Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८०

भोग आणि ईश्वर  ४८०   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

ईश्वर कथित सहजसोप्पा आणि सहजसाध्य मार्ग, जो फक्त त्याच्या स्मरणातून जातो आणि थेट त्याच्या हृदयापर्यंत पोचतो, तो मार्ग,वास्तविकपणे सार्वत्रिक वापराचा राजमार्ग आहे. राजमार्ग म्हणजे ज्यावर मोकळे पणाने कोणीही येऊ जाऊ शकतो. पण तरीही त्याचा उपयोग, म्हणावा तितका प्रभावाने होताना दिसत नाही, याची काय कारणं असतील, त्याचा शोध घेऊया. 

मुळात जीवात्मा देहात बद्ध झाल्यावर आत्मोद्धाराचा मार्ग हा मनाच्या माध्यमातून जातो. म्हणजेच मनाच्या स्थितीवर व वर्तनावर सर्वकाही अवलंबून आहे किंवा अवलंबून असतं.कसं ते बघूया. मन हे इंद्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापक आहे. त्याच्या कार्यावर देहातील सर्व तंतू, मज्जासंस्था वा चेतासंस्था,प्रत्येक पेशी,धमन्या, रक्तवाहिन्या, नाड्या इतकंच काय तर ब्रह्मांडातील सर्व ज्ञान जाणून, ग्रहण करण्याची शक्ती व व्यवस्था आहे, हे अगदी विज्ञानसुद्धा जाणतं. 

म्हणूनच मनाच्या अवस्थेला, स्थितीला, मनातील गुण अवगुण, तत्व, अपेक्षा, इच्छा, वासना या सर्वांना अनन्यसाधारण महत्व आहे. या व इतर अनेक गोष्टींच्या प्रभावातून मनावर असंख्य प्रकारचे दबाव कार्य करत असतात. त्यामुळेच मनाची जडण घडण ही क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे. त्यावर नियंत्रण ठेवणं हेसुद्धा अत्यंत कठीण कार्य आहे. अनेक प्रकारची व्यवधानं सांभाळण्याची सोय,  अनेक प्रसंग हाताळण्याची हातोटी, , अगदी क्षणाक्षणाचं सर्व साठवून ठेवण्याची शक्ती व सोय या मनाच्या कुपीत आहे. 

अत्याधुनिक जगतात चीप फॉरमॅटमध्ये ज्याप्रमाणे कित्येक GB माहिती व केलेलं कार्य साठवून, ते आवश्यकता असेल त्यानुसार पुनः पुनः वापरता येतं. त्याचप्रमाणे अनंतकोटी वर्षांपूर्वी विधात्याने तयार केलेल्या या मनरुपी इंद्रियामध्ये, जन्मातील अनेक व अनेक जन्मांच्या आठवणी साठवण्याची सोय विधात्याने केली आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम मनाच्या बाह्य अवस्थेवर होतो आणि त्याची सद्यस्थिती आपण काही अंशात्मक स्वरूपात प्रकट रुपात बघतो. 

या सर्व प्रभावातून,मन अनेक रंग, रूप व स्थिती दर्शवतं. या सर्वाचा प्रभाव इतका शक्तिशाली आहे किंवा असतो, ज्यामुळे भ्रमित झालेला जीव, काय करावं आणि काय करू नये, हे ठरवण्याच्या पलीकडे असतो. म्हणूनच सर्वसामान्य जनांना आपली खरी ओळख, खरा मार्ग व खरा अंतिम उद्देश ज्ञात व्हायला कित्येक जन्म मोजावे लागतात. 

तरीही यातून वाचण्यासाठी ईश्वराने, आत्मस्तुतीचा आरोप सहन करूनही, आपल्याप्रत पोचण्याचा सहजसाध्य मार्ग सांगितला. जो आपण काल बघितला. त्याच्या स्मरणात नित्य कर्म करत जाऊन, त्यालाच ते अर्पून, पुढे  पुढे जात राहून,मनातील सर्व, किंतु परंतु, व्यवधानं, प्रभाव, प्रलोभनं, विकार, विखार हे त्यागून फक्त आणि फक्त कर्म आणि स्मरण या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास, आत्मोद्धार सुनिश्चित आहे. 

हा मार्ग सहज पण कालापव्यय करणारा असला तरीही, कोणत्याही प्रकारचा धोका नसलेला मार्ग आहे. पण माणसाच्या मनात अनेक प्रकारचे दोष, किंतु, विकार, शंकाकुशंका,काळज्या या वास करत असल्यामुळे या मार्गावर नित्य चालून, पुढे जाण्याचा विचार येणं हेच कर्मकठीण आहे. कारण आपला आत्मोद्धार कशात आहे, हा आत्मबोध व्हायलासुद्धा, ईश्वराच्या कृपेचा लाभ व्हावा लागतो. पण त्यासाठी मनात व माणसाकडे एक गुण  असला पाहिजे. तो कोणता, हे उद्याच्या भागात पाहूया. तरीही ईश्वराचं स्मरण करण्याची बुद्धी झाल्यास, ते स्मरण नित्य करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...