भोग आणि ईश्वर ३८६
कलीचं संपूर्ण कथन सभेने ऐकलं. सभा स्तब्ध होती. खरंतर इतकं स्पष्ट,काही काही ठिकाणी उद्दाम व दर्पोक्तीपूर्ण वर्तन आणि कथन याआधी सभेने ऐकलं नव्हतं. त्यामुळे या कथनावर आता श्रीब्रह्मदेव काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आपल्या कथनानंतर कली, कोणालाही नमन प्रणीपात न करता, अहंकारयुक्त नजर सर्वांवर टाकून, आपल्या जागेवर जाऊन बसला.
श्रीब्रह्मदेव शांतपणे सभेला संबोधत म्हणाले. उपस्थित सर्व देव सुरवर यक्ष किन्नर गंधर्व आणि श्रोतृजनहो, खरंतर काळाच्या परिघावर फिरण्यासाठी सुसज्ज असलेल्या चारही कालप्रवाहांनी आपापल्या युगात घडणाऱ्या गोष्टी, गुह्यार्थ, त्या त्या काळात सामान्य जनांनी ईश्वरप्राप्ती व मोक्षप्राप्तीसाठी काय करावं, यावर विस्तृतपणे कथन केलं. ते पूर्ण योग्य व विस्तृत असल्या मुळे पुन्हा त्यावर मी भाष्य करणं आवश्यक आहे, असं मला वाटत नाही.
परंतु सर्वात शेवटी चवथ्या व सर्व युगांच्या मागून येणाऱ्या कलीने केलेलं कथन हे सभागृहाला अत्यंत आश्चर्यकारक, भेदक व कठोर वाटलं असेल. पण यात कलीचा दोष नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की आधीच्या प्रत्येक युगात ईश्वर स्वतः अवतार धारण करून किंवा विविध रुपात येऊन सामान्य जनांना दुष्ट, असुरी शक्तींच्या प्रभावातून योग्य वेळी मुक्त करतील हे त्यांचं वचन आहे.
परंतु त्या तिन्ही युगात भक्तीचे, ईश्वरी आराधनेचे नवविधा मार्ग, यज्ञ आदी धर्मकार्ये फलदायी असतील.ज्यामुळे, त्यांच्या करण्या कडे जनांचा ओढा असेल. परमशक्तीकडे जाण्याचे किंवा त्या शक्तीला प्रसन्न करून, आपला खरा जीवनमार्ग सुकर करण्या साठीचं कर्म, धर्ममार्गी करतील, यात शंकाच नाही. अश्या धर्म कार्याने, त्या त्या काळा तील अनंत आत्मे, पुण्यप्राप्तीनंतर स्वर्गस्थ किंवा मोक्ष गतील जातील. ते तेथे आपल्या पुण्यकाल समाप्तीपर्यंत, आपल्या पुण्यकर्मांचा उपभोग घेतील.
आता लक्षात घ्या, आधीच्या तिन्ही युगात मिळून, बहु संख्य पुण्यात्मे, आपलं भूलोकातील स्थान सोडून, वरच्या लोकांस प्राप्त होतील. म्हणजेच त्रेतायुगाच्या अंतापर्यंत आणि तद्नंतर ज्यांच्या कर्माचे भोग शिल्लक आहेत आणि जे आधीच्या तीन युगात,कर्मगतीमुळे मुक्त होऊ शकले नाहीत, ते पुढे कलियुगाप्रत पोहोचतील. या व्यति रिक्त ज्या पुण्यात्म्यांचा पुण्यकाल समाप्त झाला आहे, असे जिवात्मे पुन्हा पुण्यप्राप्ती साठी कलियुगात भूतला वर उतरून जन्ममृत्युच्या चक्रात अडकतील.
अश्या सर्व कमी पुण्यप्राप्त वा कर्मभार शिल्लक जीवात्म्याचा कार्यकाल हा कसा असेल हे आपण नक्कीच जाणू शकतो. म्हणजेच आधीच्या तीनही युगात, ज्यांना आपला कर्मभार उतरवता आला नाही आणि जे पाप, वासना मोह इत्यादी तमोगुणांना त्यागू शकले नाहीत, असे सर्व जिवात्मे एकत्र येण्याचा आणि एकत्र जीवन क्रमण्याचा कार्यकाल हा कलियुग असेल.
त्यामुळे ओघानेच तामसी व राजसी शक्ती या कलियुगात अत्यंत बलिष्ठ असणार हे नक्कीच.
श्रीब्रह्मदेवांच्या विस्तृत कथनाचं चिंतन आपण उद्या करूया. तोपर्यंत नामाचं चिंतन सुरूच ठेवूया, त्यामध्ये खंड नको. सद्गुरू आज्ञा तेच सांगते.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment