Skip to main content

भोग आणि ईश्वर ४५९

भोग आणि ईश्वर  ४५९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

वायूत्वावर आधारित देहरचना प्राप्त जीव चंचल आणि बदलत्या मतांचा असतो. त्यामुळे अश्या व्यक्तीला सर्वात प्रथम त्याची चंचलता सोडून,शांतता स्वीकारण्याचा सराव करावा लागेल. यासाठी, सुरवातीला, दिवसातून ठराविक वेळ निवडून, काही क्षण शांत बसून राहण्याचा सराव करावा लागेल. अश्यावेळी काही जप, मनन वा चिंतन सुद्धा न करता, फक्त निर्विचारी व स्थिर होण्याची सवय मुद्दामहून लावून घेण्याचा सराव करणं क्रमप्राप्त आहे. 

कारण अश्या व्यक्तीला सुरवातीलाच काही विचार वा नाम वा तत्सम काही करावयास दिलं तर, त्यातही त्या व्यक्तीची चंचलता आड येऊन, एका विचारातून, दुसऱ्या विचारात आणि एक नाम वा जाप यातून, संभ्रमावस्थेत येऊन, हे करू की ते, असा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे चंचल स्वभावाच्या व्यक्तीला एकतर काहीच पटत नाही किंवा सर्वच पटतं. पण त्यामुळे निश्चित मत वा विचार मनात ठाम राहात नाही. 

याचसाठी फक्त बैठकीचा सराव खूप महत्वाचा आहे. अश्या वेळी अश्या प्रयत्नात, देह, बुद्धी व मन हे तिन्ही घटक, स्थिर होणं महत्वाचं आहे. कारण अश्या चंचल व्यक्तीची बुद्धी, मन आणि देह हे तिन्ही, चंचल असतात वा असू शकतात. असा स्थिर बसून निर्विचारी होण्याचा सराव वा तसा प्रयत्न काही काळ करताना, सुरवातीला, अनेक अडथळे,अडचणी, गोंधळ, गडबड होऊन, त्याद्वारे मनाची व बुद्धीची प्रचंड अस्वस्थता होऊ शकते. 

याव्यतिरिक्त, कोणत्या वयात हे प्रयत्न वा हा सराव आपण करतो आहोत, त्याचाही परिणाम, लवकर किंवा उशिरा, चित्ताला स्थिरता प्राप्त होण्यावर, होऊ शकतो. यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो अश्या लोकांमध्ये कमी असतो किंवा पूर्णतः नसतो, तो म्हणजे इच्छाशक्ती. इच्छा शक्ती ही मनाच्या ऊर्जा व एकाग्रता यांचं प्रतीक आहे. पण या लोकांबाबत मुळातच एकाग्रतेचा अभाव असल्या मुळे, मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक इच्छेमागे, कार्यरत  ऊर्जा ही निश्चितच कमी किंवा शून्य असते. 

त्यामुळे स्थिरता जसजशी प्राप्त होत जाईल व दृढ होत जाईल, तसतशी इच्छा, ऊर्जा आणि त्याबरोबर बल किंवा शक्ती,हळूहळू वाढत जाऊन,एकाग्रतेला आवश्यक बैठक तयार होऊ शकते. अर्थात हेसुद्धा मनाच्या स्थिर, शांत व विचारी होण्यावर अवलंबून आहे. म्हणून वायूत्वाने युक्त व्यक्तींना बैठक व स्थिरता यांचा , सुरवातीला, सराव करणं गरजेचं आहे. 

जलतत्व व वायुतत्व यांनी युक्त व्यक्तींनी मनाची ऊर्जा व शक्ती यासाठी काय करावं, हे आपण पाहिलं. त्यासाठी आवश्यक सराव व प्रयास आपण करतच राहू. पण तो पर्यंत आपण नामाने साधणाऱ्या अनेक लाभांचा अनुभव घेतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...