Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६६

भोग आणि ईश्वर  ४६६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

शक्तीचा आघात किंवा प्रहार किंवा पात करून, अणूसम आत्म तत्वातील  ज्ञानाच्या अग्राला छेदून किंवा भेदून, आतील अलौकिक,, अद्वितीय आणि अमर्यादित ज्ञान, बाहेर प्रसारित व्हायला सुरुवात होते. इतक्या सूक्ष्म अंशात्मक आत्म्याच्या गाभ्यात, इतकं विशाल चिरंतन आणि अद्भुत ज्ञान कसं काय सामावलेलं असतं, हा प्रश्न वास्तविक संगणक युगात पडता कामा नये. 

कारण संगणकातील एखाद्या काही किलोबाईट्सच्या सॉफ्ट वेअरमध्ये, एखादा प्रोग्रॅम, ज्याप्रमाणे झिप फॉरमॅटमध्ये सामावलेला असतो, त्याप्रमाणे हे अमर्यादित ज्ञान, सुक्ष्मरूप स्वरूपात अर्थात झिप फॉरमॅटमध्ये साठवलेलं असतं. आता हे सॉफ्टवेअर उघडायला, एखादी छोटीशी exe file, त्यात समाविष्ट केलेली असते. ज्यावेळी आपण ते exe अँप्लिकेशन ओपन करतो. 

त्यावेळी त्या exe file मधील प्रोग्रॅम run होतो आणि ते संपूर्ण सॉफ्टवेअर, आपल्या संगणकातील हार्डडिस्क मधील, प्रोग्रॅम फोल्डरमध्ये, स्थापित अर्थात डाउनलोड होतो. हीच गुंतागुंतीची प्रक्रिया, ज्यावेळी एखादा आघात वा प्रहार किंवा पात, मनाच्या मार्गे आत्मतत्वातील या साठवलेल्या किंवा स्थापित करण्यात आलेल्या ज्ञानरुप प्रोग्रॅमवर होतो. 

हा आघात पुण्यकारक योगाने, एखाद्या आत्म्याच्या प्रवासात, एखाद्या जन्मात होऊन, आतील विश्वरूप चैतन्यमय ज्ञानाची जाणीव, त्या देहातील, आत्म्याला होते. हा सुप्त मनाच्या मार्गे घडणारा आघात, जागृत मनाला जाणवेलच असं नाही. कारण जागृतावस्थेत असा आघात होईलच असं नाही. किंवा तो सहन करण्याची आत्मशक्ती त्या देहात असेल असंही नाही. पण सुप्त अवस्थेत जरी असा आघात।झाला तरी, सदर ज्ञानाचा झरा पाझरायला सुरुवात होते. 

कारण वरील उदाहरणातील exe file मुद्दाम किंवा चुकून जरी run झाली तरी, त्यात दडलेला मूळ प्रोग्रॅम ओपन होऊन स्थापित म्हणजे डाउनलोड होणारच. कारण सदर exe file आणि आतील प्रोग्रॅम आज्ञावलीवर कार्य करतात आणि सदर आज्ञा कळ अर्थात exe file run केली की, पुढील काम त्यानंतर आपसूक होणार, हे नक्की. म्हणून, देहाच्या कोणत्याही अवस्थेत हे ज्ञान उलगडून, अनेक प्रकारच्या ज्ञानाची केंद्रं उघडायला सुरवात होते. 

या अवस्थेत सदर व्यक्तीचा एखाद्या देहात अंत झालाच तर, पुढील जन्मात त्या व्यक्तीला त्यातील एखादी कला, साधना, एखाद्या क्षेत्रातील ज्ञान, खासियत हे जन्मतः किंवा अल्पश्या प्रयत्नाने साध्य होतं. आपण अशा अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत, ज्यांना काहीही शास्त्रोक्त अभ्यास, वाचन, सराव वा प्रयास नसताना उपजत एखाद्या क्षेत्रात कलेत, शास्त्रात, विज्ञानात, गणितात किंवा कोणत्या तरी विषयात प्रवीण असतं. 

वानगीदाखल मी किशोरकुमार यांचं उदाहरण देईन. ज्यांना, शास्त्रीय संगीताच्या कोणत्याही खास प्रशिक्षणा शिवाय, उत्तम गायन जमलं. नुसतं जमलंच नाही तर स्व. लतादीदी, रफीसाहेब व आशाताई यांच्यासारख्या पक्क्या शास्त्रीय बैठक असलेल्या गायकांसमोर उभं राहून, त्यांनी अनेक गाणी गायली. म्हणजे हे ज्ञान कोणाला कोणत्या जन्मी प्राप्त होऊन, आत्म्याच्या प्रवासा तील कोणत्या देहात, ते वृद्धिंगत होऊन, कोणत्या देहात फुलेल, हे विधातच जाणू शकतो. 

विषय खूप सखोल आणि गहन आहे.म्हणून या ज्ञान प्राप्ती, आघात, प्रहार किंवा पात यावर वा ततसंबंधी अजूनही दीर्घ चिंतन होऊ शकतं. ते आपण पुढील भागात सुरू ठेवू. अर्थातच या मार्गातील एक अत्यंत महत्वाच्या सद्गुरू कृपेच्या प्राप्ती साठी, त्यांच्या आज्ञेने प्राप्त नामजप करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...