Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७६

भोग आणि ईश्वर  ४७६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

एखाद्या कर्मात, कार्यात मिळणारी गोडी त्या कार्यातील आपली रुची ठरवते. रुची म्हणजे एखाद्या कामाची आवड किंवा ते काम करण्यातील गोडी.  म्हणजे जे कार्य केल्याने किंवा त्या कार्याच्या कल्पनेनेसुद्धा मिळणारा आनंद म्हणजे त्या कार्यातील रुची. आपल्याला एखादा विषय आवडत असतो आणि त्याच कर्मात रत राहण्यात किंवा त्यातच मग्न राहण्यात देहाला बुद्धीला व मनाला मिळणारा मोद किंवा आनंद म्हणजे रुची. 

असा आनंद ही मुख्यत्वे आपल्याला, त्या विषयात मिळतो, ज्यामध्ये मन सहज ओढलं जातं. सर्वसाधारण पणे विषयाचा, विकासाचा, उपभोगाचा, वासनेचा आणि अहं सुखवण्याचा आनंद देणाऱ्या कर्मांकडे, मनाचा ओढा सहसा असतो. जे मनाला व देहाला, क्षणिक का होईना,  सुखावते, त्याकडे मन सहज झेपावते. म्हणजेच सुखोप भोग, विलास व सहजप्राप्त सुखासीनता हा मानवी मनाचा केंद्रबिंदू आहे. 

कारण सर्वांचा जीवनप्रवास हा सुखाच्या शोधार्थआहे. त्यामुळे  सुख हे,  रुची किंवा आवड निर्माण करणारी एक प्रेरणा आहे. सहसा ही प्रेरणा बाह्य जगतातून वा देहा बाहेरील वस्तूतून प्राप्त करण्याची धडपड प्रत्येक जीव करतो. अश्या धडपडीला आयुष्य हे नाव दिलं आहे. आता सर्व चित्र एकत्रितपणे बघण्याचा प्रयत्न करूया. सुखाच्या आकांक्षेने मनात रुची निर्माण होऊन, त्या प्रेरणेने जीव काही कर्म समरसून करतो,त्याकडे गांभीर्याने पहातो आणि त्या कर्मात मनाचा व देहासह बुद्धीचा सहभाग पूर्णपणे असतो. 

म्हणजेच सुखाची ओढ प्रत्येक कर्मात किंवा काही ठराविक कर्मात रुची निर्माण करते. पण त्या सुखाची प्राप्ती होण्यात तीन शक्यता असतात. एक म्हणजे पूर्ण सुख प्राप्त होणं, दुसरं अपेक्षित सुख न मिळता दुःख प्राप्ती होणं आणि  काहीही सुख वा दुःख प्राप्ती होऊन वा न होऊन उदासीनता येणं. उदासीनता ही तटस्थ स्थिती म्हणजेच नुट्रल स्टेटस होय. पहिल्या स्थितीत एक सुखाचा धागा, अश्याच प्रकारचे अजून धागे मिळवायला प्रेरित करतो. 

दुःख दोन प्रकारे कार्य करतं. एक म्हणजे पुढील कर्माला हतोत्सहित करतं किंवा पुढे अजून जास्त कर्म करण्यास प्रोत्साहित करतं. म्हणजेच सुखाची आस, दुःखप्राप्ती किंवा सुखप्राप्ती करवून देते. किंवा अतीव सुखाने किंवा अति दुःखाने मनात उदासीन भाव जागृत होतात. पण हे सर्व मनाच्या स्थितीवर आणि ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणजे मनाला ओढ कशाची आहे आणि मूळ आवड वा रुची कशात आहे. 

विषयाची, वासनेची, लोभाची, मायेची व मोहाची आवड असणारे त्या प्रकारच्या मानसिक, बौद्धिक व शारीरिक कर्मात रत राहून, त्यातून सुखप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. असे जीव, मूळ प्राणीयोनीतून, मानवी देहात आले असले तरी, त्यांची आत्मिक प्रगती फार नसते, त्यामुळे त्यांच्या मनाला, त्यांच्या आधीच्या जन्मापर्यंत प्राप्त वैषयीक ज्ञान, याकडे ओढ जास्त असते. अर्थातच आधीच्या प्राणी योनीतुन आल्यामुळे त्या जन्मातील अंते मती सा गती या न्यायाने मूळ प्रवृत्ती प्राण्यांची तशीच या देहात स्थापित होते. 

यावर अजून सखोल चिंतन उद्याच्या भागात करूया. पण नामाची प्राप्त शिदोरी उलगडून, त्यात रुची निर्माण करूया.. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...