भोग आणि ईश्वर ३७४
काल आपण चित्तशुद्धीबद्दल चिंतन करत होतो.मुळात चित्तशुद्धी म्हणजे काय. आधी पण यावर आपण चिंतन केलं आहे. त्यामुळे आज जरा वेगळ्या दृष्टीने याकडे पाहूया. खरतर चित्तशुद्धी म्हणजे सर्वात प्रथम चित्तात कोणत्याही प्रकारचं अशुद्धत्व शिल्लक नाही. याचा अर्थ खूप गहन आणि अनेक प्रकारे मांडता येईल.
अशुद्धत्व हे विचार, त्या विचारांनी उत्पन्न होणाऱ्या लहरी, आपल्या मनावर, कानावाटे, डोळ्यातून, स्पर्श, रस, गंध इत्यादी मार्गातून,बुद्धी व मन याकडे आलेल्या कोणत्याही लहरींना दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियेतून प्रकट होणाऱ्या लहरी व मनात होणारं विचारमंथन, या कशातूनही, सदर अशुद्धत्व, शिल्लक असता कामा नये. म्हणजे कर्म क्रिया व प्रतिक्रिया या कशातूनही अंशभरसुद्धा चुकीचे विचार मुळातच असता कामा नये.
जगाकडे, जगाच्या रुपात अस्तिव असलेल्या ईश्वराकडे एकच ब्रह्मरूप म्हणून पाहण्याची विशाल दृष्टी निर्माण झाली पाहिजे. घडणारी प्रत्येक गोष्ट, म्हणजे कर्मरत असतानावा फल प्राप्ती दरम्यान घडणारी, ही एका समिकरणाचा परिणाम आहे. म्हणजेच जे घडेल ते कर्म व त्याचा परिणाम म्हणून घडणारं वा प्राप्त होणार फल यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. म्हणजेच ईश्वराच्या ब्रह्मांडातील प्रत्येक अनुरेणूंना ईश्वरी धाग्यांनी बांधलेलं आहे.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीत ईश्वरी कृपा आहे, ही श्रद्धा दृढ असली पाहिजे. दृष्टी अंतर्यामी असली पाहिजे. त्यामुळे जगतात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा किंवा घटकांचा मनावर काहीही परिणाम होणार नाही. शुद्ध मनात कोणताही तरंग उठत नाही. त्यामुळे आकाशात कोणत्याही गैर लहरी देहाकडून वा मना कडून प्रसारित होत नाहींत.
कर्मफल साखळीवर दृढ श्रद्धा इतकी ठाम असावी की, त्या मनात कोणत्याही गोष्टीने चलबिचल होणार नाही वा चुकीचे विचार येता कामा नयेत,हे कटाक्षाने पाहिले पाहिजे. प्रत्येक प्राणी हा आपल्या कर्माने जगत वा मृत्यू पावत असतो आणि एखाद्याच्या कर्माचा व कर्मफलाचा दुसऱ्याच्या कर्मफलाशी अंशमात्र संबंध नाही. त्यामुळे एखाद्याला मिळालेली एखादी गोष्ट, संधी वा फळानुरुप झालेल्या प्राप्तीची तुलना , दुसऱ्याच्या कर्मफलाशी करणं सर्वस्वी गैर आहे, हे ठामपणे मनात दृढ धरलेलं असावं.
यावर अजून चिंतन उद्या करूया. पण नामातून हित साधण्याची आपली साधना सुरू ठेवू.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment