Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५६

भोग आणि ईश्वर  ४५६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

पृथ्वीतत्वाबद्दल काल आपण चर्चा केली.  आता जलतत्व, पृथ्वीतत्वानंतर विचार करूया अग्नित्वाची. दधगता अंगार म्हणजे अग्नीतत्व. थोडक्यात काय तर सतत क्रोध आणि राग यांचा वास ज्या देहात बुद्धीत व मनात असतो, त्या व्यक्ती अग्नीतत्वाने युक्त असतात. म्हणजे यांच्या स्वभावात, बोलण्यात,  वागण्यात, विचारात, भाषेत क्रोधाचा वा रागाचा अंमल जास्त असतो. 

अश्या व्यक्ती सहसा शांत असलेल्या किंवा फार।विचार व चिंतन करताना आढळत नाहीत वा दिसत नाहीत. पण असे लोकं फटकन बोलून, विचार न करता वागून बरेच वेळा गोंधळही निर्माण करतात. कधीकधी अश्या व्यक्तींच्या वागण्या बोलण्याने अनेकदा माणसं दुरावण्याची वा दुखावण्याची शक्यता असते. अश्या लोकांची विचारशक्तीसुद्धा अग्निप्रमाणे वेगवान असते. पण यातून अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. 

अग्नित्वानंतर वायू तत्व प्रभावित व्यक्तींबद्दल विचार करूया. या व्यक्ती बदलत्या विचारांच्या, मतांच्या असतात. अर्थातच ज्याला चंचल विचार, बुद्धी असं म्हणतात, त्याप्रमाणे असतात. कारण वायूच्या गती व बदलत्या स्थितीप्रणाने, यांच्या मन  बुद्धी, यावर चंचलतेचा प्रभाव असतो. म्हणजे यांना सगळीच मतं पटतात आणि मग नेहमी विचारांचा गोंधळ असतो. 

यांच्या मनाचा पाया सतत बदलता असतो, म्हणजे ठाम मतं नसल्यामुळे यांना निश्चित भूमिका नसते. मतांचा विचार नन्तर, पण यांच्या मनातील विचारही सतत बदलते असतात.  यानंतर उरलेलं तत्व म्हणजे आकाश तत्व. आकाशतत्वाने प्रभावित व्यक्ती सखोल चिंतन करणाऱ्या असतात. म्हणजे यांच्या मनाची खोली प्रचंड असते. यामागे एका वा अनेक जन्मांच्या चिंतन व मनन वा साधना यांचा पाया असतो. 

यांच्या मनात अनेक विचार, मतं, गोंधळ, चित्रविचित्र प्रसंग, माणसं, अश्या अनेक गोष्टी साठवून, त्या कशाचाही प्रभाव मनावर बुद्धीवर आणि देहावर पडू न देता, योग्य ते करण्याची क्षमता व किमया यांच्याकडे असते. खरतर यांच्या मनात काय चालू आहे ते यांच्या देहबोलीतून कधीही लक्षात येत नाही किंवा समजून येत नाही.  यांच्या मनाला गहनता असते. अनेक गूढ व गुह्य गोष्टी जाणून घेण्याची क्षमता यांच्यापाशी असते. 

आता पाचही तत्वांचा थोडक्यात परिचय करून घेतल्या नंतर, या सर्वांना त्यांच्या मूळ उद्देशाकडे नेण्यासाठी काय करणंआवश्यक आहे, याचा विचार करूया. कारण आपल्या सर्वांचाच मूळ उद्देश मनाला शांत करून, आत्मशक्ती प्राप्त करण्याच्या मार्गात जुंपणं हा आहे. आत्मशक्ती जी अर्थातच मनाच्या शक्तीवर अवलंबून असते आणि मन बुद्धी व देह, ही तीनही जेंव्हा एकाच पातळीवर येऊन, एकच कृती करतात, त्यावेळी मनोबल प्राप्त होऊन, सततच्या प्रयासाने हेच मनोबल उच्च होत जातं. 

या मनोबलाच्या आधारावर आत्मविश्वास प्राप्ती होऊन, तो आत्मविश्वास आत्मबलाकडे आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे वरील पाचही तत्वांच्या व्यक्तींना सर्वात प्रथम, मनाला शांत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी सर्वात प्रथम, एका स्थानी।स्थिर बसून, चित्ताला एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. आता स्थिरचित्त कसं व्हायचं आणि मन देह व बुद्धी यांना शांत बसण्या साठी काय करावं, किंवा कसं करावं, यावर उद्याच्या भागात विचार करूया. तोपर्यंत नामाने मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवूया. 

उद्याच्या भागात उरलेल्या तीन तत्वांच्या प्रभावतील व्यक्तींचा अभ्यास करूया. परंतु तोपर्यंत आपलं नामाचं नित्यकर्म करत राहण्याचं धोरण न सोडता. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...