Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८२

भोग आणि ईश्वर  ४८२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल आपण स्मरणाबद्दल बोलत होतो. त्याच संदर्भात एक श्लोक आठवतो. 

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

विष्णूसहस्त्रनामात महाविष्णूंच्या स्मरणाच्या संदर्भात, त्यांच्या स्मरणाचं महत्व अधोरेखित करताना हा श्लोक येतो. वास्तविक हा श्लोक जरी, एक श्लोक म्हणून येत असला तरीही, माझ्या मते, ईश्वरस्मरणसंदर्भात हा श्लोक एका पूर्णरुप मंत्राप्रमाणे आहे.  त्याचं कारण आपण उद्याच्या भागात जाणून घेऊया. 

स्मरण, एखाद्या हयात व्यक्तींचं, नित्य वा नियमित केल्यास, कालांतराने, ती व्यक्ती आपल्या संपर्कात येते आणि एकदातरी त्या व्यक्तीची आपली सदिच्छाभेट होऊ शकते, असा अनुभव आहे. मग प्रत्यक्ष जगतपालकाचं स्मरण, जीव देह बुद्धी मन व त्याही पलीकडे जाऊन, आत्म्यापासून केल्यास, निश्चित अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात व होतात. 

त्याचंच महत्व अधोरेखित करणारा हा श्लोक आजच्या लेखा साठी निवडला. स्मरण म्हणजे एखाद्याची आठवण येणं, आठवण काढणं, त्या व्यक्तीच्या आठवणी काढणं. सासरी गेलेल्या लेकीची आठवण काढणाऱ्या एखाद्या आईला, याचं महत्व वेगळं सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. कारण आईला लेकीची व लेकीला आईची आठवण सतत येत असते. 

कित्येकदा ती आठवण वा ते आठवणं अव्यक्त असतं, म्हणजे मनात, अंतर्मनात वा अंतर्मनाच्या आतल्या कप्प्यात असतं. तरीही दोघीनाही ते देहाच्या पार, हृदया तून हृदयापर्यंत जाणवतं. अगदी हेच ईश्वर स्मरण आणि मनुष्य या संदर्भात म्हणता येईल. स्मरणं म्हणजे हृदयात, मनात, सुप्तमनात आणि आत्म्याच्या गाभ्यात ईश्वराला सतत आठवणं. हे स्मरण, खरतर जीव, ईश्वरापासून, विलग होऊन, चैतन्यावस्थेत अंतराळात भटकत असतानासुद्धा होत असतं. 

त्या चैतन्यावस्थेत स्मरण हे शुद्ध स्वरूपातील आत्म्याचं प्रतीक वा प्रचिती आहे. पण देहात आल्यानंतर, देहाचे विकार, माया, देहामुळे प्राप्त विश्वातील संस्कार, मोह, लोभ, प्रलोभनं या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन, जीव या ब्रह्मांडाचा भाग होऊन, या विश्वात लुप्त होऊन, सर्व आत्म्याच्या स्मृतीतून विस्मरणात जातं. त्याची विश्वात्म्याशी असलेला संपर्क किंवा connectivity ही नाहीशी होते. जन्मोजन्मीच्या देहाच्या, बुद्धीच्या व मनाच्या संस्कारांमुळे, त्या शुद्ध स्वरूपातील आत्मा अशुद्ध होत जातो. 

देहधारी आत्मा, जगाच्या आणि संसाराच्या बंधनात, हेच विसरून जातो की, या जगात येण्याचा मूळ उद्देश काय आहे आणि विधात्याला काय अपेक्षित आहे. खरंतर विश्वात आलेल्या प्रत्येक जीवावर, ईश्वराचं तितकंच प्रेम, स्नेह व माया असते, जितकी एका आईची, आपल्या सर्व मुलांवर, सारखीच माया असते. पण बुद्धिभेद व बुद्धिभ्रम झालेल्या देह व मन यांना, हे जाणवत नाही वा लक्षात येत नाही. 

ज्याप्रमाणे, बुद्धिभेद केलेल्या व चुकीच्या मार्गावर नेण्यात आलेल्या, एखाद्या व्यक्तीला, हे लक्षात येत नाही की, तो हित करत आहे की अहित. त्याचप्रमाणे, या जगतात विशेषतः मनुष्य देहात आल्यावर, बुद्धीच्या, मायेच्या व जगाच्या एकूण प्रभावात जीव बुद्धिभेदीत होऊन आपला, ईश्वराकडे जाण्याचा व ईश्वर भेटीचा मूळ मार्ग व मूळ मंत्र विसरून, जगाच्या तापात, लोभात, मोहात व मायेत गुरफटून जातो. 

या सर्वातून, विश्वात्मा असलेल्या विश्वव्यापी ईश्वरी शक्तीशी संपर्क स्थापित करून, जन्मजन्मांतरीच्या बंधानातून मुक्त होण्या साठी, एक सरळ उपाय, त्याच्या मात्र स्मरणाने, जन्म व संसार यातील सर्व प्रकारची बंधनं, जी जडजीवाला, मुक्ती व मोक्ष प्राप्तीच्या मार्गापासून परावृत्त करतात, ती सर्व बंधनं, बाजूला होऊन, जीव मुक्तीच्या मार्गावर जातो. 

यासाठी एकच उपाय म्हणजे श्रीमहाविष्णू आणि त्यांच्या प्रभावाचं, स्मरण, जीवाने नित्य करावं. हे श्रीमहाविष्णू आणि त्यांचा प्रभाव म्हणजे काय आणि याचा अजूनही सखोल अर्थ व गुह्यर्थ जाणून घेऊ उद्याच्या भागात. तोपर्यंत ईश्वर व सद्गुरू यांच्या स्मरणाचं आपलं कर्म।आपण करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...