Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७५

भोग आणि ईश्वर  ४७५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल पाहिलं त्याप्रमाणे श्रद्धा ही मनाची ती स्थिती आहे ज्यामध्ये एकातच अनेक दिसतात आणि अनेकात एकच दिसतो. ही श्रद्धेची परमोच्च अवस्था. इथे भक्तीरूप श्रद्धा एका लक्ष्यावर पूर्ण थांबलेली असल्यामुळे कसलाही भेदा भेद आणि भेदभाव उरलेला नसतो. असा परमोच्च बिंदू जिथे किंतु परंतु हे सर्व संपलेले असतात. 

या अवस्थेचा किंचित अनुभव आपण, परीक्षार्थी असताना, परीक्षा जवळ आल्यावर, अभ्यास करताना, घेतो. त्या काळात तहानभूक सुद्धा लागत नाही. खेळ सुचत नाहीत आणि एकदा ती परीक्षा दिल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. अशीच अवस्था क्वचित प्रसंगी एखादं महत्वाचं कार्यालयीन, कौटुंबिक वा सामाजिक कार्य हाती घेतल्यावर, त्यात गुंतलेल्या काही जणांना येतो. 

काही जणांना यासाठी म्हटलं की, ते कार्य तुम्ही किती गांभीर्याने घेता त्यावर ते अवलंबून असतं. म्हणजे फारसं गंभीरपणे एखाद्या गोष्टीकडे न बघणाऱ्यांना, त्यात फार काही विशेष वाटत नाही. म्हणजे झालं तर झालं नाहीतर नाही,अश्या वृत्तीच्या लोकांना,अश्याच नव्हे ते कोणत्याही गोष्टींचं वा कार्याचं, महत्व वा गांभीर्य वाटत नाही जाणवत त्याहूनही नाही. 

याचाच अर्थ एखाद्या कार्याची सफलता, त्यात तुमची असलेली मानसिक गुंतवणूक किंवा समरसता किती आहे, त्यावर अवलंबून आहे किंवा असते. म्हणजेच ही मानसिक समरसता, त्या कार्यातील तुमचा गंभीर सह भाग किंवा सहभागातील गांभीर्य ठरवतं. ही समरसता जितकी अधिक तितके तुम्ही, त्या कार्याबद्दल अधिक गंभीर आणि तितकाच तुमचा सहभाग अधिक. 

म्हणजे समरसता गांभीर्य आणि सहभाग हे एक सामायिक समीकरण आहे. जे एका दिशेने जातं आणि त्याप्रमाणे कार्याचं यश वा अपयश ठरवतं. या सर्वांच्या सकारात्मक चढत्या क्रमावर कार्यातील मनाची एकाग्रता ठरते. ती एकाग्रता वाढवण्यासाठी व्यक्ती व मन यांचा सहभाग, गांभीर्य आणि समरस असणं आवश्यक आहे. त्यायोगे एकाग्रतेचं सकारात्मक उत्तर मिळू शकेल. 

पण या सर्व गोष्टी तेंव्हाच शक्य आहेत किंवा हे समीकरण सकारात्मक तेंव्हाच होईल जेंव्हा, त्या कार्याची रुची वाटेल. अर्थात ज्यावेळी आपल्याला आपण करत असलेल्या किंवा कराव्या लागणाऱ्या कार्यात, रुची वाटेल, त्यावेळी आपण त्यात समरस होऊन गंभीरतेने कर्म करून, आपला, त्यातील सहभाग वाढवू. हे सर्व साधल्यावर, आपली एकाग्रता वाढून, योग्य कर्म सांधलं जाईल. 

आत अनेक नव्या गोष्टी, समिकरणाची नवी त्रिसूत्री आणि त्याची पूर्व तयारी रुचीच्या रुपात पाहिल्या. त्यावर उद्या चर्चा पुढे सुरू ठेवू. तोपर्यंत नामाच्या मार्गाने जातच राहू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...