Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६७

भोग आणि ईश्वर  ३६७

मनाला नित्य कुठलातरी चाळा वा छंद लागतो. मन नित्य कशात रममाण होऊ इच्छितं. याचा परिणाम वा फल स्वरूप नित्य काहीतरी मानसिक वा शारीरिक गुंता निर्माण करत जातं. हा गुंता नात्यांचा, कर्माचा भावनांचा, त्या बंधातून निर्माण होणाऱ्या शृंखलांचा, देहाच्या व संसाराच्या व्यापाचा असे अनेक गुंते मन निर्माण करून, देहाला त्यात गुंतवून, त्यायोगे आत्मा नित्य देहोदेही त्याचे परिणाम वा फल भोगण्यासाठी भटकत राहील,  याचीच खरतर व्यवस्था करतं. 

म्हणजे ताकद, शक्ती, ऊर्जा हे सर्व मनात आहे, मनातूनच हे सर्व देहाला पोचतं आणि देहाला कर्म करायला व उप भोग भोगायला लावून, त्यातून सर्व घडवून आणतं. म्हणजे सर्व अव्यापरेशु व्यापार करणारं मन नेहमी, नवीन खेळाच्या मागे असतं. मन हे चंचल असेल, खट्याळ असेल, तर त्या व्यक्तीला नित्य नवीन प्रश्नात मन गुंतवतं. बरेचवेळा परिणाम समोर दिसल्यावर लक्षात येतं, पण वेळ बरीच पुढे निघून गेलेली असते त्यामुळे देह त्याचे परिणाम, दुःख भोग भोगतो. 

मनाच्या या गुंत्यातून, मनाला बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय आहेत. मुळात ही अशाश्वत वस्तूंची, विनाशी गोष्टींची आणि ज्याने अंती  दुःखच हाती येईल अश्या सर्वांची आसक्ती, हेच मुळात सर्व भवरोगांचं कारण आहे. नवनवीन गोष्टी मनाला आकर्षित करून, मनाला आसक्तीच्या फेऱ्यात गुंतवून ठेवतात. 

वास्तविक पाहिलं तर आपण नशेकरी लोकांना नावं ठेवून आपण खूप सुखी व शहाणे आहोत, असं स्वतःला समजावतो. परंतु जर व्यापक अर्थाने पाहिलं तर, आपण सर्वच नाशवंत व अशाश्वत गोष्टींत मन गुंतवून मनाला मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदात खरा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. खरतर ही पण एक प्रकारची नशा आहे. 

म्हणजे नित्य नष्ट होणाऱ्या देहाचं, त्यामुळे मिळणाऱ्या भोगाचं आणि त्यातून प्राप्त सर्व प्रकारच्या तात्पुरत्या सुखाचं आपण आकर्षण बाळगून, त्यातून मन देहाला कधीही बाहेर येऊ देत नाही. त्यामुळे या वृत्तीत व नशे करी माणसाच्या नशेच्या वेडात काही फरक आहे असं मला वाटत नाही. 

मग यावर उपाय काय. तर अशाश्वत व तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टीतून मनाला हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत जावं. एका ठराविक वयात हे पटणं सुद्धा कठीण आहे. पण प्रयत्न करत गेल्यास, अश्या तात्पुरत्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाला सोकावलेल्या मनाला हळूहळू बाहेर काढून, त्याला नित्य, कायम स्वरूपी, अविनाशी, अपार व संपूर्ण आनंद देणाऱ्या गोष्टीत मनाला हळूहळू गुंतवत जाण्याचा प्रयत्न करत जावं. 

यावर अजूनही चिंतन करूया, उद्याच्या भागात. तोपर्यंत आपण नामाने नित्य ईश्वर स्मरण करत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...