Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८४

भोग आणि ईश्वर  ३८४

कलीचं कथन सर्व श्रोतृवर्ग शांत चित्ताने, पण दिगमूढ होऊन ऐकत होता. सद्गुरुकृपेचा महिमा कलीकडून जाणून घेतल्या नंतर, समस्त सभागृह याबद्दल अजून ऐकण्यास उत्सुक होता. सभागृहाची ही मनःस्थिती जाणून श्रीब्रह्मदेवांनी कथन करण्यास आरंभ केला. हे कली यावर अजून विस्ताराने जाणण्याची समस्तांची इच्छा आहे. त्यामुळे आपण कृपेकरून यावर अधिक विस्ताराने कथन करावे, अशी मी विनंती करतो. 

कली पुढे सांगू लागला. मुळात हे सद्गुरुतत्व कामधेनू सम, या भूतलावर, कलियुगाच्या अंतापर्यंत, आपला कृपेचा ओघ, आपल्या साधक व हरिभक्तांवर प्रभावित ठेवेल. म्हणजे जे साधक गुरुभक्तीत आणि गुरूसाधनेत लीन राहून, भौतिक सुखा साठी नव्हे तर आत्मिक उन्नती साठी रत असतील, त्यांना तर  ही गुरुकृपा साध्य होईल. परंतु जे भक्त हरीची वा परम ईश्वराची भक्ती करण्यात मग्न आहेत, त्यांना शोधत, त्यांना योग्य मार्गावर आणून, त्यांना आत्मज्ञान देऊन, सदगतीप्रत नेण्याचं कार्य हेच सद्गुरुतत्व करेल. 

यामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे, जे आपल्या संचिता नुसार प्राप्त भोग वा उपभोग यांनी, अतिदुःखात वा अतिसुखात निमग्न होऊन, मात्र भौतिक सुखाची कामना धरून किंवा भोग टाळण्याचा हेतू धरून अशी भक्ती वा साधना करतील, त्यांना या दुर्बुद्धीसाठी पुन्हा पुन्हा देहधारण करून, सदर कर्माचं फलित भोगत रहावं लागेल. परंतु यासर्वात सद्गुरुकृपा व सद्गुरुइच्छा ही अग्रस्थानी असेल. 

म्हणजे सदर फलितातून किंवा अश्या कामनेच्या बुद्धि पासून, अश्या जीवाला वाचवण्यास सद्गुरूच समर्थ असतील. परंतु अशा जीवांना त्रास देऊन त्यांना पथभ्रष्ट, बुद्धिभ्रष्ट करण्याचे प्रयत्न मला करावेच लागतील. किंबहुना तसे मी करूनच जास्तीतजास्त जीवांना घोर यातनेत ठेवून, जन्मोजन्मीच्या यातनांनी, त्यांच्या आत्म्याला या युगात, त्रस्त करत राहीन. कारण तो माझा, कली म्हणून धर्म असेल. 

ईश्वरभक्तीच्या अनेक साधनांची विफलता, भक्तीच्या मार्गातील विघ्नांचा सुकाळ, दुष्ट, दुर्जन, पापी, अधमी यांची चलती व बढती या सर्वांमुळे, अनेक क्षीण आत्म तेज व आत्मबल असलेले, मनावर कोणतही नियंत्रण नसलेले वा उत्शृंखल जीव, विषया सक्त व वासनेच्या, मोहाच्या व मायेच्या या चक्रात अडकून, त्यातच आपलं हित मानतील.  हे सर्व या युगात माझे सर्वात प्रिय असतील. 

कोणत्याही प्रकारचा विधनिषेध न बाळगणारे, भाषा, धर्म, नीति नियम, आचार, विचार उच्चार यांची तमा न बाळगणारे, संस्कृतीच्या मानवतेच्या कोणत्याही बांधनांना न जुमानणारे हे सर्व माझ्या काळात कायम तेजीत दिसतील. याचं कारणच हे असेल की, या भ्रमाच्या व बुद्धिभेदाच्या जाळ्यात जनसाधरण येत जावेत आणि जास्तीतजास्त जन माझ्या पायी लीन राहावेत. 

त्यामुळे शक्य असेल त्या सर्व मार्गांनी, हे साध्य करणं माझं ध्येय असेल.  अर्थात साम, दाम, दंड, भेद, कपट कारस्थान, अनीती, कुनीती, अनाचार, भ्रष्ट आचार, उच्चार व विचार, दंभ, दुराचार, दूषप्रवृत्ती, दुर्जनता, दुष्टता, खलप्रवृत्ती, हे सर्व माझ्या सैन्यातील सैनिक व हत्यारं म्हणून कार्य करतील. 

त्यामुळे हलक्या कानाचे, हलक्या बुद्धीचे, कमजोर मनाचे जन सहजी या सर्व भ्रामक चित्रात आपसूक माझ्या जाळ्यात ओढले व अडकले जातील. दुष्ट प्रवृत्तीचे व वासनेच्या अंधःकारात मग्न जीव माझं बळ असेल. हेच जीव भय, काम, खल, असुर, अहंकार, गर्व या, इतर युगातील टाकाऊ गुण धर्मांना माझ्या काळात अभय असेल. याच मायेच्या जोरावर मी या युगात उत्पात घडवून आणीन  

कलीच्या या उद्दाम व दर्पोक्तीपूर्ण उद्गारांचा, अनेकजण मनातून, खरतर, धिक्कार व निभत्सना करत होते आणि श्रीब्रह्मदेवांच्या अविचल चेहऱ्याकडे पाहून आश्चर्यचकित होत होते. याचं पुढील चिंतन उद्याच्या भागात पाहू. पण आपली साधना व गुरुभक्ती दृढ का असावी, याची जाण, इथपर्यंतच्या चिंतनातून आली असेल, अशी आशा आहे. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...