Skip to main content

भोग आणि ईश्वर ३७३

भोग आणि ईश्वर  ३७३ 

मनाला चंचलता प्रदान करून आणि त्यासह माया व विकार उत्पन्न करून ईश्वराने एकप्रकारे सूत्रबद्ध सापळा रचून त्यामधून, जीवाने बाहेर पडून, सर्व मोह माया, वासना, वाईट विचार व वृत्ती आणि त्याद्वारे उत्पन्न होणारे विकार यांना जिंकत किंवा नियंत्रणात ठेवत, मनाला एका विशिष्ट नादात नेऊन, उच्च पातळीवर घेऊन जायचं. 

या पातळीवर, मनाला स्थिर करून, तिथे वृत्ती, प्रवृत्ती, वासना आणि इच्छा यांना पूर्ण शून्यावर नेऊन, मन एकाग्र करून, साधन केल्यास, उच्च विद्युत, चुंबकीय, ईश्वरीय सान्निध्याच्या लहरींची अनुभूती घेता येईल आणि त्याद्वारे ईश्वराच्या किंवा ईश्वरी अनुभूतीच्या वा प्रचित्तीच्या समीप राहण्याचा आनंद घेत घेत आपली साधना दृढतेने व आत्मबल जागृत करून, सर्वोच्च पातळीला पोचता येईल. 

त्या स्थितीत आणि भावात भक्त आणि भगवंत हे दोनच अंश समोरासमोर उरतात. मग एक क्षण असा येतो की, साधकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव राहात नाही. म्हणजे तिथे फक्त भगवंत शिल्लक राहतो. म्हणजे भूलोकातील ईश्वराचा अंश हा, परम ईश्वरी अंशाशी पूर्ण तादात्म्य पावल्याची अलौकिक आणि अद्भुत जाणीव व अनुभूती, भक्त घेतो. 

ही अत्यंत सुंदर आणि सर्वोच्च अवस्था आहे. याचसाठी सर्व ज्ञान व संत साधू सज्जन यांच्या अनुभूतीचं उदाहरण  ईश्वराने प्रत्येक भक्तासमोर मांडलं वा घालून दिलं आहे. यामुळे प्रोत्साहित होऊन, माणसाने स्वतःमधील स्व मागे सारून,मनाला त्या तरल अनुभूतीच्या पातळीवर न्यायला हवं. ईश्वर स्वतः या जगताचा माता पिता असल्यामुळे प्रत्येक जीवाला होणारा त्रास आणि जन्मोजन्मी होत असलेली परवड पाहून, सर्वात जास्त दुःख होतं. 

म्हणून अनेक प्रकारचे मार्ग ईश्वराने, जीवाचा विचार करून, योजले. लक्ष एकच परम अंशात, या देहातील ईश्वरी अंश संमिलीत करणे. परंतु त्यासाठी अनेक प्रकारे देहाला, बुद्धीला, मनाला तयार करून,मार्गस्थ करणं, हे खरं जीवनाचं ध्येय, जीव जन्माला आल्यावर, घालून देण्यात आलं आहे. पण गफलत मनाला आकर्षून, ओढून धरणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे विकारवश अशुद्ध झालेलं मन, हा ईश्वरीय मार्गाचा भार सहन करू शकत नाही. 

यासाठी सर्वात प्रथम चित्तशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. चित्तशुद्धीपश्चात तेच मन, तरल मृदू व उच्च क्षमतेच्या (high frequency) ईश्वरीय लहरी प्राप्त करू शकतं. या ईश्वरीय लहरी, अनेक प्रकारे व अनेक मार्गानी या ब्रह्मांडात विहरत असतात. त्या प्राप्त करून,ईश्वरी कृपेचा लाभ सर्वांना घेता यावा हा सर्व साधनांचा,मार्गांचा शुद्धी प्रक्रियांचा, योग याग, अष्टांग साधन, शास्त्र, विद्या, ज्ञान व नवविधा भक्तिमार्ग  इत्यादींचा उद्देश आहे. 

यावर पुढे चिंतन उद्या सुरू ठेवूया. पण नामात राहून, नामामार्गी असण्याचा योग नित्य साधत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...