भोग आणि ईश्वर ३९२
गेल्या सात आठ भागातील, कलियुगाबाबतच्या विस्तृत कथेमधून लक्षात येणारे काही ठळक मुद्दे आपण आज बघूया.
प्रत्येक युगाची वा त्या त्या युगांच्या स्वामींची स्वतःची मालकी, त्या त्या काळावर असते. म्हणजेच त्या संपूर्ण काळावर त्या युगास्वामींची सत्ता असते हे निर्विवाद. तो स्वामी त्या काळातील ब्रह्मांडाचा प्रबंधक अर्थात मॅनेजर असतो.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, भगवंत ज्यावेळी एखादी रचना वा निर्मिती करतात, त्यावेळी, त्या रचनेला व त्यातील प्रत्येक घटकाला, पूर्ण स्वातंत्र्य प्रदान करतो. त्या काळाला व्यक्त होण्याची व त्या त्या युगानुसार सर्व घडण्याची पूर्ण व्यवस्था वा मुभा त्या युगास्वामींला असते.
म्हणजेच आज आपण लोकशाहीबद्दल जे बोलतो, वास्तविक त्या लोकशाहीचा खरा जनक वा त्या संकल्पनेचा उद्गाता स्वतः भगवंत आहे. आपल्या इथल्या व्यवस्थेप्रमाणे ईश्वरनिर्मित या व्यवस्थेत काय काय गोष्टी आहेत, हे आपण आता तपासून पाहू.
व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, वर्तणुकीचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अशी आज अस्तित्वात असलेली वा अजून आपण आत्मसात न केलेली अशी सर्व स्वातंत्र्य, ईश्वराने, सर्व युगास्वामींना दिली आहेत.
अशी स्वतंत्रता त्या त्या युगातील मानवालासुद्धा दिली आहे. म्हणजेच मानवाला कर्माचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे स्वातंत्र्य कर्म करण्याचं किंवा न करण्याचं असं दोन्ही प्रकारचं आहे. मानवच निश्चित करू शकतो की, काय, कसं कुठे करायचं ते. ईश्वर त्यात कोणत्याही प्रकारे दखल देत नाही किंवा सहभागसुद्धा घेत नाही.
भगवंत यात कोणतीही दखल स्वतः करत नाही. म्हणजे तो एखादा गुन्हा घडताना वा एखादा प्रसंग घडताना साक्षी असतो. सर्व कारभार हा कर्मफलस्वरूपातील असल्यामुळे, वास्तविक कर्ता व धर्ता मानवच आहे. म्हणजेच आपलं हित या अहित मानव स्वतः निर्माण करून ठेवतो.
तरीही कृपाळू व परम दयाळू ईश्वर, आपल्या कृपेची बरसात, लहरीस्वरूपात, या ब्रह्मांडात सर्वत्र करतच असतो. या कृपेचा प्रभाव ब्रह्मांडात सर्वत्र सारख्याच प्रमाणात असतो. त्याची प्राप्ती करण्यासाठी आवश्यक पूर्तता कशी करावी, किंवा काय काय करावं हेदेखील स्वतः अनेक रुपात प्रकट होऊन, वेळोवेळी सांगत असतो.
या ईश्वरीय कृपेस पात्र सर्वजण आहेत. म्हणजे देव सुरवर, असुर व दानव आणि प्राणी व मानव हे सर्व, या कृपेस पात्र आहेत. ही पात्रता कोणत्याही पाप पुण्याशी निगडित नसून, त्या जीवाच्या समर्पणावर व शरण येण्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणूनच असुर सूर व मानव प्रत्येकालाच, आपल्या कर्मानुसार त्यास प्राप्त करून घेण्याचा समान अधिकार व समान संधी आहे.
या असीम कृपेच्या प्राप्तीने, एखादा जीव अर्थात मानव वा असुर, उन्मत्त होऊन, त्या प्राप्तीचा दुरूपयोग व दुरव्यवहार करूनही, त्या प्रमादांबद्दल शासन हे कर्मा धिष्टीत ठेवून, आपली तटस्थता व मर्यादा कधीही न ओलांडण्याची परिसीमा म्हणजे ईश्वर.
याचं प्रदीर्घ विश्लेषण उद्या सुरू ठेवू आणि नामजप नित्य करतच राहू.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment