भोग आणि ईश्वर ३७७
खरंतर मनाला नियंत्रणात आणून त्याद्वारे त्या मनाला शुद्ध करून त्यातून आत्मानंद मिळवण्याकडे वाटचाल करू शकतो. ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्यातून जाण्या साठी, काही काळ ते काही जन्म जाऊच शकतात. पण मग या मार्गावर चालता कामा नये का. कारण अर्धवट राहून मन खट्टू होऊ शकतं किंवा मन नियंत्रणात येण्या ऐवजी अजून अनियंत्रित व अनियमित होऊ शकतं.
त्यामुळे या प्रक्रियेत काही साध्य होत असतानाच देह नष्ट झाला तर काय अशी एक शंका मनात येऊन, माणूस प्रयत्नच करणार नाही, हे देखील घडू शकतं. कारण आधी मन शांत करून, त्याला शुद्धीप्रक्रियेतून जाऊ द्यायचं, हा एक योग आहे. योग म्हटलं की, त्याची नीती, त्याचे नियम, त्या नियमांचं पालन हे सर्व ओघानेच आलं आणि त्यासोबत आली, त्यावर नियमित वाटचाल. या सर्व प्रक्रियेतून जाताना मन पूर्ण नियंत्रणात राहूनही, पूर्ण क्षमतेने काम करत राहणं अत्यंत आवश्यक आहे.
म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग हा नीतीनियम पाळून, कठोर तप योग याग करून, साचेबद्ध आहे का. धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांना प्राप्त करण्यासाठी, नीतिनियम, शास्त्रवचनं इत्यादी पालन करत करत जे पुढे जात राहतील आणि या चारही मार्गांना प्राप्त करत मार्ग क्रमण करतील, त्यांनाच जीवनात येण्याचं जे अंतिम ध्येय आहे, ते गाठता येईल, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं किंवा म्हणता येईल का.
पण मग लाखो करोडो जीव, जे या मोह, लोभ, क्रोध, काम, द्वेष मत्सर इत्यादी अवगुणांना प्रयत्नपूर्वकसुद्धा टाळू वा नियंत्रित करू शकत नसतील तर त्यांना आपली पारमार्थिक उन्नती अर्थात आत्मउद्धाराची काही संधी वा सोय नाहीच का. कदाचित या प्रश्नाचाच विचार गीता कारांनी मनात योजून, अर्जुनाच्या माध्यमा तून श्रीमद्भगवद्गीता मांडताना, सर्व ज्ञान, सांख्ययोग, भक्तियोग, कर्मयोग सांगून, ज्यांना, बुद्धीवश, कर्मवश, मोहवश, कर्मफल योगामुळे, यांपैकी काहीही शक्य नाही, त्यांना सर्वात शेवटी अंतिम आणि सर्वात सोपा मार्ग सांगितला आहे.
त्याला शरण व स्मरण योग म्हणता येईल. मनाची एकाग्रता, त्या एकाग्रतेसाठी योग याग, अष्टांग साधन नवविधा भक्ती यातील काहीही न जमू शकणाऱ्या अनेकानेक जीवांसाठी, कृपाळू, दयाळू व कनवाळू सतस्वरूप ईश्वराने स्वतः हा मार्ग सांगून, वर हे सांगितलं की, काहीही शक्य नसेल तर मला शरण या आणि सर्व कर्म मला अर्पण करा.
हे दोन्ही कसं साध्य होईल आणि त्यासाठी काय करायचं यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. पण नामाच्या माध्यमातून ईश्वर स्मरण करणं सुरू ठेवूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment