Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८१

भोग आणि ईश्वर  ३८१ 

यावर ब्रह्मदेवांनी विचारलं, पण हे लिंग व जिव्हा हातात धरण्याचं प्रयोजन काय आणि हे कली तुझ्या कार्यकाळा तील या युगात कोणीही या प्रभावातून वाचणार नाही का आणि धर्म न्याय नीती या मार्गावर चालणारे खरे भक्त कसे काय या प्रभावातून वाचू शकतील. 

यावर कलीने उत्तर दिलं 

श्रीब्रम्हाजी आपल्या प्रश्नातच आपलं उत्तर दडलेलं आहे. ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की, सरळ न बोलता तिरकस बोलणं, विनम्रतेचा अभाव असणं, हे कलियुगातील दुर्गुण बहुतेक इथूनच सुरू झाले आहेत. कलियुगातील सज्जन, चरित्रवान मानवाची स्थिती काय असेल, याची कल्पना करून,  ते मनोमन थोडे दुःखी झाले. पण तरीही आपली सात्विकता न सोडता ते म्हणाले. 

हे कली तूच जर स्पष्ट करून सांगितलेस तर सर्वांना समजण्यास सोप्प जाईल, असं मला वाटतं. 

श्रीब्रह्मदेवांच्या या कथनावर कुत्सितपणे हसून कली म्हणाला 

माझ्या त्या कृतीचा अर्थ असा आहे श्रीब्रम्हाजी की, ज्यांना आपलं तोंड अर्थात भाव , बोलणं, क्रोधाचं प्रकटी करण, मोहवष व विकारवश बोलून जाणं, हलक्या कानाने ऐकून, विचार न करता, बोलून जाणं, उदरभरण अर्थात अन्नग्रहण या सर्वांवर नियंत्रण ठेवता येईल, अर्थातच ज्यांचा आपल्या जिव्हेवर आणि वाचेवर ताबा असेल, ज्यांची जिव्हा सैल सुटणार नाही आणि दुसऱ्या अर्थाने ज्यांचं भोजनादी बाबतीतसुद्धा जिव्हेद्वारे स्वतःवर नियंत्रण असेल, अश्या सर्वांना कलीची अर्थात त्या युगा तील शारीरिक, मानसिक व आत्मिक विकारांची बाधा होणार नाही. म्हणजेच अश्यांना मी कोणत्याही प्रकारे बद्ध करू शकणार नाही. 

दुसऱ्या हाताने लिंग धरलेल्या कृतीचा अर्थ असा आहे की, ज्यांचा स्वतःच्या कामवासनेवर, कामांधतेवर, त्या भावनांवर नियंत्रण असेल किंवा ज्यांना अशा बाबतीत अल्पसंतुष्टता असेल त्या सर्वांवर माझ्यामुळे, या युगात येऊ घातलेल्या अवगुणांचा,त्याद्वारे होणाऱ्या अधोगतीचा काहीही प्रभाव पडणार नाही.

श्रीब्रह्मदेव म्हणाले अर्थातच जिव्हा व लिंग ही, कलियुगा तील  दोन महत्वाची, इंद्रियं आहेत असं तुला म्हणायचं आहे तर. पण अजून सविस्तरपणे ऐकण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे, म्हणून तू अजून विस्ताराने कथन करावेस. 

श्रीब्रह्मदेवांच्या या कथानावर कली सूचक स्मित करून म्हणाला जशी आपली इच्छा. आपल्या इच्छेनुसार मी अजून विस्ताराने हे गुह्य कथन करण्याचा प्रयत्न करतो. देवाधिदेव महादेव व शेषशायी भगवान श्रीमहाविष्णू हे दोघेही, हे गुह्य जाणतात. पण आपल्या इच्छेनुसार मी ते कथन करतो. जिव्हा ही प्रातिनिधिक इंद्रिय म्हणून गृहीत धरलं तर फक्त उदर वा अन्नपचन संस्था इतका संकुचित  अर्थ यातून प्रकट होत नाही. 

सूक्ष्म चिंतन करता हे लक्षात येईल की, मुख हे अन्न व श्वास दोन्हींचं द्वार आहे. त्यामुळे शुद्ध अशुद्ध, सात्विक तामसी असा कोणताही आहार करण्याची व श्वसन करण्याची, मुभा विधात्याने, या मुखरचनेतून केली आहे. द्वापारयुगापर्यंत मोहलोभ, आचारविचार, आहार विहार या सर्वांच्या सवयी, त्या त्या युगांच्या प्रभावामुळे मर्यादेत राहून, फार खालच्या पातळीवर गेल्या नाहीत. किंवा बहुतांश लोकांना त्या फार अनियंत्रित करण्याचा मोह झाला नाही. 

कलीच्या कथनाचं चिंतन आपण सुरू ठेवू पण पुढील भागात, तोपर्यंत नामाच्या माध्यमातून आपण हित साधण्याचा प्रयत्न करत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...