेशावर सोडून मुंबईला येवून स्थिरावलं . शिक्षण पूर्ण करून साधारण १९४० ला दिलीपकुमार यांनी  घर सोडून पुणे येथे स्वत:च कॅन्टीन आणि फळाचा व्यवसाय चालू केला. 

एकदा साधारण १९४३ मध्ये बॉम्बे टाकीज ची मालकीण असलेल्या देविका राणी यांनी  औंध मधील मिलिटरी कॅन्टीन मध्ये ५ '१०" उंची असलेल्या  युसुफ खानला पहिलं.  कारण आदल्याच वर्षी बॉम्बे टाकीज सोडून गेलेल्या अशोक कुमार साठी हिरोच्या शोधत असलेल्या देविका राणीला तो भावून गेला   आणि "ज्वार भाटा" मधील प्रमुख भूमिके साठी निवडलं.   साल होता १९४४.… 

आणि याच दरम्यान  प्रसिद्ध लेखक भगवती चरण वर्मा यांनी जहांगीर , वासुदेव  आणि दिलीपकुमार या तीन नावांमधून दिलीपकुमार हे नाव निश्चित केला आणि एक इतिहास जन्माला घातला. पहिला सिनेमा तसा फार चर्चिला गेला नाही. दरम्यान प्रतिभा १९४५ आणि मिलन १९४६ आले आणि  गेले या प्रकारातील होते

पण १९४७ साली नूरजहान सोबत आलेला "जुगनू" दिलीपकुमारचा पहिला ब्लॉक बस्टर म्हणजेच गोल्डन जुबिली सिनेमा ठरला. १९४८ सालचा "शहीद" अजून एक माईल स्टोन ठरला. 

पण यशाचा मुख्य  भागीदार ठरला १९४९ सालचा मेहबूब खानचा , राजकपूर, नर्गिस बरोबरचा  तिरंगी प्रेमाची कथा असलेला सुपर हिट "अंदाज" . ज्याला इंग्रजीत मेजर ब्रेक थ्रू  म्हणतात.  त्याच वर्षी आलेला मेला त्यानां  यशाच्या खूप जवळ घेउन गेला.   

शब्दांकन आणि संकलन : प्रसन्न आठवले 

Comments

  1. नशीब एक संधी नक्की देत त्याचा फायदा उठवण आपल्या हातात असत. फार सुंदर सुरवात .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...