Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७०

भोग आणि ईश्वर  ४७०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कालच्या उदाहरणाचा सखोल।विचार करूया.आपण परीक्षा देतो म्हणजे नक्की काय करतो, तर आपल्याला असलेल्या किंवा आपण प्राप्त केलेल्या, ज्ञानाची कुणी तरी ज्ञानी व्यक्ती परीक्षा घेऊन, तपासणी करतं आणि त्यावरून आपण पुढे जायला किती पात्र आहोत, हे ठरवतो. ती व्यक्ती असेल व्यवस्था असेल, संस्था असेल. 

म्हणजे काही विशिष्ट सरकारमान्य किंवा सरकारी व्यवस्थेने आखून दिलेल्या अभ्यासक्रमाचा, आपण अभ्यास करून, त्या ज्ञानाची आपण कसोटी देतो. आता हेच सूत्र जीवनाकडे लावून बघून. एक स्वयंसिद्ध व्यवस्था ईश्वर, ज्याने या ब्रह्मांड नामक व्यवस्थेची स्थापना केली आणि त्याला काही शास्त्रीय व वैज्ञानिक नियम घालून दिले. त्या सर्व एकत्रित व्यवस्थेला निसर्ग आणि त्याचं सुत्रसंचालन करणाऱ्या नियंत्रकाला विधाता म्हटलं जातं व ज्या नियमाने हे सर्व बांधलं आहे त्याला नियती म्हणतात. 

आता या सर्व व्यवस्थेची गरज काय, तर ईश्वराची इच्छा आणि त्यानुसार सर्व प्राणिमात्र आणि निसर्ग अशी सर्व कष व्यवस्था निर्माण करून, ती व्यवस्था स्वयंपूर्ण पद्धतीने चोख चालेल, याचीसुद्धा तरतूद करून, मगच विधात्याचा हातात हे सर्व सोपवलं. त्या क्षणापासून आजपर्यंत ती व्यवस्था सुरळीतपणे सुरू आहे. 

मध्ये मध्ये ज्या ज्यावेळी काही शक्ती,या ब्रह्मांडातील कोणत्याही व्यवस्थेत बाधा आणून, इजा पोचवण्याचा प्रयत्न करतात, त्या त्यावेळी, ईश्वर आधी अप्रत्यक्षपणे ती गडबड वा गोंधळ स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनंतरही जगाची व्यवस्था सुरळीतपणे चालू होतं नाही किंवा पुन्हा त्यात काही विपरीत स्थिती निर्माण होते, त्यावेळी ईश्वर स्वतः प्रत्यक्ष येऊन, सर्व व्यवस्था पुन्हा चोख होईल हे पाहतो. 

आता या सर्व व्यवस्थेतील घटक असलेले आपण, जे जाणते पणी वा अजाणतेपणी या व्यवस्थेचा भाग म्हणून, येथील कर्मफल नियमानुसार क्षणोक्षणी नित्य परीक्षा देत आहोत. कर्मफल भोगत असताना, आपली परीक्षा यासाठी घेतली जाते की, आपण या दुःख, भोग, दैन्य, दारिद्रय, या सर्वांना कसे सामोरे जातो. कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण पेपर असतो वा असू शकतो. आपणच निर्माण केलेल्या या कठीण प्रश्नांची सोडवणूक आपण कशी करतो. 

आपली त्या परिस्थितीला सामोरे जायची तयारी, त्या काळातील आपली प्रतिक्रिया प्रतिसाद हे सर्व आपली  या परीक्षेतील उत्तरं असतात. आपण धैर्याने, निराश न होता. त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे गेलो की,ईश्वर नामक आपल्या अध्यापकाला त्या गोष्टींचा खूप आनंद होतो. जसा आपल्या शिक्षकांना कठीण प्रश्न वा पेपर्स उत्तमरीत्या सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक असतं, त्याच प्रमाणे ईश्वराला, दुःखं, दैन्य, संकटं झेलून, हसत हसत पुढे जाणारे, उन्नत आत्मे खूप भावतात. 

विषय  गहन आणि खोल असल्यामुळे उद्या आपण चिंतन सुरू ठेवू, तोपर्यंत ईश्वर स्मरणाने त्याला आळवण्याचा प्रयत्न करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...