भोग आणि ईश्वर ३९३
इतकं प्रदीर्घ विश्लेषण, कलियुगाच्या गुणधर्माचं, करत असताना अजून काही मुद्दे लक्षात येतात, त्याचं चिंतन आवश्यक आहे.
जपतप, साधना आणि ईश्वरप्राप्तीच्या वा मोक्षप्राप्तीच्या मार्गाचा प्रवास हा युगांच्या प्रवासात खडतरपणाकडून सुलभतेकडे झाला आहे.
मोक्षाची वाट सत्ययुगात अत्यंत तापदायक, खडतर आणि कष्टसाध्य होती. पुराणं आणि रामायणासारखी महाकाव्य वाचताना जाणवणारी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याकाळी आयुष्याचा काळ हजारो वर्षांचा होता.
त्यामुळे त्याच प्रमाणात तप जप व साधनेच्या सर्व मार्गां वरील मार्गक्रमण करावं लागत असे. मुळात अश्या साधनेच्या मार्गात अनेक व्यवधानं पाळावी लागत. गुरुकृपा प्राप्ती हा सर्वात कठीण टप्पा होता.
हजार हजार वर्षे वाट पाहून, त्यानंतर सद्गुरू एखाद्याला असीम कृपेची अनुभूती देत असत. याचं महत्वाचं कारण सर्वसाधारण जन हे पापभिरू आणि पुण्यमार्गी असल्या मुळे, त्यातून योग्य निवड करून, त्या पात्र जीवाला मोक्ष मार्गावर अग्रेषित करणं,ही महत्वाची जबाबदारी सद्गुरूं वरील खरं उत्तरदायित्व होतं.
यामागे सर्वात महत्वाचा उद्देश, साधनेची, मार्गाची शुचिता अर्थात शुद्धता राखणं गरजेचं होतं. जीवन जगण्याच्या पद्धती व मार्ग फार बिकट नव्हते. कारण जीवन जगण्या साठी फार साधनं, सोयी, यांची गरज नसायची. राहणी साधी, सहज व सोयीची होती.
त्यामुळे त्यातून ईश्वराप्रति निष्ठा, आस्था, प्रेम निर्माण होण्या साठी जीवाला योग्य त्या परीक्षेतून नेऊनच, ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग, त्याची साधना, सांगितली जायी. याचं कारण की हे अमूल्य व पवित्र ज्ञान त्याच हातात जावं, जो यासाठी पात्र आहे आणि ज्याला या ज्ञानाच्या प्राप्तीची खरी आस व तळमळ आहे.
तीच तळमळ वा आस्था किंवा जिज्ञासा जागृत करण्याचे व त्यासाठी जीवाला तप्त करण्याचे खडतर उपाय योजले जात. ज्याप्रमाणे भारतीय सैन्यात भरती प्रक्रियेत अत्यंत खडतर प्रशिक्षण व्यवस्था, योजली आहे, त्याचप्रमाणे. त्या योजने मागील उद्देश, हाच आहे की,खडतर, विपरीत आणि अत्यंत बिकट परिस्थितीत व शत्रूराष्ट्राच्या हाती, सैनिक सापडल्यावर त्याला, त्या परिस्थितीशी झुंजता आलंच पाहिजे.
आज विचार केला तर कदाचित अकल्पनिय वाटेल,पण आज उपलब्ध साधनं व मार्ग इतके सहजसाध्य व सुलभ आहेत की, त्या काळातील परिस्थिती आज आपल्याला जाणवणार नाही व कळणारही नाही.
पण हे पवित्र ज्ञान युगानुयुगांपासून आजपर्यंत छपाईचं कोणतंही तंत्र नसताना आणि भूर्जपत्रासारखी व्यवस्था असताना, मुखोद्गत करून, पिढ्यान पिढ्या पुढे फक्त स्मरणशक्तीमार्गे हस्तांतरित करत जाणं, हे एका अलिखित पण शिस्तबद्ध प्रयत्नातूनच शक्य झालं.
अश्याच प्रकारच्या मुखोद्गत व्यवस्थेतील भाग म्हणून ती शिस्त,ते ब्रह्ममुहूर्ती उठून, स्तोत्र, श्लोक, महाकाव्य टिकवून ठेवता आली. या सर्व ज्ञानाच्या कक्षा युग प्रवासात रुंदावण्याच्या प्रवासाचं चिंतन, आपण उद्याच्या भागात, इतर अनेक मुद्द्यांसह पाहूया, पण नामस्मरण नित्य सुरू ठेवून.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment