Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७२

भोग आणि ईश्वर  ४७२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल आपण पाहिलं की, प्रत्येक क्षण हा, मनाच्या ऊर्जा आणि शक्ती त्याचप्रमाणे विचार व विवेक यासाठी किती महत्वाचा आहे.  आता हे साधणं हे लिहिण्याइतकं सोप्पं नाही,हे नक्की.पण त्यासाठी सुद्धा,आपल्या धर्म शास्त्राने आणि पूर्वजांनी, अनेक मंत्र, तंत्र इत्यादी लिहून वा आचरणात आणून,त्याचे दाखले देऊन ठेवलेत.  

प्रत्येक क्षण हा वेगळा अर्थात भिन्न असतो. म्हणजे वास्तविक एका क्षणाचा दुसऱ्या क्षणाशी काही संबंध नसतो. पण हे सर्व सलग, येत असल्यामुळे आणि त्याच क्षणांप्रमाणे आपले श्वासांच्या देखील मालिका होत असल्यामुळे आपल्याला हे सर्व काळाचं गणित एकसंध वाटतं. पण प्रत्यक्षात ते क्षण व श्वास जोडलेली मालिका आहे. 

म्हणजेच प्रत्येक क्षणी आपण वेगळे असतो आणि प्रत्येक क्षणी आपल्याला, मनासाठी आनंद ऊर्जा व शक्ती मिळवत राहणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रत्येक क्षणी सकारात्मकता टिकवण्या साठी प्रयत्नांची मालिका तयार करणं आवश्यक आहे. त्यासाठी एकतर प्रत्येक क्षणी, एखादी वेगळी गोष्ट वा कर्म, या आनंदा साठी, उर्जेसाठी करायला हवी. पण असं एकच कर्म सलगपणे आणि नित्य करत राहणं कितपत शक्य आहे. 

त्याचप्रमाणे असं कोणतं कर्म आहे जे प्रत्येक क्षणाला जोडत जाईल आणि नित्य कर्माची एक मालिका तयार होईल आणि त्याची अखंडता राहील. माझ्यामते असं एकच कर्म आहे जे नित्य करत राहता येईल, प्रत्येक क्षणाला जोडेल, प्रत्येक क्षणाचं वेगळेपण टिकवून ठेवेल, तरीही अखंडता वा सलगता राहील.हातात असलेला प्रत्येक क्षण आणि येणारा प्रत्येक क्षण यामध्ये गुंफला जाईल. 

कारण काळ, जात असलेला प्रत्येक क्षण, हा विश्व नियंत्याच्या चरणी अर्पण करतो. स्वतःपाशी काही ठेवत नाही. हे त्या विधाता नामक व्यवस्थेच्या कर्महीन राहण्याच्या गरजेचा एक भाग आहे. कारण त्या विधात्यालासुद्धा कोणत्याही क्षणात गुंतून चालत नाही. गीतेत सांगितलेलं कर्महीन किंवा अकर्मी राहण्या साठीची ती एक आवश्यकता आहे. म्हणून जो क्षण गेला तो ईश्वरचरणी अर्पून, पुढील क्षणात तो काळ आणि विधाता व्यस्त होत जातो आणि अखंडता व प्रत्येक क्षणाची अलगता राहते. 

यालाच आधार मानून आणि आलेला प्रत्येक क्षण ईश्वराला अर्पण करून, त्याच ईश्वराला प्रत्येक क्षणी स्मरत आपणही ही अखंडता आणि वेगळेपण एकाचवेळी साधू शकतो. यामध्ये एक महत्वाचं सूत्र म्हणजे गेलेला प्रत्येक क्षण प्रामाणिकपणे ईश्वर स्मरण करत, त्याच्या चरणी अर्पून, पुढील क्षणाकडे आपण जायला मोकळे राहू. 

यावर चिंतन करा. उद्या हाच विषय पुढे नेऊ. पण ईश्वर स्मरण करत रहा., 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...