Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६९

भोग आणि ईश्वर  ४६९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल की, एखाद्या सर्व सामान्य माणसाला, भगवंतांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी स्वतः भगवंत सहाय्य करतात. पण त्यासाठी ती व्यक्ती किती पात्र आहे हे देखील पारखून घेतलं जातं. कारण ज्याप्रमाणे दान हे सत्पात्री असावं लागतं, त्याप्रमाणे ज्या जीवाला या जगतातून पार, ब्रह्मांडाच्या बाहेर भगवंताच्या हृदयात स्थान द्यायचं असेल तर, नक्कीच तो जीव, तो आत्मा आणि ते मन शुद्धता आणि सात्विकता यांच्या कसोटीवर उतरलं पाहिजे. 

यासाठी ज्याप्रमाणे आपण शाळा कॉलेजमध्ये परीक्षा देऊन आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो. पण ते सिद्ध होण्याचे काही निकष, परीक्षा घेणाऱ्यांनी तयार केलेले असतात. त्या निकषांवर आधारित अभ्यास क्रम ठरवलेला असतो, त्यावर आधारित प्रश्न , परीक्षेच्या रुपात वा माध्यमातून विचारले जातात ज्यांना, त्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण क्षमतेने व तयारीने देता येतात, ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतात आणि पुढे जातात. 

या छोट्याशा गोष्टीत वा उदाहरणात अनेक कंगोरे आहेत. म्हणजे परीक्षार्थी हा आपणहून एखाद्या अभ्यासक्रमाची निवड करतो. जो अभ्यासक्रम निवडतो, त्याची परीक्षा होणार, प्रश्न येणार, त्यामध्ये उत्तम, साधारण ते अनुत्तीर्ण यापैकी काहीही होऊ शकतं. पण परीक्षा घ्यावीच लागेल  तरच पुढे जाता येईल. म्हणजे मागे राहून आपली अधो गती होणार किंवा प्रगती खुंटणार, हे त्याला माहित असतं किंवा माहित करून दिलं जातं. 

आता यातून पास झाल्यावर, अजून पुढे शिकत राहून, एका विशिष्ट वेळी, आपण जगात बाहेर पडून ते सर्व मिळवू, ज्या साठी किंवा ज्या उद्देशाने ही शिकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता एवढं सगळं आपण करतो, कारण आपण जाणतो की, आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे परीक्षा घ्यावीच लागेल. तरच या व्यावहारिक जगात आपण तग धरू शकतो. 

आता हे सर्व आपण जर अध्यात्मिक पातळीवर आत्मो न्नती साठी, या देहात आलेल्या आत्म्याच्या संदर्भात लागू केलं, तर सर्व चित्र किती स्पष्ट होईल. आपण म्हणजे देह नसून, त्यात वसलेला आत्मा आहोत. आपण एकादेहातून दुसऱ्या देहात फिरतो, म्हणजे आपण आत्म्याच्या प्रवासा तील एकेक टप्पा पार करत पुढे जातो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या सर्व चांगल्या व वाईट  घटना किंवा भोग आणि उपभोग देणारे अनुभव हे सर्व त्या परिक्षांसारखे आहेत, ज्यामुळे आपण या परीक्षेत उत्तीर्ण वा अनुतीर्ण होतो. 

हे सर्व कसं काय समजायचं किंवा याची संगती कशी जोडायची, हे सर्व आपण उद्याच्या भागात पाहूया. पण नामाची कास न सोडता.

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...