Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६९

भोग आणि ईश्वर  ३६९ 

आत्मा हा सर्व देहांचा मालक आहे. म्हणजे खरतर अधिकार आत्म्याने गाजवायला हवा. पण परिस्थिती वेगळी आहे. ही वेळ  कशी आली,  तर मनाला, बुद्धीला आणि देहाला स्वैर वागण्याची मुभा जन्मतः मिळते, दिली जाते. त्यामुळे मनाचा वारू स्वैर वाहतो. मन हे वाऱ्या समान आहे. वाटेत जे येईल त्यात गुंतत, गुरफटत जातं. त्यामुळे मन, बुद्धी या जशा ग्रस्त होतील , त्यानुसार ते देहाला वापरून घेतात. 

म्हणजे कर्म करवून घेणारे सूत्रधार वेगळे, त्या मोहात, लोभात, क्रोध व काम यांच्या प्रभावात सापडतो देह आणि नन्तर घडलेल्या प्रत्येक कर्माचं फलित देह भोगतो. बुद्धी व मन त्यात भ्रम निर्माण करून यात आपला दोष काहीच नाही असा बुद्धि भेद करून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करतात. या सर्वात आपण गोंधळलेल्या स्थितीत हे काय झालं म्हणून विचार करतो. 

बर मन इतकं स्वार्थी असतं की उपभोग किंवा सुखाच्या काळात असा प्रश्न कधीही मन या मनास स्पर्षत  नाही. मन हाच विचार अश्या काळात करतं की, हे सर्व आपल्या कर्तृत्वाचं फलित आहे.पण हेच मन दुःखाच्या व भोगांच्या काळात मात्र संभ्रमात पडतं. कारण जे कर्मफल गणित सुखाच्या काळात मान्य करून, सर्व श्रेय स्वतःकडे घेत आणि दिवस बदलून  दुःख व भोग आले असताना, त्यावेळी आपलं कर्मफल मान्य करत नाही. 

म्हणजे मन हे या सर्वांतील महत्वाचा दुवा आहे. कारण देह जन्मोजन्मी बदलत जातो, आत्मा जो प्रत्येक देहात स्थित राहून, देह,बुद्धी आणि मन यांना चालवतो, त्यांना कर्मरत ठेवतो. या संपूर्ण देहाला निर्माण करण्याचा, ईश्वराचा मूळ उद्देश, मनाला एकाग्र करून, मनाला आत्मनंदात रत करून, स्वतःच्या  व त्या द्वारे,ईश्वराच्या अस्तित्वाचा शोध घेणं हा आहे.हा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी ईश्वराने मनाला अनियंत्रित व अमर्याद शक्ती प्रदान केली आहे. 

या शक्तीचा उपयोग करून मानवाने आपला आत्मोद्धार साधून उन्नत मार्गावर आत्म्याला घेऊन जावं, हा ईश्वराचा मनोदय होता. तो मनोदय अनेक मार्गांनी मानवापर्यंत पोचवण्याचं कार्य ईश्वराने अनेक प्रकारे केलं आणि करत राहणार. पण मानवाने आपल्या संसारातून बाहेर येऊन काहीतरी वाटचाल ईश्वराच्या दिशेने करावी,  असा त्या ईश्वराचा खरा उद्देश आहे. 

याचा मार्ग म्हणजे मनातून आत्म्याकडे मानवी जीवनाचा प्रवास व्हावा.  कारण मनच या सर्वांतील मुख्य कारक आहे. मन सिद्ध असेल तर काहीही साध्य होऊ शकतं. किंबहुना मनाची प्रचंड  खोली आणि मनाच्या तीन अवस्था हेदेखील ईश्वरी वरदान आहे. योगाच्या, साधनेच्या तपाच्या मार्गाने या मनातील तिसरा स्तर अर्थातच सुप्तमन जर मानवाने उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला तर, अनेक अद्भुत व अलौकिक गोष्टी मानवाला साध्य होतील. 

यावर अजून विवेचन पुढील भागात करूया. पण नामाच्या स्मरणातून मनाच्या सर्व स्तरांना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...