भोग आणि ईश्वर ३७६
चित्तशुद्धीसाठी काय आवश्यक आहे,त्याबद्दल विस्तृत पणे चर्चा करण्याआधी, मुळात चित्ताची शुद्धता का साधायची, यावर जरा चर्चा करूया. जेणेकरून उद्देश वा ध्येय लक्षात आलं की, त्या दृष्टीने मार्ग शोधायला आणि त्यावर मार्गक्रमण करायला, मनाची तयारी होऊ शकेल. ईश्वरी तत्व, निर्गुणरूपात किंवा सगुणात, शुद्ध आणि गुणरहीत आहे. त्यामुळे, त्या तत्वाशी एकरूप होण्या साठी, त्याच पातळीवरील शुद्धता साधणं आवश्यक आहे. अशी शुद्धता गुणातीत वृत्ती धारण करून, आत्म तत्वाला शुद्ध करणं, हे महत्वाचं आहे.
मन ही एकच गोष्ट आत्म्याशी निगडित आहे. आत्म्याची शुद्धता साधण्यासाठी, मनाची किंवा चित्ताची शुद्धता घडणं,ही, म्हणूनच सर्वप्रथम पायरी आहे. यासाठीच, चित्तशुद्धी ही आधी साधून, मग भगवतमार्गावर मार्ग क्रमण करणं, हे श्रेयस्कर आहे. अशी शुद्धता साधण्या साठी, अनेकानेक उपाय अनेकांनी सांगितले आहेत.
त्यासाठी प्रथम विषयाची आस, ओढ, मोह हे सर्व त्यागणं हा सर्वात आधीचा उपाय अथवा सर्वात आधीची पायरी आहे. यासाठीची सुरवात कशी करावी, तर सर्वात प्रथम, दुसऱ्यातील दोष पाहणं सोडून दिलं पाहिजे. कारण मागे सांगितल्याप्रमाणे मनात प्रत्येक प्रकारची शक्तिकेंद्र आहेत आणि त्यांना उद्दीपित करताच, ती केंद्र आपलं कार्य सुरू करतात.
उदाहरणार्थ, जरी प्रत्यक्ष आपण एखाद्याविषयी, द्वेषयुक्त किंवा मत्सरयुक्त उच्चारण प्रत्यक्ष वाचेने केलं नाही, तरीही, नुसता मनात तसा भाव प्रकट होण्याने, चित्तात अशुद्धता निर्माण होते आणि नुसता एक विचारतरंग एका कर्माला जन्म देतो. म्हणजे जे साधुसंत यांनी सांगितलं आहे की, आपण दुसऱ्यात दोष पाहिला की, त्याचा उगम किंवा तो दोष अथवा त्याचं बीज हे आपल्याच मनात असतो, याचा खरा गहन अर्थ वर सांगितल्या प्रमाणे आहे.
हे झालं एका अवगुणाविषयी. म्हणजे अश्या प्रत्येक अवगुणा विषयी चिंतन केल्यास व त्यावर कृती केल्यास, अनेक प्रकारच्या दोषातून,चित्ताची व पर्यायाने अंतर्मनाची आणि आत्म्याची शुद्धी साधता येईल. अर्थात ही प्रक्रिया किंवा हा मार्ग लिहिला तितका सहज नाही हे निर्विवाद. कारण यात अनेक प्रलोभनं, मोह,विषयांचे काटे, क्रोधादी विकारांची क्षणोक्षणी पाय ओढणारी माया,हे सर्व आपला विचारसुद्धा दुरापास्त करतात, मग कृती तर अशक्य होऊन बसते.
या सर्वांतून,काही यश साधण्यासाठी बराच काळ लोटतो. कारण एखाद्या अवगुणावर नियंत्रण येतंय,असं भासत असताना दुसरा अवगुण,आपलं डोकं वर काढतो. हे चक्र नित्य चालू राहतं. अनेकदा आपण आपल्याच मनावरील, आपलंच नियंत्रण कसं काय गमावतो,याविषयी उद्विग्नता वा दोष मनात उत्पन्न होतो. ज्यामुळे पुन्हा आपणच गाडी मागे नेतो. पण असा विचार येण्याने आपण निदान त्याचं चिंतन करतो. चिंतनातून अनेकदा मार्ग निघू शकतो. तरीही यावर अजून चिंतन अपेक्षित आहे, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नाम हेच सार हा मन्त्र ध्यानात ठेवून, नामस्मरण सुरू ठेवा.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment