Skip to main content

भोग आणि ईश्वर ३७०

भोग आणि ईश्वर  ३७०

आत्मा ज्यावेळी देहात प्रवेश करतो, त्यावेळी देह मातेच्या उदरात असतो आणि साहजिकच मन बुद्धी आणि देह यांची जाण बालकाला झालेली नसते, त्यामुळे, आत्मा सर्व भूतकाळा तील वा जन्मातील गोष्टी आठवत असतो आणि देह पुर्णपणे आत्म्याच्या ताब्यात असतो. या देहाचा जगाशी प्रथम संबंध, पहिल्या श्वासाने येतो,जो उदारा बाहेर आल्यावर,बालक प्रथम घेतो. त्याच वेळी देहाची जाणीव आणि गरजा यांचा संबंध सुरू होतो आणि प्राण्यांची पहिली गरज भूक याच्याशी मानवाचा पहिला संबंध येतो. 

त्याआधी निद्रा या गरजेशी जीवाचा संबंध आलेला असतो. म्हणजे प्राण्यांच्या दोन गरजांशी संबंध, जीव जन्माला येतानाच आलेला असतो. प्राण्यांची तिसरी गरज ही योग्य वयात मानवाला त्या संबंधाकडे खेचून नेते. यासाठी अनेक प्रकारांनी माणूस, स्वतःची गरज भागवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भूक निद्रा मैथुन या तीन गोष्टी मानव योग्य वयात व योग्य तऱ्हेने या देहाचा भाग बनवून, देहाला या गरजांबद्दल, परिस्थितीशी जुळवून, त्यांना प्राथमिकता देण्यात तयार झालेला असतो. 

देहात येण्यात आत्मा काही विशिष्ट उद्देश व जबाबदारी साठी बांधील असतो. आता देह पूर्ण तयार होऊन, बुद्धी मन परिपक्व होण्यात काही वर्षे जातात. पण या दरम्यान त्या वयातील गरजांसाठी देह, मन आणि बुद्धी मग्न व मशगुल होऊन जातात. त्यामुळे या प्रक्रियेत सर्वसाधारण पणे तीस वर्षांचा काळ निघून जातो. पूर्वीच्या काळी हे वय संस्कृतीपरत्वे कमी होतं. त्यानंतर जी सांसारिक जबाबदारी जीव स्वीकारतो, त्यासाठी पुढची तितकीच वर्षे जीव संसार करतो. 

आता यासर्व प्रक्रियेत मूळ आत्मचिंतन मागे पडतं. ज्यावेळी मानव या सर्वांतून देवधर्म करण्याच्या वयाकडे पोचतो आणि गाडी पंथाला लागेपर्यंत, जमेल तितकं देवधर्माचं करून, पुढील प्रवासाला, आत्म्याला जाण्याची व्यवस्था करून देह सोडतात. हा सर्वसाधारणपणे सर्व मानवी जीवांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो. या सर्व प्रवासात, ज्या ज्यावेळी भोग वा दुःख आड येतं, त्या त्यावेळी माणूस, हे का याचा शोध काही काळ पर्यंत घेतो. 

याबद्दल आपण चिंतन पुढच्या भागात करूया. तोपर्यंत नाम हेच सर्वस्व मानून, ते घेत राहण्याचा निश्चय अंमलात आणूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...